Breaking News

मुंबई – नवी मुंबई

‘तृतीयपंथीयांचे नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी सहकार्य करा’

मुंबई : प्रतिनिधी देशातील प्रत्येक नागरिकांस मतदानाचा अधिकार असून तेवढाच अधिकार तृतीयपंथीय समाजाला पण आहे. आजमितीस राज्याच्या मतदार यादीत केवळ तीन हजार 700 व्यक्तींनी तृतीयपंथीय म्हणून नोंदणी केली आहे. मतदार यादीत राज्यातील सर्व तृतीयपंथीय समाजाने नोंदणी करावी, यासाठी तृतीयपंथीयांच्या गुरूंनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान …

Read More »

मुंबईत नव्या विषाणूचा रुग्ण

दक्षिण आफ्रिकेचा नागरिक; चिंता वाढली मुंबई ः प्रतिनिधी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांची संख्या नगण्य झाल्याने निर्धास्त असणार्‍या आरोग्य विभागाची चिंता ब्रिटनमध्ये आढळलेल्या ‘एक्सई’ या कोरोनाच्या नव्या उपप्रकाराने बाधित असलेला एक रुग्ण मुंबईत आढळल्याने वाढली आहे. मुंबई पालिकेने नुकत्याच जाहीर केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये हे निदर्शनास आले आहे. भारतातील हा एक्सईचा पहिलाच …

Read More »

काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करतात

देवेंद्र फडणवीसांची संजय राऊतांवर टीका मुंबई : प्रतिनिधी काही लोक नखं कापूनही शहीद होण्याचा प्रयत्न करतात, अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर केली आहे. संजय राऊत लक्ष वेधून घेण्यासाठी सर्व बोलत आहेत असेही ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विरोधी …

Read More »

राज्यपालांच्या उपस्थितीत महाकुंभाभिषेक सोहळा

मुंबई ः प्रतिनिधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज छेडानगर चेंबूर येथील श्री सुब्रह्मण्य समाजाच्या तिरुचेंबूर मुरुगन (कार्तिकेय) मंदिरातर्फे 12 वर्षानंतर होत असलेल्या महाकुंभाभिषेक सोहळ्याला उपस्थित राहून यज्ञपूजेत भाग घेतला. या वेळी टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखरन, श्री सुब्रह्मण्य समाज संस्थेचे सचिव पी. एस. सुब्रमण्यम, मंदिराचे पदाधिकारी, तामिळनाडू येथून महाकुंभाभिषेकासाठी आलेले …

Read More »

‘बाबासाहेबांचे उभारलेले स्मारक हे भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक कार्य’

नवी मुंबई : बातमीदार स्मारकातील अत्याधुनिक ग्रंथालय, छायाचित्र संग्रहालय अशा विविध सुविधांतून बाबासाहेबांना खर्‍या अर्थाने समजून घेता येते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक म्हणजे भावी पिढ्यांसाठी ऐतिहासिक काम असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले. ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांच्या …

Read More »

भाजपचा स्थापना दिवस उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस खारघर मंडलच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले मार्गदर्शन खारघर शहर उपाध्यक्ष रमेश खडकर यांच्या निवासस्थानी खारघरच्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ऐकले. या वेळही खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती अ‍ॅड. नरेश ठाकूर, …

Read More »

रबाळे रेल्वेस्टेशन बाहेरील उद्यानात रखरखाट; नागरिकांमधून नाराजी

नवी मुंबई ः प्रतिनिधी नवी मुंबई पालिकेने स्वच्छ अभियान 2022 अंतर्गत  पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्यासह सर्वांनी कंबर कसली असून सगळीकडे विविध प्रकारची कामे सुरू केली आहेत, मात्र रबाळे रेल्वेस्टेशन बाहेरील उद्यानातील हिरवळ सुकली आहे. त्यामुळे उद्यानात रखरखाट जाणवत आहे. घणसोली उद्यान विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. …

Read More »

स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम

नवी मुंबई ः बातमीदार अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा, अध्यात्मिक सेवा व बालसंस्कार केंद्र  सेक्टर 18 नेरुळ येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक होऊन, आरतीनंतर शेकडो सेवेकरी भाविकांच्या उपस्थिती श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण पार …

Read More »

टीका करताना भान ठेवणे गरजेचे

संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर चंद्रकांत पाटील यांचे खडे बोल मुंबई ः प्रतिनिधी शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग व दादरमधील मालमत्ता ईडीने मंगळवारी (दि. 5) जप्त केली. यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांसोबतच किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. त्यांचे हे शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतात का? …

Read More »

आयुष्यातील प्रत्येक सेकंदही महत्त्वाचा -ललिता बाबर

विद्याभवन शैक्षणिक संकुलात पारितोषिक वितरण समारंभ नवी मुंबई ः बातमीदार, प्रतिनिधी कठीण परिस्थिती आपल्याला घडवत असते. पाण्याचा दुष्काळ निश्चयी विद्यार्थ्यांच्या टॅलेंटवर परिणाम करीत नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना ध्येय उच्च ठेवली पाहिजेत आणि ती गाठण्यासाठी त्यागही करावाच लागतो, तसेच शिस्त पाळणे हे देखील खूप महत्वाचे असते. अडथळे येतच राहतात, आपण …

Read More »