अलिबाग : प्रतिनिधी महाड तालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना लायन्स क्लबतर्फे जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली. तसेच आरोग्य शिबिरांचे आयोजन करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यात दरडी कोसळल्या. त्यात शंभरपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. अनेक घर कासळली. पूरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले. लायन्स क्लब ऑफ …
Read More »Monthly Archives: August 2021
भारत उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजिथे वर्षानुवर्ष कागदपत्रांमध्ये, कायद्यांमध्ये गुंतवून ठेवणे ही प्रशासनाची ओळख होती, तोच भारत इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये मोठी झेप घेत आहेत. जिथे वर्षानुवर्ष कामगारांना, उद्योगांना शेकडो कायद्यांच्या जंजाळात गुंतवून ठेवले गेले, तिथे आज डझनावरी कायदे चार लेबर कोर्टमध्ये सामावले गेले आहेत. जिथे शेतीला फक्त गुजराण करण्याचे माध्यम मानले …
Read More »विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणार्या शाळेच्या विरोधात पालक आंदोलनाच्या पावित्र्यात
कर्जत : बातमीदार शाळेची फी भरली नाही म्हणून नेरळ येथील एलएईस शाळेतील 200 विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या बाबत कर्जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे दाद मागूनही कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक शाळेच्या विरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. शाळेची फी भरली नाही, म्हणून नेरळ येथील लॉर्ड …
Read More »ठाकरे सरकारची इयत्ता कंची?
शैक्षणिक बट्ट्याबोळावरून भाजपचा निशाणा मुंबई ः प्रतिनिधीअठरा वर्षांखालील मुलांचे अद्याप लसीकरण झालेले नसताना अकरावीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) प्रत्यक्ष पद्धतीने घेण्याचा राज्याचा निर्णय मनमानी, कठोर, अतार्किक, विसंगत आणि कोणत्याही अधिकाराविना असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने मंगळवारी ओढले. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.विद्यार्थी, पालकांना प्रचंड मानसिक तणाव देऊन, शिक्षणाचा …
Read More »नेरळ एसटी स्टँडकडे जाणार्या रस्त्याची साईडपट्टी गेली वाहून
रस्त्याला संरक्षक भिंत बांधण्याची मागणी कर्जत : बातमीदार नेरळ एसटी स्टँडकडे जाणार्या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. त्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मातीचा भराव टाकून साईडपट्टी बनविण्यात आली होती. मात्र जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत माती वाहून गेल्याने या रस्त्याची साईडपट्टी पूर्णपणे खचली आहे.दरम्यान,रस्त्याच्या खालील भागात रायगड जिल्हा …
Read More »बोरघाटात मैद्याचा ट्रक उलटला
खोपोली : प्रतिनिधी मुंबई – पुणे महामार्गावर बोरघाटातील मेकॅनिकल पॉईंटजवळ मैदा भरलेल्या पोत्यांचा ट्रक रस्त्यावरच उलटला. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली, ही वाहतूक अन्य मार्गांनी वळवावी लागली. मैद्याची पोती भरलेला ट्रक पुण्याकडून मुंबईकडे जात होता.बोरघाटातील मेकॅनिकल पॉईंटजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्यातच आडवा झाला. सुदैवाने या अपघातात …
Read More »एमआयडीसीबाधित शेतकर्यांची भूमिका शासनाकडे मांडणार -आमदार रविशेठ पाटील
पेण : प्रतिनिधी तालुक्यातील नियोजीत डोलवी औद्योगिक वसाहतीला स्थानिक शेतकर्यांचा विरोध असून, त्याबाबत लवकरच संबंधित मंत्री आणि अधिकार्याकडे बैठक लावून शेतकर्यांची भूमिका शासनाकडे मांडण्यात येईल, अशी ग्वाही पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी दिली. डोलवी औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत पेण तालुक्यातील काराव, गडब, डोलवी, वडखळ बोरी ग्रामपंचायत …
Read More »बळी वर्षासहलीचे, खापर मात्र धरणावर!
खोपोली : प्रतिनिधी वर्षा पर्यटनात खालापूर तालुक्यात दोन महिन्यांत पाच तरुणांचा दुर्दैवी मृत्यू होऊनदेखील प्रशासन बघ्याच्या भूमिकेत असून, ठोस कारवाईसाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे. पावसाळा सुरू होताच तरुणाईला वर्षासहलीचे वेध लागतात. धबधबा, धरण परिसरात तरुण मोठ्या प्रमाणात एक दिवसाची मौजमजा करण्यासाठी येतात. मुंबई, नवी मुंबईपासून वर्षा …
Read More »पोलादपुरातील आपद्ग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अनुज्ञा साथी फाऊंडेशनचे मदतकार्य पोलादपूर : प्रतिनिधी तालुक्यातील कुडपण बुद्रुक, कुडपण खुर्द, शेलारांचे कुडपण, तुटवली, धनगरवाडी, खरवली, तळीये या आपद्ग्रस्त गावांना अनुज्ञा साथी फाऊंडेशनतर्फे जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली. फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रज्ञा कुलकर्णी, सचिव अनुराधा जाधव, खजिनदार मनिषा चव्हाण, अॅड. श्वेता लेवे, शुभांगी जाम्बरे, स्थानिक शिक्षक मारुती कळंबे, युवा कार्यकर्ते …
Read More »विजेच्या लपंडावाने जांभूळपाडा, परळीतील ग्रामस्थ हैराण
महावितरण कार्यालयाला निवेदन; आंदोलनाचा इशारा पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा व परळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मागील वर्षापासून खंडित वीजपुरवठ्याच्या समस्येचा सामना करत आहेत, मात्र या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघत नाही, त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. या भागात सुरळीत वीजपुरवठा करावा; अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या ग्रामस्थांनी महावितरणच्या जांभूळपाडा कार्यालयाला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper