Ramprahar News Team

गोड्या पाण्यातील चिंबोर्‍यांना वाढती मागणी

मोहोपाडा : वार्ताहर दांड-रसायनी रस्त्यावरील रिस टाटापॉवर हाऊसजवळ आसपासच्या परिसरातील आदिवासी महिला गोड्या चिंबोर्‍यांची विक्री करण्याकरिता बसत आहेत. पावसाचे प्रमाण कमी होऊन धुके पडण्यास सुरुवात झाल्याने नदीकिनारी, ओहोळ, तसेच शेतात आणि डोंगर कपारीत सापडणार्‍या गोड्या पाण्यातील चिंबोर्‍यांची विक्री करण्याकरिता बसत आहेत. पौष्टिक आणि चविष्ट अशा गोड्या पाण्यातील चिंबोर्‍या म्हणजे खवय्यांच्या …

Read More »

कामोठ्यामध्ये मोहम्मद पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात साजरी, ईदच्या धार्मिक रॅलीमधून मुस्लिम बांधवांनी दिला शांतता आणि एकतेचा संदेश

पनवेल : प्रतिनिधी कामोठे येथे सुन्नी गौसीया चिश्तीया चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ईद मिलादुन्नबी (मोहम्मद पैगंम्बर) जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ट्रस्टच्या वतीने जयंतीनिमित्त नूर-ए-मोहम्मदी मदरसा (शाळा) या विद्यार्थ्यांना स्कूल युनिफॉर्मचे मोफत वाटप करून मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत राष्ट्रध्वज फडकल्याने कामोठा परिसरात या रॅलीचे मोठ्या प्रमाणात …

Read More »

रोटरी क्लबच्या वतीने नाट्यसंगीत स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल मेट्रो यांच्या वतीने एम. जी. जोशी मास्तर स्मृती खुल्या नाट्यसंगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पनवेल येथील चिंतामणी सभागृहामधे झालेल्या या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. याचबरोबर रसिकांनाही दर्जेदार नाट्यगीत श्रवणाचा आनंद मिळाला. अत्यंत श्रवणीय व रंगतदार अशा या स्पर्धेमध्ये नेहा पुरोहित हिने …

Read More »

सीकेटीच्या विद्यार्थ्यांचे गणित संबोध परीक्षेत सुयश

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत चांगू काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमिक विद्यालयाने अत्यंत नेत्रदीपक यश प्राप्त केले. सीकेटीचे 38 विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. यामध्ये कौशल मनोज गोसावी (पाचवी), ऋतुजा नरेंद्र म्हात्रे (पाचवी), ऋत्विक शिवदास पाटील (पाचवी), प्रचिती संतोष घोलप (पाचवी), …

Read More »

कळंबोली सर्कलला जुगाराचा विळखा

कळंबोली : बातमीदार कळंबोली सर्कलच्या बाजूला असलेल्या कळंबोली वाहतूक पोलीस कार्यालयाच्या बाजूलाच जुगाराचा अड्डा रोज सकाळी 8 वाजल्यापासून मांडला जात आहे. या जुगार अड्ड्यावर माथाडी कामगार, तसेच अन्य कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात बळी पडत आहेत. प्रथमदर्शनी जुगार खेळताना जिंकण्याचे आमिष दाखवून नंतर कंगाल करण्याचा अनोखा प्रकार केला जात आहे, मात्र …

Read More »

विकासपूर्व कामे अंतिम टप्प्यात, डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होण्याचा विश्वास

पनवेल : बातमीदार सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याच्या अगोदर करावयाची विकासपूर्व कामे अजून सुरूच आहेत. यात सर्वधिक महत्त्वाचे असलेले टेकडी सपाटीकरण, नदीचा प्रवाह बदलणे आणि दहा गावांचे स्थलांतर करून ती जागा मिळवून देणे ही कामे आता अंतिम टप्प्यात असून, या वर्षीच्या डिसेंबरअखेर …

Read More »

पायी दिंडीचे धाकटी पंढरीला प्रयाण

मोहोपाडा : वार्ताहर श्री विठ्ठल पायी कोकण दिंडी आयोजित स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य कांबेकर महाराज, सुखनिवासी गोमाजीबाबा गायकर, सुखनिवासी भगोजीबाबा, सुखनिवासी झिपरूबाबा, सुखनिवासी गणपतबाबा मुकादम, गुरुवर्य लक्ष्मण महाराज म्हसकर आणि गणेश सर यांच्या कृपाशीर्वादाने साजगाव येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले. शिवव्याख्याते कीर्तनकार हभप संतोष महाराज सते यांच्या कुशल मार्गदर्शनाने भाताण …

Read More »

पोदी भागातील भुयारी मार्ग रखडला, महावितरणच्या टॉवरमुळे डिसेंबर 2017 पासून काम बंद

पनवेल : बातमीदार पनवेल रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पोदीवर जाण्यासाठी फाटकामधून जाणे, अजून तरी टळण्याची चिन्हे नाहीत. त्यासाठी अजून काही महिने वाट पाहावी लागणार आहे. महावितरणची वीजवाहिनी काढण्यास विलंब झाल्यामुळे हे काम रखडले आहे. नवीन पनवेल सेक्टर 15, 15 ए, 16, तसेच पोदी आणि विचुंबे गाव या भागात पनवेलकडून वाहने घेऊन …

Read More »

भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, आघाडीसोबत जाणार्या शिवसेनेला शुभेच्छा! -चंद्रकांत पाटील

मुंबई : प्रतिनिधी सत्तास्थापनेसंदर्भात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आम्ही सत्ता स्थापन करण्यास असमर्थ आहोत. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती राज्यपालांना दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (दि. 10) पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचबरोबर …

Read More »

चक्रीवादळांमुळे रायगड जिल्ह्यातील 22,677 हेक्टर भातशेतीचे नुकसान

अलिबाग : प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या क्यार आणि महा चक्रीवादळामुळे अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीत रायगड जिल्ह्यातील 22 हजार 677  हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले आहे. एक हजार 701 गावांतील 67 हजार 51 शेतकर्‍यांना याचा फटका बसला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले असून, शासनाला त्याबाबतचा अहवाल सादर करण्यात आला …

Read More »