Breaking News

Yearly Archives: 2019

आज टीम इंडियाची यजमान इंग्लंडशी लढत

लंडन : वृत्तसंस्था विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील प्रबळ दावेदार असलेले दोन संघ भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये रविवारी (दि. 30) साखळी सामना रंगणार आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत दुसर्‍या, तर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारतीय संघाला एक विजय पुरेसा आहे. दुसरीकडे इंग्लंडला सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे …

Read More »

उलवे नदीच्या परिवर्तीत चॅनलची सिडकोच्या उपाध्यक्षांनी केली पाहणी

सिडको वृत्त – आज (दि. 29) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाभा क्षेत्रातील उलवे नदीच्या परिवर्तीत चॅनलची सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पाहणी केली. उलवे नदीच्या 3.2 कि.मी. लांबीच्या परिवर्तित केलेल्या चॅनेलचे कार्यान्वयन कशाप्रकारे होत आहे, याची पाहणी लोकेश चंद्र यांनी यावेळी केली. उलवे नदीचा प्रवाह वळविण्याचे काम …

Read More »

जेएनपीटीचा ‘चौकार’; चौथ्यांदा पटकाविला उत्कृष्ट बंदर पुरस्कार

उरण : प्रतिनिधी – देशातील पहिल्या क्रमांकाचे बंदर असलेल्या जेएनपीटीने चौथ्या इंडिया मेरीटाईम पुरस्कार समारंभात या वर्षीचा उत्कृष्ट बंदर पुरस्कार पटकावून मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. या श्रेणीमध्ये देशातील उत्तम बंदरांना नामांकन मिळाले असून, जेएनपीटीने हा पुरस्कार जिंकला. उत्कृष्ट बंदर पुरस्कार श्रेणीमध्ये मालाची हाताळणी, वार्षिक वाढ, विस्तार योजना, नवीन पुढाकार, …

Read More »

सर्वांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे; नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांचे आवाहन

उरण : वार्ताहर – आरोग्य निरोगी राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपण सुदृढ राहू, असे प्रतिपादन उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केले. उरण नगर परिषद आणि लाईफ लाईन हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

कराडे खुर्द ग्रामपंचायतीतील काँग्रेसच्या सदस्यांसह कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त – भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांचा ओघ कायम आहे. कराडे खुर्द ग्रामपंचायतीतील काँग्रेसचे नवनिर्वाचीत सदस्य मुकेश पाटील यांच्यासह अनेकांनी काल शनिवारी (दि. 29) पक्ष प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन स्वागत केले. हा प्रवेश सोहळा माजी खासदार लोकनेते …

Read More »

पनवेल परिसरात नव्याने जलाशय निर्मितीसाठी शासनाने पुढाकार घ्यावा ; आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेल परिसरातील वाढती लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेता येथे नव्याने जलाशय निर्माण करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य विधिमंडळाच्या मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात केली. पनवेल परिसराला मुबलक पाणीपुरवठा व्हावा या दृष्टिकोनातून शासनाने योग्य ती उपाययोजना करावी याकरिता आमदार …

Read More »

‘रयत’च्या केंद्राचे उद्घाटन ; खारघरमधील सोहळ्यास मान्यवरांची लाभली उपस्थिती

खारघर : प्रतिनिधी रयत शिक्षण संस्था सातारा, सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि टाटा टेक्नॉलॉजीज लि. यांच्या संयुक्त विद्यमाने खारघर सेक्टर 11 येथे उभारण्यात आलेल्या रयत सेन्टेनरी सेंटर फॉर इन्व्हेशन, इनोव्हेशन अ‍ॅण्ड इक्युबेशन (आरसी-सीआयआयआय)चे उद्घाटन शुक्रवारी (दि. 28) ‘रयत’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. …

Read More »

पनवेल मनपातर्फे स्वच्छता स्पर्धा

पनवेल : प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2020मध्ये स्वच्छताविषयक उपक्रम लोकाभिमुख होण्याकरिता पनवेल महापालिकेतर्फे स्वच्छता स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, या स्पर्धेची घोषणा शुक्रवारी (दि. 28) करण्यात आली. या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त संध्या बावनकुळे , सहाय्यक आयुक्त चंद्रशेकर खामकर, …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे यांचा आज जाहीर सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल तालुका भाजप, शिवसेना, रिपाइं व मित्रपक्ष महायुतीच्या वतीने मावळ लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांचा जाहीर सत्कार शनिवारी (दि. 29) सकाळी 11 वाजता शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते व …

Read More »

मुसळधार पावसाने रायगडला झोडपले

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याला शुक्रवारी (दि. 28) मुसळधार पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले. कामावर निघालेले नोकरदार आणि शाळा-कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थ्यांना याचा सर्वात जास्त फटका बसला. दरम्यान, या पावसामुळे जलसंकट टळले असून, बळीराजाही सुखावल्याचे चित्र आहे. गेल्या महिनाभरापासून रुसून बसलेला मान्सून अखेर जिल्ह्यात …

Read More »