Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पवारांचे वक्तव्य हा त्यांचा कौटुंबिक विषय -फडणवीस

मुंबई : प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, असे वक्तव्य बुधवारी केले होते. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा त्यांचा कौटुंबिक विषय असल्याचे म्हटले …

Read More »

राज्यातील मंत्र्यांची बदल्यांमधून प्रचंड कमाई

सीआयडी चौकशीची चंद्रकांत पाटील यांची मागणी मुंबई : प्रतिनिधीराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी 15 टक्के बदल्यांच्या नावाखाली अनेक मलाईदार ठिकाणी मर्जीतील अधिकार्‍यांच्या बदल्या करून प्रचंड पैसा गोळा केला आहे, असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे तसेच याची सीआयडीकडून चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री …

Read More »

पार्थ अपरिपक्व, त्याच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही -शरद पवार

मुंबई : प्रतिनिधी बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ हा अपरिपक्व असून, त्याच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नसल्याचे म्हटले आहे. …

Read More »

गोकुळाष्टमीनिमित्त नवचंडी होम पूजा

नवी मुंबई : बातमीदार, प्रतिनिधी सालाबादप्रमाणे गोकुळाष्टमीनिमित्त किल्ले गावठाण बेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या 13व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून श्री गोवर्धनी मातेची आराधना तसेच नवचंडी होम हवनाचे  आयोजन करण्यात आले होते. या होमहवन व पूजा बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते पार पडली. कोरोनासारखा महाभयंकर रोगाचा नायनाट व्हावा, …

Read More »

एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारण्याची मागणी

खारघर : प्रतिनिधी एमआयडीसी क्षेत्रात उद्योग मित्र कार्यालय उभारावी तरच नवे उद्योजक घडतील, अशी मागणी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अभय भोर यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली. महाराष्ट्रात छोटे मोठ्या अंदाजे 295 एमआडीसी कार्यक्षेत्र आहेत. या भागातील उद्योजकांना जागे संदर्भात शासकीय योजना विजे संदर्भात आणि शासकीय परवानग्याची या …

Read More »

स्नेहलता साठे यांचे निधन

ठाणे ः प्रतिनिधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू नारायणराव सावरकर यांच्या कन्या स्नेहलता सदाशिव साठे यांचे ठाणे येथे कर्करोगाने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात डॉ. उत्तरा सहस्त्रबुद्धे, चित्रा मसलेकर या कन्या व मुलगा इंद्रजित साठे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चपला हे त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव. चपलाआत्या म्हणून …

Read More »

अवाजवी वीज बिल वाढीची मनसेने नवी मुंबईत फोडली हंडी

नवी मुंबई : बातमीदारलॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती बिकट असताना ग्राहकांना अवाजवी बील देणार्‍या महावितरणच्या नवी मुंबईतील कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 11) तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी सेक्टर 17 मधील कार्यालयात घुसून प्रवेशद्वारावर खळ्ळ् खट्याक केले. लॉकडाऊनच्या काळात महावितरणकडून नागरिकांना वाढीव बिले देण्यात आली आहेत. सर्व ग्राहकांना अंदाजे आणि …

Read More »

खासगी रुग्णालयांतील लूटमार रोखण्यात राज्य सरकार अपयशी

फडणवीस, दरेकर यांचा हल्लाबोल मुंबई : प्रतिनिधीराज्यातील खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकडून वाट्टेल तशी बिलांची आकारणी होत असून, खुलेआम सुरू असलेली ही लूटमार रोखण्यात सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा दावा विधिमंडळातील विरोधी पक्षाने केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोध पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, गेले जवळपास …

Read More »

सिरमकडून लसींची नोंदणी करावी; आमदार गणेश नाईक यांची मागणी

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई शहरातील नागरिकांना भेडसाविणार्‍या समस्या व त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत आमदार गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची मंगळवारी (दि. 11) भेट घेतली. या वेळी सिरम इन्स्टिट्यूटमार्फत तयार करण्यात येत असलेल्या लसींची नोंदणी नवी मुंबई पालिकेने करून ठेवावी. त्यामुळे नवी मुंबईकरांना डोस उपलब्ध होऊन कोरोनाचा …

Read More »

बाप्पा पावला! ई-पासमधील विघ्न दूर; चाकरमान्यांना मिळाला दिलासा

मुंबई ः प्रतिनिधी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणार्‍या चाकरमान्यांना खूशखबर मिळाली आहे. आता चाकरमान्यांच्या ई-पासमधील अडथळा दूर झाला आहे. कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी पास दिलाच पाहिजे, असे आदेशच सर्व पोलिसांना देण्यात आले आहेत. तसेच पोलिसांच्या संकतेस्थळावरही गणेशोत्सावासाठी ई-पासचा स्वतंत्र पर्याय देण्यात आल्याने कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना तत्काळ ई-पास मिळणार असून त्यांचा कोकणात जाण्याचा प्रवास …

Read More »