Breaking News

Monthly Archives: August 2022

रोहा रेल्वे स्थानकात तिकीट जनजागृती अभियान

रोहे : प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या पनवेल ते रोहा विभागात मेमु सेवा वाढवून मिळाव्यात आणि मेल, एक्सप्रेस गाड्यांना पुन्हा रोहा येथे थांबा मिळावा, यासाठी रेल्वे संघर्ष समिती त़र्फे रोहा रेल्वे स्थानकात तिकीट जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने रेल्वे प्रवशांनी आपले पास रोहा, निडी, नागोठणे, कासू येथूनच काढावेत, असे आवाहन रेल्वे …

Read More »

खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

सलग सुट्यांमुळे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी खोपोली : प्रतिनिधी सेकंड सॅटरडेला लागून चार दिवस सुट्या असल्याने चाकरमानी व अन्य कुटुंबे मोठ्या संख्येने घराबाहेर पडले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून शनिवारी (दि. 13) द्रुतगती मार्गावर मोठ्या संख्येने वाहने होती. खालापूर टोल नाक्यावर तर दोन्ही बाजूला किमान दोन-तीन किमी अंतराच्या लांबचलांब  रांगा लागल्या …

Read More »

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कर्जतचे मोठे योगदान -वसंत कोळंबे

कर्जत : बातमीदार देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात कर्जत तालुक्याचे योगदान मोठे आहे, कर्जत तालुक्याच्या लढाऊ बाण्याची नोंद ब्रिटिश सरकारला इंग्लंडमध्ये घ्यावी लागली होती. तरुणांनी हुतात्मा भाई कोतवाल तसेच हिराजी पाटील यांचा आदर्श समोर ठेवावा, असे आवाहन इतिहास संशोधक वसंत कोळंबे यांनी शुक्रवारी (दि. 12) नेरळ येथे केले. देशाच्या अमृत महोत्सवी वर्षनिमित्त नेरळ …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 32

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवाmalharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). भारताला आपल्या गरजेच्या इतके टक्के इंधनाची आयात करावी लागते? अ. 100 टक्के    आ. 85 टक्के      …

Read More »

डाऊ सिद्धांत : तांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासाचा पाया

मागील लेखात आपण बाजारातील विविध अवस्था पहिल्या. आजच्या लेखात आपण बाजारातील महत्वाच्या सिद्धांताबद्दल जाणून घेऊयात. त्यातडाऊ सिद्धांत महत्वाचा मानला जातो. त्याविषयी.. चार्ल्स डाऊ यांनी बाजार आवर्तन समजून घेण्यासाठी आणि विश्लेषण करण्यासाठी तत्त्वांची एक मालिका विकसित केली, ज्याला डाऊ सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. हा सिद्धांत तांत्रिक विश्लेषणाच्या अभ्यासाचा पाया आहे. डाऊ …

Read More »

अचंबित करणार्या प्रवासानंतर भारत ‘टेक ऑफ’च्या तयारीत!

अनेक विरोधाभास आणि प्रचंड वैविध्यातहीभारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अभिमान बाळगावा,अशी दमदार वाटचाल भारताने केली आहे. सध्याच्या परिस्थितीचे देश म्हणून आकलन केले तर ही वाटचाल अचंबित करणारी आहे. आपल्या देशाच्यास्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्या मनात देशाच्या वाटचालीविषयीच्या काय भावना आहेत, यालाअतिशय महत्व आहे. आपण जेव्हा देशाविषयी बोलतो, तेव्हादेशात 75 वर्षे …

Read More »

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबागेत कॅरम, बॅडमिंटन स्पर्धा

अलिबाग : प्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अलिबाग येथील अधिकारी जिमखाना येथे महिला व पुरुष अधिकारी-कर्मचार्‍यांची कॅरम आणि बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवारी (दि. 12) झाली. जिल्ह्यात 12 ते 15 ऑगस्ट या कालावधीत जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कॅरम स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी तहसीलदार (पुनर्वसन) डॉ. सतीश कदम …

Read More »

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भिवंडी चौधरीपाडा आखाडा अव्वल

माऊली जगदाडेने जिंकली आव्हानाची कुस्ती अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे टाकादेवी स्पोर्ट्स क्लब आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत भिवंडी चौधरीपाडा आखाडा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. शिवाजी व्यायामशाळा आंदोशी अलिबागने द्वितीय, तर जय हनुमान तालिम संघ वाडगाव अलिबागने तृतीय क्रमांक पटकाविला. अंतिम आव्हानाची कुस्ती कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय …

Read More »

अतिवृष्टीमुळे घर कोसळून रोह्यात बालक गंभीर जखमी

नागोठणे : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे घर कोसळून लहान बालक जखमी होण्याची घटना शुक्रवारी (दि. 12) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रोहा तालुक्यातील पलस ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून परिसरात अतिवृष्टी सुरू असून त्यात स्थानिक रहिवासी रोहिदास घासे यांचे घर कोसळून त्यात त्यांचा तीन वर्षीय मुलगा रियांश घासे हा गंभीर जखमी …

Read More »

रेवड्यांचे राजकारण

राजकीय स्वार्थासाठी काही राजकीय पक्ष उद्या पेट्रोल-डिझेल फुकट देण्याची घोषणा सुद्धा करतील अशी भीती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच व्यक्त केली. पंतप्रधानांच्या या उद्गारांनंतर देशामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध अन्य पक्ष असा वाद पेटला. यात सर्वाधिक मिरच्या झोंबल्या त्या दिल्लीच्या आम आदमी पक्षाला. पंतप्रधानांनी केलेली टीका ‘आप’चे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे …

Read More »