Breaking News

Monthly Archives: September 2021

माणगाव बसस्थानकातील खड्ड्यांकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष; ‘रास्ता रोको’ करण्याचा भाजपचा इशारा

माणगाव : प्रतिनिधी येथील बसस्थानक परिसरात प्रचंड खड्डे पडले असून, त्याकडे राज्य परिवहन महामंडळ पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. माणगाव बसस्थानक लवकरात लवकर खड्डेमुक्त केले नाही, तर बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला आहे. माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे, मात्र …

Read More »

प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक परिषद आक्रमक; शिक्षण आयुक्तालयासमोर उपोषणाचा इशारा

अलिबाग : प्रतिनिधी राज्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्राथमिक विभाग) आक्रमक झाली आहे. राज्य सरकारकडून याबाबत कुठल्याच हालचाली होत नसल्याने अखेर आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. येत्या 21 ऑक्टोबर रोजी पुणे येथील आयुक्त कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी …

Read More »

मुरूड जुनीपेठ परिसरात खड्डेच खड्डे; गणपती आगमन आणि विसर्जनात अडसर

मुरूड : प्रतिनिधी शहरातील जुनीपेठ, लक्ष्मीखार, दस्तुरीनाका या ठिकाणच्या रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचून तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. या रस्त्यावरच्या तलावातूनच मुरूडमधील भाविकांना गणपती आणावे लागले, तसेच याच खड्डेमय रस्त्यावरून बाप्पांना विसर्जनासाठी न्यावे लागले.शहरातील रस्ते दुरुस्तीकडे मुरूड नगर परिषदेने लक्ष न दिल्यामुळे  नागरिकांना मोठा त्रास सहन …

Read More »

ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्गाची घाई कशासाठी

कोकणात जाण्यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आहे. त्याचबरोबर रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाला मंजुरी मिळालेली आहे. या दोन्ही महामार्गांचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. दोन राष्ट्रीय महामार्ग असताना महाराष्ट्र शासनाने आता ग्रीनफील्ड कोकण द्रूतगती महामार्ग या तिसर्‍या महामार्गाला मंजुरी दिली आहे. वास्तविक मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम, त्याचबरोबर रेवस-रेड्डी या सागरी महामार्गाचे काम …

Read More »

आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

नवी मुंबई :प्रतिनिधी विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात भाजप पदाधिकार्‍यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. राज्यातील कोकण, कोल्हापूर, सोलापूर पश्चिम व उत्तर महाराष्ट्र परिसरातील पदाधिकार्‍यांनानी विविध समाजहिताच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, शैक्षणिक साहित्य वाटप, चक्रीवादळात कोळी बांधवांना मदतीचा हात देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात …

Read More »

बँक ऑफ इंडियातर्फे हिंदी दिवस

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बँक ऑफ इंडियाच्या नवी मुंबई विभागीय कार्यालयात दरवर्षीप्रमाणे 15 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर या काळात हिंदी महिना साजरा करण्यात आला. विभागाच्यास सर्व शाखांनी दैनिक कामकाजामध्ये हिंदी भाषेचा वापर केला. मंगळवारी (दि. 14) हिंदी दिवस साजरा करण्यात आला. विभागीय प्रमुख अनिल जाधव व समस्त कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत …

Read More »

रक्तदान हेच श्रेष्ठदान!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उत्सव नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार गणेश नाईक यांचा वाढदिवस नवी मुंबईमध्ये आरोग्य उत्सव म्हणून साजरा झाला. दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महा रक्तदान शिबिरामध्ये 255 नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. तरुणाईचा सहभाग लक्षणीय होता. संपूर्ण नवी …

Read More »

‘ठाकूर इन्फ्रा’ला काम मिळाल्याचे कोणाला आश्चर्य का वाटावे?

पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांचा सवाल पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या स्थायी समितीने रस्ते कामाचे कंत्राट ठाकूर इन्फ्राला दिल्यामुळे आश्चर्य वाटण्याचे आणि कोणाच्याही भुवया उंचावण्याचे काय कारण, असा प्रश्न महापालिकेचा सभागृह नेता म्हणून आणि स्थायी समितीचा सदस्य या नात्याने मला पडला आहे, तसेच मी या कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा …

Read More »

पनवेलमध्ये गौरी-गणपतींच्या विसर्जनस्थळी चोख व्यवस्था

पनवेल : प्रतिनिधीपनवेलमध्ये गौरी-गणपतींचे मंगळवारी (दि. 14) भावपूर्ण वातावरणात नियोजनबद्धरीत्या विसर्जन करण्यात आले. महापालिका कार्यक्षेत्रातील कळंबोली, कामोठे, पनवेल, तळोजा या चारही प्रभागात एकूण 11 हजार 027 गणपतींचे विसर्जन करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पनवेल महापालिका व पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या उत्कृष्ट …

Read More »

महाराष्ट्र एटीएस झोपलेय का? -शेलार; मुंबईतील दहशतवादी अटकेप्रकरणी ठाकरे सरकारवर ताशेरे

मुंबई : प्रतिनिधीनवरात्र, रामलीला अशा हिंदू सणांमध्ये घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थाने सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलेय का, असा सवाल भाजप नेते आमदार अ‍ॅड. आशिष …

Read More »