Breaking News

Ramprahar Reporters

वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघ जिंकणे महत्त्वाचे

कर्णधार अजिंक्य रहाणेची भावना मुंबई : प्रतिनिधी‘माझ्या धावांमुळे जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा त्या माझ्यासाठी खूप खास असतात. माझ्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा कसोटी सामना आणि मालिका जिंकणे हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे असते,’ असे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळविणार्‍या भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने म्हटले आहे.अ‍ॅडलेडला फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले, …

Read More »

टीम इंडियाच्या यशाचे श्रेय घेण्यास द्रविडचा नकार

बंगळुरू : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव झाला. अनेक तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसाठी तयार करणारा द्रविड या विजयाचा मानकरी असल्याचे अनेकांनी म्हटल आहे. द्रविडने मात्र ऑस्ट्रेलियातील यशासाठी कारण नसताना मला श्रेय दिले जात आहे, असे मत व्यक्त केले आहे.एका वृत्तसमूहाशी …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांनाही आरोग्य सेवा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड व नॉन कोविड रुग्णांनाही आरोग्यसेवा देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.      पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब …

Read More »

काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कायद्यांबाबत ढोंगीपणा का? : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीकाँग्रेसने बाजार समिती रद्द करण्याचे आश्वासन दिले. 2006मध्ये कंत्राटी शेतीचा कायदा महाराष्ट्राने केला. महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? हा ढोंगीपणा का, अशा सवालांच्या फैरी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला उद्देशून झाडल्या आहेत.केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटना आंदोलन करीत …

Read More »

रायगड कोणाला आंदण दिलेले नाही !

अनंत गीते यांचा सुनील तटकरेंना सूचक इशारा पेण : प्रतिनिधीराज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असून, सुनील तटकरे रायगडचे खासदार, तर त्यांची कन्या आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री आहेेत, मात्र रायगड कोणाला आंदण दिलेले नाही असा इशारा शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी कोणाचेही नाव न घेता मित्रपक्षांना लगावला …

Read More »

चिकन महोत्सवाला पेणमध्ये उदंड प्रतिसाद

मान्यवरांसह नागरिकांनी मारला यथेच्छ ताव पेण : प्रतिनिधीराज्यात बर्ड फ्लूचा फैलाव झाला असून, पेणमधील पशूसंवर्धन विभागाच्या केंद्रातील कोंबड्यांसुद्धा बर्ड फ्लूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शासनाने आजूबाजूची चिकनची दुकाने बंद केली असल्याने नागरिकांमध्ये चिकन खाण्याबद्दल भीती निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे  पोल्ट्री व्यवसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. या …

Read More »

मुंबई महापालिकेत भाजपचाच महापौर बसणार

राज ठाकरेंच्या भेटीनंतर आमदार प्रसाद लाड यांचे सूचक विधान मुंबई : प्रतिनिधीभाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शुक्रवारी (दि. 23) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. यानंतर आमदार लाड यांनी माध्यमांशी संवाद साधत मुंबई महानगरपालिकेत भाजपचच महापौर बसेल, असा विश्वास व्यक्त केला.‘भारतीय जनता पक्ष मुंबई …

Read More »

नंदुरबार येथे जीप दरीत कोसळून सहा मजूर जागीच ठार

नंदुरबार : प्रतिनिधीनंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ घाटात खडकीजवळ मजुरांना घेऊन जाणारी जीप शनिवारी (दि. 23) सकाळी खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात सहा मजुरांचा मृत्यू झाला असून, 25हून अधिक गंभीर जखमी झाले आहेत.अपघात इतका भयंकर होता की जीपचा फक्त सांगडाच उरला आहे. दरीत ठिकठिकाणी मजुरांचे मृतदेह पडले होते. घटनेची माहिती मिळताच …

Read More »

बाळासाहेबांना फडणवीसांची मानवंदना; शिवसेनेला चिमटे

मुंबई : प्रतिनिधीशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मानवंदना दिली. यानिमित्ताने त्यांनी बाळासाहेबांचे नेतृत्व, कर्तृत्व व वक्तृत्वावरून शिवसेनेला चिमटे काढले आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे कौतुक केले आहे. बाळासाहेबांचे चैतन्यमूर्ती, तेजमूर्ती, स्वाभिमान आणि राष्ट्रीयत्वाचे मूर्तिमंत प्रतीक असे वर्णन करण्यात आले आहे …

Read More »

मविआ सरकार गेंड्याच्या कातडीचे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा घणाघात पुणे : प्रतिनिधीमहाविकास आघाडी सरकारने सातत्याने वनवासी बांधवांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. या सरकारमुळे राज्यातील वनवासी बांधवांच्या आयुष्यात अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत, पण राज्य सरकारने या समस्यांचे निराकरण करण्याकडे कानाडोळा केला आहे. कारण हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …

Read More »