Breaking News

Ramprahar Team

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन

मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे गुरुवारी (दि. 15) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. हृदय व फुप्फुसाच्या विकाराने त्रस्त असलेल्या सिन्हा यांच्यावर जुहू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ’छोटी सी बात’, ’रजनीगंधा’, ’पती, पत्नी और वो’, ’तुम्हारे लिए’, ’सफेद …

Read More »

पुरावेळी राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय?

सदाभाऊ खोत यांचा संतप्त सवाल वर्धा : प्रतिनिधी  ’पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? पुराच्या वेळी आले असते, पाण्यात उतरले असते तर स्वागत केले असते,’ अशी बोचरी टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीला पूरग्रस्तांशी देणं-घेणं नसून ते केवळ कोरडी सहानुभूती दाखवत आहेत, …

Read More »

विद्यार्थ्याला कारने चिरडले

औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजावंदन सोहळ्यासाठी शाळेत जात असताना नऊ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारने चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. झाल्टा फाटा येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली. संभाजी शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेतील ध्वजावंदन सोहळ्यासाठी संभाजी निघाला होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका …

Read More »

भोगाव खुर्दमध्ये जवानाकडून ध्वजारोहण

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात स्वातंत्र्यदिनासोबत रक्षाबंधनाचा दुहेरी आनंद गावागावांतून पाहण्यास मिळाला. भोगाव खुर्द ग्रामपंचायतीत सरपंच राकेश उतेकर यांनी ध्वजारोहणाचा मान यंदा भारतीय सैन्यातील जवानास देऊन आगळावेगळा पायंडा पाडला, तर गोळेगणी शाळेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सर्व माजी सैनिकांचा गौरव केला. तालुक्यातील राजकीय स्थित्यंतराने गाजलेली ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय …

Read More »

पाणीदार जिल्ह्यासाठी जलसत्याग्रह चळवळ

सर्वांना सहकार्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन चंद्रपूर : वृत्तसंस्था  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न पाहिले असून त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे …

Read More »

खंबीर आणि सजग सरकार

भारताच्या भविष्यातील परराष्ट्र धोरणाची दिशा यातून स्पष्ट व्हावी. देशासमोरील मोठ्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी पाणीटंचाईकडे सर्वाधिक लक्ष वेधले. विविध मार्गांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे सांगून आपले सरकार या आव्हानाचा सामना प्रामाणिकपणे करते आहे याची खात्री त्यांनी देशवासियांना दिली. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 मागे घेण्याचा ऐतिहासिक …

Read More »

दरडींची टांगती तलवार

रायगड जिल्ह्यात यंदा अतिपावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पूर आला. रस्ते खचले. घरांचे नुकसान झाले. दरडी कोसळल्या.   यापूर्वी दक्षिण रायगडात दरडी कोसळत होत्या. यंदा उत्तर रायगडातदेखील दरडी कोसळल्या आहेत. दरवर्षी दरडग्रस्त गावांची संख्या वाढतेय ही चिंतेची बाब आहे. जुलै 2005च्या अतिवृष्टीनंतर झालेल्या पाहणीत रायगड जिल्ह्यातील 84 गावांचा दरडग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात …

Read More »

बँक ऑफ इंडियातर्फे महाग्राहक मेळावा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडिया नवी मुंबई विभागीय कार्यालया तर्फे बुधवारी (दि. 14) रबाळे, नवी मुंबई येथे महा ग्राहक मेळावा आयोजित करण्यात आला होता. उद्योजक, व्यायसायिक, व्यापारी अशा विविध क्षेत्रांतील 200 पेक्षा अधिक ग्राहक या वेळी उपस्थित होते. नवी मुंबई विभागाचे विभागीय व्यवस्थापक विश्वजीत सिंह यांनी आपल्या …

Read More »

महाराष्ट्रातील 46 पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

मुंबई : प्रतिनिधी स्वातंत्र्य दिनानिमित्त देण्यात येणार्‍या राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण 46 पोलिसांना राष्ट्रपती पदके जाहीर झाली आहेत. त्यातील पाच जणांना विशेष सेवेसाठी, तर 41 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील पाच अधिकार्‍यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने गौरवण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील …

Read More »

रायगड जिल्ह्यातील एकही ग्रामपंचायतीला लाल कार्ड नाही

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. पिण्याच्या पाण्याचे धोकादायक स्त्रोत मिळाल्यामुळे दिले जाणारे लालकार्ड यंदा एकाही ग्रामपंचायतीला मिळालेले नाही. 62 ग्रामपंचायतीमध्ये मध्यम जोखमीचे स्त्रोत आढळले, त्यांना पिवळे कार्ड देण्यात आले. सुरक्षित स्त्रोत असलेल्या 746 ग्रामपंचायतीना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. जनतेला शुद्ध व …

Read More »