जनआशीर्वाद यात्रेत नारायण राणेंचा शिवसेनेवर घणाघात मुंबई : प्रतिनिधीआम्ही राजकीय काही करत नाही. आम्ही फक्त लोकांना भेटतोय. तेसुद्धा जनतेच्या आशीर्वादानंच बसलेत. ते तर आडमार्गानं बसलेत. निवडून आलेले नाहीत. त्यामुळं आम्हाला कोणी उपदेश देण्याची गरज नाही. सगळे नियम, कायदे पाळूनच आम्ही सर्व करतोय, असा घणाघात केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग …
Read More »खोपोलीतील बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन
खोपोली, खालापूर : प्रतिनिधी लोकसहभागातून खोपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात उभारण्यात आलेल्या शहीद अशोक कामते बॅडमिंटन हॉलचे उद्घाटन नुकताच रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी केले. खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांनी लोक सहभागातून बॅडमिंटन कोर्ट आणि बहुउद्देशीय सभागृह उभारले, ते आदर्शवत आहे, असे मत अधीक्षक दुधे यांनी या वेळी व्यक्त …
Read More »कर्जतमधील कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
कर्जत : बातमीदार तालुक्यातील सावेळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने हा पक्षप्रवेश महत्त्वाचे असल्याचे बोलले जात आहे. भाजप किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांच्या पुढाकाराने राहुल मसणे आणि मिनेश मसणे यांच्या नेतृत्वाखाली सावेळे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला. भाजपचे कर्जत …
Read More »पाणी कुठे मुरतंय?
रायगड जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस पडलाय. ऑगस्ट महिन्यात 80 टक्के पाऊस झाला. असे असतानाही अलिबाग तालुक्यातील खारेपाट भागात पाणीटंचाई आहे. रेवस विभागातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र पायपीट करावी लागत आहे. पाण्यासाठी 15 ऑगस्ट रोजी या भागातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंचानी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. करोडो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना …
Read More »बल्लाळेश्वराच्या पालीत खड्यांचे विघ्न; रस्त्यावर साचलीत तळी; नागरिक व वाहनचालक त्रस्त
पाली : प्रतिनिधी सुधागड तालुक्यातील पाली गावाला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. बल्लाळेश्वराच्या पालीतील रस्त्यांची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी भले मोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमधून मार्ग काढणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालक त्रस्त झाले आहेत.आगामी येणारे सण-उत्सव पाहता पालीतील रस्ते लवकर सुस्थितीत …
Read More »जिल्हा सामान्य रुग्णालयातील शस्त्रक्रिया कक्षाच्या छताला गळती
अलिबाग : प्रतिनिधी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया विभागाच्या छताला गळती लागली आहे. त्यातून वरच्या मजल्यावरील दूषित पाणी ठिबकत आहे. छताला बुरशी आली आहे. अशा प्रदूषित वातावरणातच रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीवर …
Read More »रणधुमाळीची चाहूल
कोरोनाच्या तिसर्या लाटेची प्रतीक्षा एकीकडे सुरू असताना दुसर्या बाजूला राज्यात राजकीय पक्षांनी आपापले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. आणखी सहा महिन्यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ऐन भरात आलेली असेल. त्या रणधुमाळीची चाहूल आतापासूनच लागू लागली आहे. तिसर्या लाटेचा प्रभाव आणि भीती जसजशी ओसरेल तसतसे पालिका निवडणुकांचे युद्ध पेटत जाईल अशी चिन्हे …
Read More »पेण बाजारपेठ राख्यांनी सजली; वेळेत वाढ झाल्याने दुकानदार आनंदित
पेण : प्रतिनिधी रक्षाबंधन हा बहीण-भावाचे नाते वृद्धिंगत करणारा पवित्र सण येत्या रविवारी (दि. 22) म्हणजे काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी पेणच्या बाजारपेठेत विविध प्रकारच्या रंगेबेरंगी निरनिराळ्या आकाराच्या झगमगणार्या राख्या आल्या असून, पेणच्या बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. या राख्यांच्या खरेदीसाठी महिला, तरुणी गर्दी करत असून डायमंड लाईट राख्यांना …
Read More »भाजीमार्केटच्या पहिल्या मजल्यावरील गाळे रिकामे; मुरूड नगर परिषदेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला
मुरूड : प्रतिनिधी शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या महावीर भाजी मार्केटचे पहिल्या मजल्यावरील गाळे भाडेतत्त्वावर न दिल्याने मुरूड नगर परिषदेचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. या बहुउद्देशीय इमारतीचा उपयोग मात्र फक्त भाजी विक्रेत्यांसाठीच होत असल्याने नगर परिषदेचा मोठा तोटा होत आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून मुरूड नगर परिषदेने 2014-15 मध्ये महावीर भाजीमार्केट बांधले …
Read More »अंथरूणाला खिळलेल्या नागरिकांचे पनवेल महापालिकेकडून लसीकरण
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रात अंथरूणाला खिळून असणार्या नागरिकांच्या कोविड लसीकरणास काही दिवसांपासून सुरूवात करण्यात आली आहे. आजवर पालिका क्षेत्रातील 27 नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. अशा रुग्णांच्या लसीकरणासाठी संबधितांनी नजिकच्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राशी समन्वय साधावा, असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. अनेक कुटूंबामध्ये …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper