न्यूयॉर्क : वृत्तसंस्था भारताच्या 74व्या स्वातंत्र्यदिनी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील टाइम्स स्क्वेअरवर तिरंगा फडकणार आहे. विशेष म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे राष्ट्रीय ध्वजाचा अनोखा सन्मान होणार आहे. अमेरिकेतील फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनने (एफआयए) यासंदर्भातील माहिती दिली. 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर …
Read More »महायुती ‘मातोश्री’वर पाठविणार पाच लाख पत्रे ; दूध दरवाढ आंदोलन
नाशिक : प्रतिनिधी दुधाची दरवाढ न केल्याच्या निषेधार्थ घरात अथवा गोठ्यांमध्ये बसून सरकारचा निषेध करायचा, अशी आंदोलनाची हाक मंगळवारी (दि. 11) महायुतीतर्फे देण्यात आली. त्याचप्रमाणे 13 ते 18 ऑगस्ट या कालावधीत दूध उत्पादकांच्या मागण्यांसंबंधी पाच लाख पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी पाठविण्यात येणार आहेत. माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत …
Read More »…तर देश कोरोनाविरुद्ध जिंकेल!
पंतप्रधान मोदींचा विश्वास; मुख्यमंत्र्यांशी संवाद नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात वाढलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 11) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सर्वाधिक कोरोना संसर्ग असलेली ही राज्ये आहेत. या राज्यांनी कोरोनाला हरवले तर देश जिंकू शकेल, असा विश्वास पंतप्रधानांनी या वेळी व्यक्त केला. …
Read More »वडिलांच्या संपत्तीत मुलीलाही मिळणार समान वाटा
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय नवी दिल्ली : वृत्तसंस्थावडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीलाही समान वाटा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात मंगळवारी (दि. 11) ऐतिहासिक निर्णय दिला. त्यामुळे वडिलांच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीलाही हक्क असावा या मुद्द्यावरील वादावर आता पडदा पडला आहे. 1956मधील हिंदू वारसा हक्क कायद्यात 2005मध्ये सुधारणा करण्यात आली होती. आपल्या पित्याच्या …
Read More »कोविड सेंटरला भीषण आग; सात रुग्णांचा मृत्यू
हैदराबाद ः वृत्तसंस्था आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे कोविड सेंटर असलेल्या स्वर्ण पॅलेस हॉटेलला रविवारी (दि. 9) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून यात सात रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला, तर 30 जणांना वाचविण्यात यश आले. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना होऊन बचावकार्य सुरू करण्यात आले. शॉर्टसर्किटमुळे ही …
Read More »101 संरक्षण उत्पादनांची आयात रोखली; संरक्षणमंत्र्यांचे पाऊल, ‘आत्मनिर्भर भारत’च्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी (दि. 9) मोठी घोषणा केली आहे. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारताने पहिले पाऊल टाकले आहे. यासाठी संरक्षण उत्पादनाच्या स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी 101 संरक्षण उत्पादनांच्या आयातीवर बंदी घालण्यात येणार आहे. संरक्षण सामुग्रीसाठी 52 हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार असल्याचेही या वेळी राजनाथ …
Read More »कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी; एक लाख कोटींचा निधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकर्यांसाठी मोठी घोषणा
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकर्यांना स्वस्त कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांच्या कृषी पायाभूत सुविधा निधीला सुरुवात केली आहे. पंतप्रधानांनी रविवारी (दि. 9) सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही योजना सुरू केली. जुलै महिन्यात सरकारने कृषी …
Read More »केरळ विमान अपघात; मृतांचा आकडा 18वर
कोझिकोड : वृत्तसंस्थाकेरळमधील कोझिकोड येथे शुक्रवारी (दि. 7) रात्री झालेल्या भीषण विमान अपघातातील मृतांचा आकडा 18वर जाऊन पोहोचला आहे. अनेक जण जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेच्या तपासाचे आदेश केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिले आहेत तसेच अपघातग्रस्तांचे कुटुंबीय आणि जखमी प्रवाशांना केंद्र …
Read More »पीएम मोदींना जनतेची पसंती
देशातील 78 टक्के लोक कामगिरीवर समाधानी नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसर्या कार्यकाळाला आता सव्वा वर्ष पूर्ण होत आले आहे. या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कलम 370 हटवण्यासह ट्रिपल तलाक आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत (सीएए) मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच एका सर्व्हेक्षणानुसार देशातील 78 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर …
Read More »तुफान पावसामुळे केरळमध्ये भूस्खलन; 12 जणांचा मृत्यू
मुन्नार : वृत्तसंस्थाकेरळमधील पर्यटनस्थळ मुन्नारजवळ तुफान पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 7) सकाळी 11.30च्या सुमारास घडली. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून, 10 जणांची सुटका करण्यात आली आहे. ढिगार्याखाली आणखी लोक दबले असल्याने शोध व मदतकार्य सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.भूस्खलन झाल्याने अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे पथक पाठविण्यात आले …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper