चिरनेर : रामप्रहर वृत्त उरण तालुक्यात गुरे चोरणार्या टोळ्यांनी हैदोस घातला आहे. शेतकर्यांच्या पशुधनाची हे कसाई बिनधास्त कत्तल करीत असल्याने पशुपालक हैराण झाले आहेत. जंगलात चरायला गेलेली जनावरे रात्री फासगीत अडकवून रातोरात त्याची कत्तल करून त्यांची चोरटी वाहतूक हे कसाई करीत असून त्यांना कोणाचे ना भय ना भीती राहिली आहे. …
Read More »पनवेल मनपा उचलणार ‘त्यांच्या’अंत्यविधीचा खर्च
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाने मृत्युमुखी पावलेल्या मृताच्या नातेवाइकांकडे पैसे नसल्याने तसेच अनेक वेळा अंत्यविधीला कोणीच उपस्थित राहत नसल्याचे पाहावयास मिळत असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत स्वखर्चाने कोरोनाने मृत्यू झालेल्याच्या अंत्यविधीचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीने बुधवारी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. पालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येने 14 हजारांचा टप्पा …
Read More »कोरोनाबाधित क्षेत्रात आता पोलीस बंदोबस्त; नवी मुंबई मनपाचा कंटेन्मेंट झोनसाठी निर्णय
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी नवी मुंबई शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असलेल्या 30 ठिकाणांना कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे, परंतु या भागात राहणार्या नागरिकांकडून नियमावलीचे पालन केले जात नव्हते. आता या भागात पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याबाबत पोलिसांची मदत घेतली …
Read More »सुधागड बनलेय कोरोनाचा हॉटस्पॉट; रुग्णसंख्या 300पार
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने फैलावत असल्याचे दिसत आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या पाहता तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असल्याचे चित्र आहे. सुधागडातील कोरोनाबाधितांची संख्या आता 300पार झाली आहे. सुधागड तालुक्यात कोरोनाचे तब्बल 302 रुग्ण झाले असून आतापर्यंत 182 रुग्ण बरे झाले आहेत. तब्बल 16 रुग्णांचा मृत्यू झाला, तर …
Read More »जेएसडब्ल्यू कंपनीकडून पीपीई किटचे वाटप
रेवदंडा ः प्रतिनिधी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या व्यक्तींना साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने गुरुवारी (दि. 10) पीपीई किटचे वाटप करण्यात आले. साळाव जेएसडब्ल्यू कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र बोर्ली मांडळा, प्राथमिक आरोग्य केंद्र रेवदंडा, उपकेंद्र चेहेर, कोर्लई, वळके येथील कर्मचार्यांना कोरोना विषाणूची बाधा होऊ नये …
Read More »बिरदोलेवासीयांना मिळणार शुद्ध पाणी; नळपाणी योजनेला जलशुद्धिकरण केंद्राची जोड
कर्जत ः बातमीदार कर्जत तालुक्यातील बिरदोले येथील नळपाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जलशुद्धिकरण मशिन बसविण्यात आले आहे. 14व्या वित्त आयोगाच्या निधीमधून जलशुद्धिकरण मशिन बसविण्यात आल्याने आता बिरदोले ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळणार आहे. भारत निर्माण योजनेतून मंजूर करण्यात आलेल्या बिरदोले गावाच्या नळपाणी योजनेचे काम अनेक वर्षे रखडले होते. नळपाणी योजनेचे अर्धवट राहिलेले …
Read More »महाडमध्ये हुतात्मा दिनी शहिदांना अभिवादन
महाड ः प्रतिनिधी क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित प्रतिष्ठानच्या वतीने शहीद हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गुरुवारी (दि. 10) महाडच्या हुतात्मा दिनी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. थोर स्वातंत्र्यसेनानी नानासाहेब पुरोहित यांच्यामुळे महाडमध्ये देशाच्या समग्र स्वातंत्र्यलढ्याची पहिली ठिणगी पडली. त्या अनुषंगाने महाडमध्ये क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित यांच्या नावे सुरू करण्यात आलेल्या प्रतिष्ठानमार्फत 78 …
Read More »कर्जत पंचायत समितीला आली जाग!शिवरायांसह हुतात्म्यांच्या पुतळ्यांचे होणार सुशोभीकरण; ‘राम प्रहर’चा दणका
कर्जत ः बातमीदार कर्जत पंचायत समिती कार्यालयात असलेले छत्रपती शिवाजी महाराज तसेच हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांचे पुतळे अंधारात, जमिनीवर पाणी असलेल्या जागी आणि आजूबाजूच्या भिंती काळपट अशा स्थितीत होते. दरम्यान, तालुक्यातून याबाबत सर्वांनी आवाज उठविल्याने कर्जत पंचायत समिती खडबडून जागी झाली आणि त्यांनी परिसर स्वच्छ करून रंगरंगोटी …
Read More »कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीची कारवाई; न्यायालयाकडून स्थगिती
मुंबई : प्रतिनिधी अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत महापालिकेने बुधवारी (दि. 9) कारवाई सुरू केली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. या प्रकरणी गुरुवारी दुपारी 3 वाजता पुन्हा सविस्तर सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी सकाळी कंगनाच्या कार्यालयाबाहेर धडकले आणि त्यांनी …
Read More »भारतीय रेल्वे कात टाकणार! संपूर्ण गाडी एसी करण्याची योजना
मुंबई : प्रतिनिधी भारतीय रेल्वेमध्ये आजवर वेळोवेळी प्रवाशांच्या आरामदायी प्रवासाच्या दृष्टीने अनेक बदल झाले आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा रेल्वे कात टाकणार असून, एक महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार आता कमी खर्चात नागरिकांना एसी डब्यातून प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजेच रेल्वेने जनरल डब्यांसह सर्व डबे …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper