Breaking News

महत्वाच्या बातम्या

जनतेचा आक्रोश समजून घ्या!; भास्कर जाधवांच्या वर्तनावर फडणवीसांनी सुनावले

मुंबई : प्रतिनिधीशिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. मदतीसाठी आक्रोश करणार्‍या एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच दमदाटी केल्यामुळे राज्यभरातून भास्कर जाधव यांच्यावर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकटकाळात जनतेचा आक्रोश समजून घ्यावा, असे म्हणत भास्कर जाधव यांच्या या …

Read More »

महाडकरांसाठी भाजपचा मदतीचा हात; नागरिकांना दररोज भोजन, बिस्किटे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाडच्या तळीयेत महापूर आणि दरड कोसळल्याने मोठी हानी झाली. येथील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आस्मानी संकटातून सावरण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाडकरांना मदतीचा हात देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने नुकसानग्रस्त नागरिकांसाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. गुरुवारी (दि. 22) तळीये गावात दुर्दैवी …

Read More »

पहिल्या टी-20मध्ये भारताचा श्रीलंकेवर विजय; मालिकेत 1-0ने आघाडी

कोलंबो : वृत्तसंस्था कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 38 धावांनी पराभव केला. टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 165 धावांचं आव्हान ठेवले होते, मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंकेचा संपूर्ण संघ 18.3 षटकात गुंडाळला. श्रीलंकेचा संघ केवळ 126 धावा करू शकला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमारने …

Read More »

ऑलिम्पिक खेळाडूंना भारत सरकारचा दिलासा; भारतात येताना कोरोना चाचणीतून सूट

टोकियो : वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार्‍या भारतीय खेळाडू, अधिकारी आणि माध्यम प्रतिनिधींना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जपानची राजधानी असलेल्या टोकियोमधून बाहेर पडण्यापूर्वी खेळाडूंना कोरोना आरटी-पीसीआर चाचणीचा नकारात्मक अहवाल दाखविण्याची आवश्यकता नाही, असे सरकारने सांगितले आहे. आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी अधिकृत पत्राद्वारे या निर्णयाची …

Read More »

रोहा ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

रोहे : प्रतिनिधी महापुराने महाडमधील नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शाखेच्या पथकाने महाड येथे जाऊन पुरग्रस्तांना पाणी, बिस्किटे, धान्याचे वाटप केले.  पुरामुळे महाडमधील नागरिकांच्या घरातील कपड्यांसह जीवनावश्यक व संसारोपयोगी सर्व साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी रोह्यातील अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ओबीसी …

Read More »

विविध संस्थांच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

पेण मुस्लिम समाजाचा पूरग्रस्तांना मदतीचा हात पेण : प्रतिनिधी महाडमधील पूरग्रस्त व दरडग्रस्त भागातील नागरिकांना अनेक ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरू झाला असून, पेणमधील मुस्लिम समाजानेही या आपद्ग्रस्तांना मदत पाठविली आहे. महाडमधील पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन पेण मुस्लिम समाजाच्या वतीने मुफ्ती मुबीन खान यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत पेणमधील मुस्लिम …

Read More »

संभाव्य तिसरी लाट

देशात दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत चढ-उतार होताना दिसत आहे. एकीकडे दुसरी लाट ओसरत असली, तरी तिसर्‍या लाटेची शक्यता आहे. त्या दृष्टीने शासन-प्रशासन कार्यरत आहेत. तिसरी लाट मुलांवर परिणाम करणार असल्याचे म्हटले जात असल्याने मुलांचे लसीकरण सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना हा मानवाच्या मागे एखाद्या राक्षसासारखा लागला आहे. गेले जवळपास …

Read More »

भाजपतर्फे पूरग्रस्तांना मदत सुरूच

महाड ः भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी मदत करण्यात येत आहे. या अंतर्गत रविवारीही तयार अन्नाची पाकिटे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राजेश मापारा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित …

Read More »

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 130 कोटी जनतेचा उत्सव; पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा सरकारचा नसून देशातील 130 कोटी जनतेचा उत्सव आहे. देशाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येणे, देश प्रथम या भावनेतून काम करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 25) मन की बात कार्यक्रमात बोलताना सांगितले. कोरोना विषाणू संसर्ग संपला नसल्याने नियमांचे पालन …

Read More »

पंतप्रधान आवास योजनेतून दरडग्रस्तांचे पुनर्वसन करणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची तळीयेत घोषणा

महाड ः प्रतिनिधी कोणाचाही जीव आपण परत आणू शकत नाही, पण जे या घटनेतून वाचले त्यांना सांभाळण्याचे काम आम्ही करू. एकाही आपद्ग्रस्ताला बेघर राहू देणार नाही. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत प्रत्येक दरडग्रस्ताला घर बांधून दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी रविवारी (दि. 25) तळीये येथे केली. केंद्रीय मंत्री …

Read More »