Breaking News

Monthly Archives: April 2019

चला झाडे खिळे मुक्त करू या!

खोपोली सहज सेवा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम खोपोली : प्रतिनिधी : येथील सहज सेवा फाऊंडेशनच्या सदस्यांनी खोपोली गावातील व आजूबाजूच्या परिसरात असणारी झाडे खिळे मुक्त करण्याचा संकल्प करून, शुभारंभ केला. शहरातील लक्ष्मीनगर रोडवर असलेल्या झाडाला सदस्यांनी प्रथम बॅनरपासून मुक्त केले. त्यानंतर त्या झाडावर असणार्‍या स्टेपलरच्या पिना व खिळे काढून टाकण्यात आले. …

Read More »

रोह्यातील मिनीडोअर चालकाने दाखविला प्रामाणिकपणा

रोहे ः प्रतिनिधी : येथील मिनीडोअर चालक विक्रांत विलास राणे यांना रस्त्यावर पिशवीत सापडलेले 29100 रुपये त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने मूळ मालकाला परत केल्याने त्याच्या या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. रोहा तालुक्यातील इंदरदेव ठाकूरवाडी येथील गोविंद भाग्या शिद याला घरकुलचे 29100 रुपये मिळाले होते. ते पैसे बुधवारी (दि. 3) हरवले. …

Read More »

नागोठणे ग्रामपंचायतीची धडक कारवाई

इमारतीचा पाणीपुरवठा केला तात्पुरता बंद नागोठणे : प्रतिनिधी : पाण्याच्या उधळपट्टीबद्दल वारंवार सूचना देऊनही त्याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करणार्‍या नागोठण्यातील एका इमारतीचा पाणीपुरवठा ग्रामपंचायतीने तात्पुरता बंद करण्याचा निर्णय  घेतला असून, दंडाची रक्कम भरल्यानंतरच या इमारतीचा पाणीपुरवठा पूर्ववत चालू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. नागोठण्यातील …

Read More »

वैकल्पिक वाद निवारण केंद्रामुळे सर्वसामान्यांना लाभ -न्यायमूर्ती छागला

अलिबाग : प्रतिनिधी : अलिबाग येथे वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नव्या इमारतीचे कोनशिला अनावरण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड-अलिबागचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. अलिबाग येथील विधी सेवा प्राधिकरण येथे …

Read More »

कोकण भवनच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

बेलापूर : रामप्रहर वृत्त : सीबीडीतील कोकण भवन येथे आपत्कालीन सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या अग्निरोधक यंत्रणेची मुदत जानेवारी महिन्यातच संपली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्य शासनाच्या विविध सुमारे 72 विभागाची कार्यालये असलेल्या सीबीडी येथील कोकण भवनला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले …

Read More »

उरणमध्ये पार्थ पवारांच्या प्रचार दौर्याला अल्प प्रतिसाद

जेएनपीटी : प्रतिनिधी : मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शेकाप महाआघाडीच्या वतीने शरद पवारांचे व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे उमेदवार असल्याने शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यात काटे की टक्कर होणार, अशी चर्चा राजकीय गोटात वर्तविण्यात येत आहे, मात्र मावळ लोकसभा मतदारसंघातील उरणच्या …

Read More »

सांगुर्लीच्या नशामुक्ती केंद्रातून 50 जणांचे पलायन

पनवेल : बातमीदार : सांगुर्ली येथील हार्मोनी फाऊंडेशन, अल्कोलिक अ‍ॅन्ड ड्रग्ज रिहॅबिलेटेशन सेन्टर चालविणार्‍या विरोधात शहर पोलिसांनी 42 वर्षीय इसमाच्या मृत्यू प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. येथे होणारी मारहाण व उपासमारीच्या या भीतीमुळे येथील सेंटरमधून 50 ते 60 जणांनी पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक चौकशी …

Read More »

गुढीपाडवा आणि स्वातंत्र्याचा संकल्प!

चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढी पाडवा. घराघरांवर आकाशाकडे झेपावणारी गुढी, भगवा ध्वज आणि झेंडूची तोरणे. भारतभूमीवरून आकाशतत्त्वाला स्पर्श करून दशदिशांना व्यापून टाकणारे उदात्त संकल्प करण्याचा दिवस.राष्ट्राची सार्वभौमता, अखंडता, एकात्मता आणि स्वतंत्रता ह्याहून माणसाला दुसरे प्रिय काय असते? आपल्यावर मोगलांनी इंग्रजांनी, काँग्रेसने राज्य केले. मोगलांनी ह्या देशाचे भावविश्व नाकारले. इंग्रजांनी हिंदूंना अराष्ट्रीय …

Read More »

लोकशाहीचा रणसंग्राम

सतराव्या लोकसभेचा रणसंग्राम आता चांगलाच रंगात आलाय. सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगतोय. आरोप, प्रत्यारोपाच्या फैर्‍याही झडू लागल्यात. आणखी महिनाभर तरी हा रणसंग्राम चालणार असल्याने देशातील जनतेची एकप्रकारे करमणूकच होत राहणार आहे. गेल्या काही वर्षात प्रचारांचा ट्रेंडही बदलला असल्याने आता गावागावातून स्पीकरद्वारे होणारा जाहीर प्रचार पूर्णपणे थंडावला आहे. आचारसंहितेचा धसका …

Read More »

इंडियन पॉलिटिकल लीग

इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचे बारावे पर्व रंगात येऊ लागले असताना, दुसरीकडे इंडियन पॉलिटिकल लीग म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या 17व्या आवृत्तीसाठी राजकीय फटकेबाजी सुरू झाली आहे. इथे यंदाही सामना दोन प्रमुख टीम (पक्ष) भाजप आणि काँग्रेस यांच्यात असून, उभय कर्णधार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एकमेकांसमोर पुन्हा एकदा …

Read More »