Breaking News

महत्वाच्या बातम्या

दहशतवादाचा विषाणू

ऐन सणासुदीच्या हंगामात देशात घातपात घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा डाव दिल्ली पोलिसांनी उधळून लावला. यामुळे देशवासीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यानंतर काही आठवड्यांच्या आतच भारतात पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी दिल्ली पोलिसांच्या जाळ्यात सापडले ही निश्चितच काळजीची बाब आहे. मुंबई पोलिसांना पत्ताही लागू न देता दिल्ली पोलिसांनी धारावी येथील रहिवासी असलेल्या …

Read More »

पनवेलमध्ये वकिलांनी घेतला ‘कोविशिल्ड’चा दुसरा डोस

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेच्या वतीने भाजपच्या ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष व पनवेल बारचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या मागणीवरून गुरुवारी (दि. 16) कोविशिल्डचा दुसरा डोस वकिलांना देण्यात आला. या वेळी बार असोसिएशनच्या 175 वकिलांनी त्याचा लाभ घेतला. पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, उपाध्यक्ष अ‍ॅड. जे. …

Read More »

…तर ओबीसींच्या डोळ्यात धूळफेक ठरेल -चंद्रकांत पाटील

पुणे : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारकडून काढण्यात येणारा अध्यादेश न्यायालयात टिकावा अशी आपली इच्छा आहे, पण हा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर तो ओबीसींच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार ठरेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ते देहू येथे पत्रकारांशी बोलत होते. …

Read More »

आता तरी जागे व्हा!

संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा जालना : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. या घटनेच्या …

Read More »

बँकिंग क्षेत्रासाठी केंद्राकडून 30,600 कोटींची तरतूद

नवी दिल्ली : कोरोना महामारीतून सावरत असताना देशातील एकूण आर्थिक व्यवस्था सुधारण्यासाठी आणि बँकिंग क्षेत्राला पाठबळ देण्याकरिता नॅशनल अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेडची (एनएआरसीएल) उभारणी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यामार्फत संकटात असलेल्या बँकिंग क्षेत्रासाठी तब्बल 30 हजार 600 कोटींच्या निधीची घोषणा बुधवारी (दि. 16) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात …

Read More »

जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करतोय!

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा नवी दिल्ली ः वृत्तसंस्थासेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या नवीन संरक्षण कार्यालय संकुलांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 16) करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदींनी या प्रकल्पावरून टीका करणार्‍यांना विरोधकांवर निशाणा साधला. जे काम स्वातंत्र्यानंतर लगेच करायला हवे होते, ते आज आम्ही करीत आहोत, …

Read More »

शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्तआमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी व बबन मुकादम यांनी तहसीलदार विजय तळेकर यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तालुक्यात सहा ठिकाणी शासकीय दाखले वाटप शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्या अंतर्गत गुरुवारी (दि. 16) पहिले शिबिर …

Read More »

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे सेवा व समर्पण अभियान

मुंबई ः प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या काळात भारतीय जनता पक्षातर्फे राज्यात सेवा व समर्पण अभियान राबविण्यात येणार आहे. यानिमित्त विविध सेवा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या अभियानाचे प्रमुख राज पुरोहित व प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये …

Read More »

वंजारवाडी-भालीवडी आणि पोटल रस्त्याची दुरवस्था

कर्जत : बातमीदारमुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कर्जत तालुक्यातील भालीवडी-वंजारवाडी या रस्त्याचे दोन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्त्यावर आता प्रचंड खड्डे पडले आहेत. तर त्या भागातील पोटल रस्त्याची अवस्थादेखील दयनीय झाली असून स्थानिक ग्रामस्थांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. महापुराने कर्जत तालुक्यातील रस्त्यांची अवस्था बिकट करून ठेवली आहे. तालुक्यातील भालीवडी-वंजारवाडी …

Read More »

माणगाव बसस्थानकातील खड्ड्यांकडे राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष; ‘रास्ता रोको’ करण्याचा भाजपचा इशारा

माणगाव : प्रतिनिधी येथील बसस्थानक परिसरात प्रचंड खड्डे पडले असून, त्याकडे राज्य परिवहन महामंडळ पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. माणगाव बसस्थानक लवकरात लवकर खड्डेमुक्त केले नाही, तर बसेस अडवून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी दिला आहे. माणगाव हे मुंबई-गोवा महामार्गावरील तालुक्याचे ठिकाण आहे, मात्र …

Read More »