Breaking News

Yearly Archives: 2019

नालेसफाईच्या मुद्यावर खोपोली पालिका सभेत गोंधळ

खोपोली ः प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे शहराच्या विविध सखल भागात तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला, याबाबत नागरिकांनी स्थानिक नगरसेवकांना दोष दिला, याचे चांगलेच पडसाद खोपेाली पालिका सर्वसाधारण सभेत उमटले. प्रश्नोत्तरांच्या तासात बहुतांश नगरसेवक, नगरसेविकांनी प्रशासनाला धारेवर धरीत सभागृह डोक्यावर घेतल्याने, प्रचंड गोंधळ झाला. शहरातील विविध भागातील …

Read More »

आमदार प्रविण दरेकर यांची भाजप रायगड जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती

महाड ः प्रतिनिधी ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हा प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या वेळी भाजपाच्या रायगड जिल्हा प्रभारी आमदार प्रविण दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरेकरांच्या या नियुक्तीने जिल्ह्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. आमदार प्रवीण दरेकर हे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर …

Read More »

पनवेल ः पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नीलेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच भरत पाटील, काळुंद्रे विभागीय भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संतोष पाटील, किशोर बाबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित …

Read More »

डॉ. म. सु. पाटील विशेषांकाचे प्रकाशन

मुंबई : रामप्रहर वृत्त आगरी दर्पणच्या डॉ. म. सु. पाटील विशेषांकाचे प्रकाशन शुक्रवारी (दि. 19) त्यांच्या जनमदिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक नीला उपाध्ये यांच्या हस्ते म. सुंच्या निवासस्थानी मुलुंड येथे कौटुंबीक वातावरणात झाले. प्रारंभी कवी अरुण म्हात्रे यांनी डॉ. म. सु. पाटील यांच्या साहित्याविषयी सविस्तर माहिती देऊन त्यांच्या …

Read More »

15 ऑगस्टच्या भाषणासाठी पंतप्रधानांनी मागविल्या सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्य दिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करणार असून या भाषणासाठी पंतप्रधानांनी जनतेकडून सूचना मागवल्या आहेत. पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे हे दुसरे पर्व असून या पर्वातील पहिला स्वातंत्र्य दिन अधिक खास …

Read More »

कुख्यात ऑईलमाफिया मंगेश ठाकूर जेरबंद ; मुंबई पोलिसांची यशस्वी कारवाई

उरण ः प्रतिनिधी मुंबईजवळील अरबी सागरी परीक्षेत्रात तेलाची तस्करी करणारा कुविख्यात ऑईलमाफिया मंगेश ठाकूर उर्फ हाजी मस्तानला मुंबईतील यलोगेट पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुरेखा कपिल आणि त्यांच्या सहकार्‍यांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. येलोगेट पोलीस ठाण्यात त्याच्यावर तेल तस्करीचा गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरारी झाला होता. मंगेश ठाकूर हा …

Read More »

पावसाळ्यातील कडक उन्हाने म्हसळाकरांसह रायगडकर तापले

म्हसळा ः प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील भातशेतीची बहुतांश लावणी पूर्ण झाली आहे. मंगळवार दि.16 जुलैपासून आज शुक्रवार दि. 19पर्यंत जिल्ह्यात पावसाने पाठ फीरवल्याने भात पिके पिवळी पडण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त व उकाड्याने हैराण झाल्याने नागरीक बेजार झाले आहेत. जिल्ह्यांत आजपर्यंत सरासरी 1588.75 मि.मी. पर्जन्यमान आहे. मागील वर्षी पेक्षा 53.35. मि.मी.ने पेक्षाही …

Read More »

सरकारच्या कामांची माहिती घराघरात पोहोचवा

कर्जत येथील महिला मेळाव्यात अश्विनी पाटील यांचे आवाहन कर्जत : बातमीदार पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारने केलेल्या कामांची माहिती द्यावी आणि महिलांना आपलेसे करावे, असे आवाहन भाजप कर्जत विधानसभा मतदारसंघ संयोजिका अश्विनी पाटील यांनी कर्जत येथे केले. कर्जत विधानसभा मतदारसंघातील भाजप महिला मोर्चा पदाधिकार्‍यांची बैठक …

Read More »

आयआरबीचे कंत्राटी कामगार संपावर

खोपोली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या आयआरबी कंपनीच्या विविध विभागात काम करणार्‍या 179 कंत्राटी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. गेल्या 18 वर्षांपासून काम करणारे हे कामगार विविध मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत. भूमिपुत्रांना टोल सुरू असेपर्यंत कामाची हमी, 1 एप्रिल 2019पासून प्रलंबित असलेली वेतनवाढ मिळावी, आयआरबीला …

Read More »

दोन वर्षांपासून आपटवणे शाळा दुर्लक्षित

मंदिरामध्ये भरतात वर्ग; तहसीलदारांकडून पाहणी पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील आपटवणे येथील प्राथमिक शाळेचे छप्पर व भिंत सुमारे दोन वर्षांपूर्वी कोसळली. तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका पोहचू नये व त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता ग्रामस्थांच्या सहकार्याने येथील काळभैरव मंदिरात शाळा भरविली जात आहे, मात्र आजतागायत शाळेच्या इमारत दुरुस्तीकडे रायगड जिल्हा …

Read More »