Breaking News

मुंबई – नवी मुंबई

प्रजा संकटात, राजा मात्र घरात!

वाढत्या टीकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार दौरा मुंबई : प्रतिनिधीगेल्या चार-पाच दिवसांत परतीच्या पावसाने राज्याला तडाखा दिला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि कोकणातील शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही. दुसरीकडे काही नेते विविध भागांचे दौरे करून परिस्थितीचा …

Read More »

देवदूतांच्या कार्यामुळे सर्वसामान्यांना आधार; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान

मुंबई ः हरेश साठे कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी देवदूताप्रमाणे अतुलनीय कार्य केले. या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा करू तेवढी कमीच असून कोरोनाच्या कष्टकाळात देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार मिळाला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (दि. 14) राजभवन येथे …

Read More »

सिडकोतर्फे बांधकामे पूर्ण करण्यास मुदतवाढ

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडको संचालक मंडळाच्या 29 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या बैठकीत 22 मार्च 2020 पासून लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बांधकामधारकांकडून कोणतेही अधिमूल्य न आकारता त्यांना बांधकामे पूर्ण करण्यास नऊ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 20 मार्च 2020 हा कामाचा शेवटचा दिवस …

Read More »

सिडकोने 10 कोटी रुपये महाराष्ट्र भवनासाठी वापरावेत -आमदार मंदा म्हात्रे

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिका ही श्रीमंत महापालिका असून, सिडकोने पालिकेला कोविडसाठी 10 कोटी रुपये न देता महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी वापरावे. सिडकोने हे भवन उभारले असते तर पालिकेला आज खासगी रुग्णालये व हॉटेल्स कोविड रुग्णांसाठी भाड्याने घेण्याची वेळ आली नसती, त्यामुळे सिडकोने भवनाच्या उभारणीसाठी हा निधी वापरावा, अशी …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांना राज्यपालांच्या हस्ते कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान

मुंबई : कोरोना या वैश्विक महामारीच्या काळात नागरिकांना तन-मन-धनाने मदत करणारे रायगडचे माजी खासदार, दानशूर व्यक्तिमत्त्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. शिवनेरच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे कोरोना देवदूत पुरस्कार प्रदान करून बुधवारी सन्मानित करण्यात आले. या समारंभाला सन्माननीय अतिथी म्हणून माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह तसेच आयोजक …

Read More »

राज्यात पावसाचा कहर; पंढरपूरमध्ये भिंत कोसळून सहा जण मृत्युमुखी

मुंबई, पंढरपूर : प्रतिनिधी गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, या वेळी ग्रामीण भागासह शहरांनाही याचा मोठा फटका बसला आहे. अगदी तळकोकणापासून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, पंढरपूर शहरात चंद्रभागा तीरावर असलेल्या कुंभार घाटाची भिंत बुधवारी (दि. 15) दुपारी दीडच्या सुमारास …

Read More »

‘मेट्रो कारशेड कांजूरला नेल्याने सरकारी तिजोरीवर ताण येणार’

मुंबई : प्रतिनिधी मेट्रोचे कारशेड आरेमधून कांजूरला हलविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे हा प्रकल्प तर लांबणारच शिवाय सरकारी तिजोरीवर ताणही येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस म्हणाले की, कारशेड कांजूरमार्ग येथे स्थानांतरित करून मेट्रो-3चे प्रश्न सुटणार …

Read More »

मंदिरांबाहेर भाजपचे घंटानाद आंदोलन

नवी मुंबई : बातमीदार मंदिर बंद उघडले बार, उद्धवा अजब तुझे सरकार  असे म्हणत नवी मुंबईत अनेक मंदिरांच्या बाहेर भाजपातर्फे घंटानाद करण्यात आला. सेक्टर 12 कोपरखैरणे येथे माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेविका वैशाली नाईक यांनी दत्त मंदिरासमोर घंटानाद केला. तसेच मविआविरोधात घोषणा दिल्या. यासोबत सिवूड्स …

Read More »

तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष झालात का?; राज्यपाल कोश्यारींचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई ः प्रतिनिधी राज्यातील मंदिरे खुली करण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. सरकार रेस्टॉरंट, बार खुले करीत आहेत, मग मंदिरे का बंद यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारणा केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाची आठवण करून दिली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर …

Read More »

मंदिरे बंद, उघडले बार.. उद्धवा बेधुंद तुझे सरकार!; ठाकरे सरकारविरोधात भाजपचे आंदोलन, मंदिरे खुली करण्याची मागणी

मुंबई, शिर्डी ः प्रतिनिधी अनलॉकमध्ये बहुतांश व्यवसाय आणि सार्वजनिक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र असे असले तरी राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. याचविरोधात भाजपने मंगळवारी (दि. 13) केले. राज्यातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरांसमोर भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत मंदिरे खुली करण्याची मागणी …

Read More »