Breaking News

Ramprahar Team

‘सीकेटी’च्या विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यात सहभाग

पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, खांदा कॉलनी, नवीन पनवेल येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी रक्षाबंधनाचा सण कुष्ठरोग बांधवांसमवेत साजरा केला. महाविद्यालयातील ध्वजारोहणानंतर शांतिवन, नेरे येथे हा कार्यक्रम झाला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी …

Read More »

देशात आता परिपूर्ण एकता

कलम 370 रद्दवर अर्चना ठाकूर यांची भावना पनवेल ः रामप्रहर वृत्त स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस जम्मू-काश्मीरमधील कलम 370 केंद्र सरकारने रद्द केल्यामुळे सर्व भारतीयांचे स्वप्न पूर्ण झाले असून भारताची विविधतेत एकता ही संकल्पना खर्‍या अर्थाने परिपूर्ण झाली आहे, अशी भावना अर्चना परेश ठाकूर यांनी व्यक्त केली. भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात …

Read More »

ग्राहकांना लुटणार्या बँकांना आरबीआयचा झटका

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आरबीआयने बँकांना फटकारले असून एटीएम ट्रांझेक्शन लिमिटच्या नावाखाली ग्राहकांना लुटण्याच्या प्रकारावर चाप लावला आहे. बँकांकडून महिन्याला केवळ पाच ट्रान्झेक्शन मोफत दिली जात होती. यानंतर प्रत्येक ट्रान्झेक्शनला 20 ते 25 रुपयांचे शुल्क आकारले जात होते. बर्‍याच वेळा बँकांच्या एटीएममध्ये पैसे नाहीत किंवा सर्व्हर डाऊन असल्याने ट्रान्झेक्शन फेल …

Read More »

पाकपासून स्वतंत्र होण्यास मदत करा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारताचा 73वा स्वातंत्र्य दिन देशातच नव्हे, तर पाकिस्तानातील बलुचिस्तानातही अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणार्‍या कार्यकर्त्यांनी सर्व भारतीय बंधू-भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. बलुचिस्तान पाकचा भाग नाही. त्यामुळे आम्हाला पाकपासून स्वतंत्र होण्यासाठी भारताने मदत करावी, असे आवाहन बलुचिस्तानातील कार्यकर्त्यांनी केले. बलुचिस्तान हा पाकमधील …

Read More »

ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे निधन

मुंबई ः प्रतिनिधी ज्येष्ठ अभिनेत्री विद्या सिन्हा यांचे गुरुवारी (दि. 15) अल्पशा आजाराने निधन झाले. त्या 72 वर्षांच्या होत्या. हृदय व फुप्फुसाच्या विकाराने त्रस्त असलेल्या सिन्हा यांच्यावर जुहू येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ’छोटी सी बात’, ’रजनीगंधा’, ’पती, पत्नी और वो’, ’तुम्हारे लिए’, ’सफेद …

Read More »

पुरावेळी राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय?

सदाभाऊ खोत यांचा संतप्त सवाल वर्धा : प्रतिनिधी  ’पूर आला तेव्हा राष्ट्रवादीवाले मसनात गेले होते काय? पुराच्या वेळी आले असते, पाण्यात उतरले असते तर स्वागत केले असते,’ अशी बोचरी टीका राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर केली आहे. राष्ट्रवादीला पूरग्रस्तांशी देणं-घेणं नसून ते केवळ कोरडी सहानुभूती दाखवत आहेत, …

Read More »

विद्यार्थ्याला कारने चिरडले

औरंगाबाद : स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजावंदन सोहळ्यासाठी शाळेत जात असताना नऊ वर्षीय विद्यार्थ्याला भरधाव कारने चिरडले. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. झाल्टा फाटा येथे गुरुवारी सकाळी ही घटना घडली. संभाजी शिंदे असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शाळेतील ध्वजावंदन सोहळ्यासाठी संभाजी निघाला होता. स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका …

Read More »

भोगाव खुर्दमध्ये जवानाकडून ध्वजारोहण

पोलादपूर ः प्रतिनिधी तालुक्यात स्वातंत्र्यदिनासोबत रक्षाबंधनाचा दुहेरी आनंद गावागावांतून पाहण्यास मिळाला. भोगाव खुर्द ग्रामपंचायतीत सरपंच राकेश उतेकर यांनी ध्वजारोहणाचा मान यंदा भारतीय सैन्यातील जवानास देऊन आगळावेगळा पायंडा पाडला, तर गोळेगणी शाळेने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सर्व माजी सैनिकांचा गौरव केला. तालुक्यातील राजकीय स्थित्यंतराने गाजलेली ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त भारतीय …

Read More »

पाणीदार जिल्ह्यासाठी जलसत्याग्रह चळवळ

सर्वांना सहकार्याचे सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन चंद्रपूर : वृत्तसंस्था  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न पाहिले असून त्याअनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यात विविध सिंचन प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. जलसाक्षरता अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींच्या सहकार्यातून जिल्हा पाणीदार करण्यासाठी जलसत्याग्रह चळवळ उभी करण्यात येणार असून याकरिता सर्वांनी सहकार्य करावे, असे …

Read More »

खंबीर आणि सजग सरकार

भारताच्या भविष्यातील परराष्ट्र धोरणाची दिशा यातून स्पष्ट व्हावी. देशासमोरील मोठ्या आव्हानांचा उल्लेख करताना त्यांनी पाणीटंचाईकडे सर्वाधिक लक्ष वेधले. विविध मार्गांनी पाणीटंचाईचा प्रश्न सोडवण्याची गरज असल्याचे सांगून आपले सरकार या आव्हानाचा सामना प्रामाणिकपणे करते आहे याची खात्री त्यांनी देशवासियांना दिली. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 मागे घेण्याचा ऐतिहासिक …

Read More »