Breaking News

Ramprahar News Team

महानगर गॅस कंपनीच्या दिशाहीन व्यवस्थापनामुळे रस्ते बंद, जनआंदोलन करण्याचा गणेश पाटील यांचा इशारा

कळंबोली : प्रतिनिधी महानगर गॅस कंपनीकडून घरगुती पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू असून या कामा बाबत व्यवस्थापन नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. काही ठिकाणी संपूर्ण रस्तेच बंद केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांना हा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा जनतेला त्रास देण्याचे उद्योग कंपनीने त्वरीत थांबवावे अन्यथा कंपनी विरोधात जनआंदोलन …

Read More »

युईएस कॉलेजमध्ये तरंग फेस्टिव्हल उत्साहात

उरण : वार्ताहर युईएस कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड टेक्नोलॉजीमध्ये ’तरंग’ फेस्टिव्हल जल्लोषात नुकताच साजरा झाला. तीन दिवस चाललेल्या ह्या सोहळ्यात विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. फेस्टिव्हल मेहंदी, टॅटू, क्वीझ, टीक-टॉक, स्पॉट फोटोग्राफी, ब्राइडल मेकप तसेच नेल आर्टस्, ग्रिंटीग कार्ड, ट्रेझर हण्ट, ब्लॉग डिझाइन, बॉलिवुड डे, पारंपारिक वेशभूषा इत्यादी रंगीबेरंगी खेळांची …

Read More »

वहाळ ग्रामपंचायत हद्दीतील मटण, चिकन विक्रेत्यांची मनमानी, उपसरपंच अमर म्हात्रे यांचा इशारा

पनवेल : रामप्रहर वृत्त वहाळ ग्रामपंचायत हद्दीतील मटण व चिकन विक्रेत्यांनी मनमानीपणाने दर वाढविले आहेत. ही माहिती मिळताच वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर केसरीनाथ म्हात्रे यांनी प्रत्यक्ष दुकानदारांशी भेट घेऊन मटण, चिकन पूर्वीच्याच दराने विकावे; अन्यथा दुकाने बंद केली जातील, अशी तंबी दिली. या वेळी अमर म्हात्रे यांच्यासमवेत तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष …

Read More »

नवीन पनवेलमधील भुयारी मार्गासाठी सिडकोने कार्यवाही करण्याची गरज

पनवेल : प्रतिनिधी नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का) मध्ये जाण्यासाठी सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रेल्वे प्रशासनाकडून भुयारी मार्ग दोन्ही बाजूने खुला करण्यात आला आहे. तक्का बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे, तर नवीन पनवेल बाजूचे काँक्रिटीकरण लवकरच पूर्ण होईल. नागरिकांना मात्र या भुयारी मार्गाचा वापर करता …

Read More »

उल्हास नदी संवर्धनाचा प्रयत्न

बारमाही वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली की त्यावर अवलंबून असलेल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. त्यात केवळ पिण्याचे पाणी प्रदूषित होत नाही, तर नद्यांमधील जीवांचे आयुष्यदेखील प्रदूषित पाण्यात असल्याने कमी होत जाते, मात्र कर्जतच्या कातळदरा जंगलात उगम पावलेल्या उल्हास नदीचा काही किलोमीटरनंतरचा प्रवास बारमाही नदीमध्ये होतो आणि ही नदी अनेक …

Read More »

पारा घसरला

ऋतुचक्र बदलत असते, परंतु निसर्गाची परिक्रमा ही ठरलेलीच असते. अलीकडच्या काळात मात्र त्यात प्रचंड बदल झालेला आहे. हल्ली कधीही पाऊस पडतो. यंदा तर वरुणराजाने धो धो बरसून सर्वांना अक्षरश: झोडपले. तरीही अधेमधे ढगाळ वातावरण निर्माण होऊन उकाडा जाणवत होता. अखेर थंडी पडण्यास सुरुवात झाली आहे. तीदेखील हुडहुडी भरविणारी. तशी थंडीची …

Read More »

अलिबाग ः सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती समुद्रकिनारे असते. त्यामुळे वीकेण्डला जोडून आलेली ही पर्वणी साधण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. (छाया : जितू शिगवण)

Read More »

‘आध्यात्मिक साधना सर्व शारीरिक व्याधींपासून दूर ठेवते’

मुरूड ः प्रतिनिधी मुरूडजवळील डोंगरी गावात श्री स्वामी समर्थ मठ गेली अनेक वर्षे उत्तमरीत्या काम करीत आहे. निसर्गरम्य डोंगरी गावात समुद्रासमोर विशाल अशा मठात हजारो भक्त रोज दर्शनासाठी येतात व स्वामीभक्त त्रिशाताई भक्तांशी संवाद साधतात. त्या स्ववादातून हजारो भक्तांची गार्‍हाणी ही शारीरिक व्याधींची असतात. म्हणूनच त्रिशाताई यांनी मुरूड शहरात माली …

Read More »

सिद्धगडावर बलिदान दिनानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा

कर्जत ः प्रतिनिधी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मुरबाड तालुक्यातील सिद्धगड येथे हुतात्मा झालेल्या वीर हुतात्मा भाई कोतवाल व वीर हुतात्मा हिराजी पाटील यांना आदरांजली वाहण्यासाठी 1 आणि 2 जानेवारी 2020 रोजी सिद्धगडावर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा व देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार …

Read More »

‘वीज बिल वसुलीसोबतच ग्राहकसेवेला प्राधान्य द्या’

पेण ः प्रतिनिधी थकबाकी वसुली व वीजचोरांविरूद्ध मोहीम राबवण्यासोबत सर्वोत्तम ग्राहकसेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. पेण, अलिबाग आणि पनवेल ग्रामीण येथे उपविभागीय अभियंता ते शाखा अभियंत्यांपर्यंतच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. या वेळी पेण मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता दीपक पाटील, …

Read More »