Breaking News

Ramprahar Reporters

राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेचे रविवारी पारितोषिक वितरण

नाट्य-सिने क्षेत्रातील दिग्गजांची लाभणार उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये होत असलेल्या सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (दि. …

Read More »

समाजसेवक अण्णा हजारे यांचा शिवसेनेला इशारा

अहमदनगर : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उपोषणाला बसणार्‍या ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी केंद्रीय मंत्री तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे उपोषण स्थगित केले आहे. केंद्र सरकारने सुचविलेल्या उपायांबाबत आपण समाधानी असल्याचेही ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले, पण शिवसेनेक़डून मात्र अण्णांच्या या सहकार्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित …

Read More »

नाट्य परीक्षण समितीवर शामनाथ पुंडे

पनवेल : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे नाट्यनिर्मिती संस्थांना नवीन नाट्य निर्मितीसाठी अनुदान योजनेंतर्गत नाट्य परीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अशासकीय सदस्यपदी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह शामनाथ पुुंडे यांची नियुक्ती झाली आहे.या नियुक्तीबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार …

Read More »

पुजारा, रहाणेला बढती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था आयसीसीने शनिवारी (दि. 30) जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली चौथ्या स्थानी कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील पहिल्या कसोटीनंतर विराट पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा फटका विराटला बसला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने अव्वल स्थान कायम राखले आहे, तर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज …

Read More »

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी; भारताचे पारडे जड

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारत आणि इंग्लंड यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेची सुरुवात होणार आहे. चेन्नईत भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या 9 पैकी 5 कसोटीत विजय मिळवला आहे. या दोन्ही संघांतील अखेरच्या लढतीत भारताने 75 धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा करुण नायरने 303, तर केएल राहुलने 199 धावा केल्या होत्या. या मैदानावर …

Read More »

रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द

87 वर्षांची परंपरा खंडित नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाभारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) देशातील सर्वांत मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कळविली आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रूपात दररोज 45 हजार रुपये कमावणार्‍या …

Read More »

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचे ः राष्ट्रपती रामनाथ कोविंद नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासंसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारी (दि. 30) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. या वेळी नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आवर्जून उल्लेख केला. केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचे कौतुक करतानाच राष्ट्रपतींनी कृषी कायदे शेतकर्‍यांच्या फायद्याचे …

Read More »

फडणवीसांची यशस्वी शिष्टाई; अण्णांचे उपोषण मागे

अहमदनगर : प्रतिनिधीज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी येथे सुरू होणारे उपोषण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे अखेर टळले आहे.केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी शुक्रवारी (दि. 29) अण्णा हजारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विस्तृतपणे चर्चा केली. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.

Read More »

पनवेल पंचायत समितीचा शिक्षण विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अलिबाग ः प्रतिनिधीपनवेल तालुका पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी नवनाथ साबळे यांना शुक्रवारी (दि. 29) 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  (एसीबी) रायगड पथकाने ही धडक कारवाई केली.रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक उमेश इंगोले यांची यवतमाळ जिल्ह्यात बदली झाली. तेथे ते कार्यरतही झाले. बदलीच्या वेळी …

Read More »

मर्यादित वेळेसाठी लोकलसेवेचा निर्णय दिशाहीन आणि हास्यास्पद

भाजपची सडकून टीका मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाच्या संकटामुळे सुमारे 10 महिन्यांपूर्वी बंद झालेली व त्यानंतर मर्यादित प्रवाशांसाठी सुरू असलेली मुंबईतील उपनगरीय रेल्वेसेवा येत्या 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली होणार आहे, मात्र प्रवासाच्या वेळा मर्यादित असणार आहेत. तसे पत्र राज्य सरकारने मध्य व पश्चिम रेल्वेला लिहिले आहे. त्यामुळे सर्व प्रवाशांना ठरावीक वेळेतच प्रवास …

Read More »