Breaking News

मुंबई – नवी मुंबई

नवी मुंबई एपीएमसीत कोरोनाचा विसर

रुग्णवाढ कायम असताना नियमांचे सर्रास उल्लंघन नवी मुंबई : रामप्रहर वृत्त राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे नवी मुंबईत येत्या 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढत चालले आहे. नवी मुंबई महापालिकातर्फे कोरोना रोखण्यासाठी विविध प्रकार उपायोजना केल्या जात आहे तसेच या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे …

Read More »

…तर येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधार्‍यांवर बहिष्कार!; व्यापार्‍यांचा ठाकरे सरकाला इशारा; दुकानांवरील निर्बंध उठविण्याची मागणी

मुंबई ः प्रतिनिधी बिगर अत्यावश्यक दुकानांच्या विचित्र वेळांमुळे व्यापार्‍यांनी 25 टक्के दुकाने बंद ठेवली आहेत, तर वीकेण्डला दुकाने बंद आणि लोकांची पर्यटनस्थळांवर गर्दी अशी स्थिती आहे. मुंबईची रुग्णसंख्या कमी झाली असूनही दुकानांवरील निर्बंध न उठवल्यास येत्या निवडणुकीत राज्यातील सत्ताधार्‍यांवर बहिष्कार टाकू, असा इशारा मुंबईतील दुकानदार संघटनेने दिला आहे. फेडरेशन ऑफ …

Read More »

आंदोलनादरम्यान बैलगाडी तुटली; काँग्रेस नेत्यांची फजिती

मुंबई ः प्रतिनिधीइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने शनिवारी (दि. 10) मुंबईत आंदोलन केले, मात्र ज्या बैलगाडीतून हे आंदोलन करण्यात आले ती भार जास्त होऊन तुटल्याने मोर्चात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप व इतर नेते तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते बैलगाडीतून आंदोलनात सहभागी झाले, मात्र …

Read More »

नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चेच नाव हवे

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांचा पुनरूच्चार भिवंडी ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. या मागणीचा आणि भूमिपुत्रांच्या भावनांचा आदर केला गेलाच पाहिजे, असे नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.स्थानिकांना विश्वासात न घेता …

Read More »

ओबीसी आरक्षण वाद : राज्यातील पोटनिवडणुका स्थगित

मुंबई ः प्रतिनिधीकोरोनाची दुसरी लाट अद्याप पूर्ण ओसरली नसतानाच तिसर्‍या लाटेची आणि डेल्टा प्लसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भीती लक्षात घेऊन राज्यात कडक निर्बंध लागू आहेत. त्यामुळे पाच जिल्हा परिषदा व त्या अंतर्गत येणार्‍या 33 पंचायत समित्यांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया आज आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा राज्य …

Read More »

नवी मुंबई महापालिका केंद्रांवरही ‘स्पुटनिक’

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त शासनाकडून लसपुरवठ्यात सातत्य नसल्याने लसीकरण मोहीम विस्कळीत झाली आहे. तर पालिकेने काढलेल्या जागतिक निविदेलाही प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने आता डॉ. रेड्डीज या लसपुरवठादाराकडून स्पुटनिक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आठवडाभरात पालिकेला ही लस मिळणार असून पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यास …

Read More »

काँग्रेसच्या रॅलीत कोरोना नियमांची पायमल्ली; आयोजकांवर गुन्हे; 35 सायकली जप्त

नवी मुंंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने इंधन व गॅसवाढीच्या निषेधार्थ गुरुवारी पालिका मुख्यालय ते कोकणभवन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नवी मुंबईतील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र रॅलीत आंदोलकांनी परवानगीपेक्षा जास्त सायकली वापरल्याने पोलिसांनी कारवाई करीत सायकली जप्त केल्या. तसेच कोरोना नियमांची …

Read More »

शुभेच्छा देण्याइतके मुख्यमंत्र्यांचे मन मोठे नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई ः प्रतिनिधी नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ विस्तारात नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आले आहे. त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आलाय. गुरुवारी (दि. 8) नारायण राणे यांनी पदभार स्वीकारला. या वेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मला शुभेच्छा देण्याइतके मुख्यमंत्री …

Read More »

काँग्रेसला 12 वर्षांत कळले नाही, ते भाजपला कळले ः नितेश राणे

मुंबई ः प्रतिनिधी काँग्रेसला जे 12 वर्षांत कळले नाही ते भाजपला दीड वर्षात कळले, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर दिली आहे. त्याचबरोबर सामान्य कार्यकर्त्यांची जाण असणारा पक्ष म्हणून जी भाजपची ओळख आहे त्यावर आज शिक्कामोर्तब झाल्याचेही नितेश राणे म्हणाले. मंत्रिपदाच्या माध्यमातून राणेसाहेब निश्चितपणे …

Read More »

12 आमदारांच्या अन्यायी निलंबनाविरोधात न्यायालयात दाद मागणार; आमदार अ‍ॅड. आशिष शेलारांकडून पुनरूच्चार

मुंबई ः प्रतिनिधी महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारने सूडबुद्धीने षड्यंत्र रचून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन केले आहे. त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचा पुनरूच्चार भाजपकडून आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केला. प्रदेश कार्यालयात बुधवारी (दि. 7) झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. महाविकास आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनात निलंबित केलेल्या …

Read More »