Breaking News

महत्वाच्या बातम्या

पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरण

पोलादपूर तालुक्यातील एकमेव यशस्वी धरण रानबाजिरे येथे पोलादपूर ते महाबळेश्वर महामार्गावर दिसून येते. मात्र, हे धरण पोलादपूरचे तर पाणी महाड एमआयडीसीचेच आहे, अशी परिस्थिती आजही कायम आहे. तत्कालीन लोकप्रतिनिधींमध्ये ’आधी पाणी तालुक्याचे मगच एमआयडीसीचे’ अशी आग्रही भूमिका नव्हती. त्यामुळे व्यावसायिकतेसाठी बांधलेले हे धरण पोलादपूरचे पाणी महाड एमआयडीसी वसाहतीमधील कारखान्यांना पाणी …

Read More »

बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा पुन्हा अडकणार विवाहबंधनात

मुंबई ः प्रतिनिधीभारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच तमिळ सुपरस्टार विष्णू विशाल याच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. दरम्यान, दोघांचेही पहिले लग्न झालेले असून, घटस्फोटानंतर ते विभक्त राहात आहेत.विष्णू विशाल हा तमिळ सिनेमाचा एक मोठा सुपरस्टार आहे. चित्रपटाच्या जगाशिवाय तो आपल्या भव्य शरीरयष्टीबाबत खूप चर्चेत असतो. तो लवकरच दक्षिणेतील सर्वात मोठा सुपरस्टार असणार्‍या …

Read More »

कृष्णाने मोडला 24 वर्षांपूर्वीचा विक्रम

पुणे ः प्रतिनिधीभारतीय संघाकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. 25 वर्षीय कृष्णाने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करीत इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. या कामगिरीसह कृष्णाने 24 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला आहे.एकदिवसीय क्रिकेट पदार्पणात सर्वोत्तम कामगिरी करणार्‍या गोलंदाजांमध्ये कृष्णाचे नाव …

Read More »

श्रेयस अय्यर वन डे मालिकेसह आयपीएललाही मुकण्याची शक्यता

मुंबई ः प्रतिनिधीइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वन डेत टीम इंडियाने शानदार कामगिरी करीत विजयी सलामी दिली असली तरी या सामन्यात भारताला दोन धक्के बसले. भारतीय संघ फलंदाज करताना सलामीवीर रोहित शर्माला दुखापत झाली. त्यानंतर गोलंदाजी करताना एक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताना श्रेयस अय्यरही दुखापतग्रस्त झाला. मिळालेल्या माहितीनुसार तो इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन वन …

Read More »

महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत

कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा तेलंगणा ः वृत्तसंस्थामहाराष्ट्राच्या मुलींनी व मुलांनी बुधवारी (दि. 24) झालेल्या सकाळच्या सत्रात साखळीतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवत 47व्या कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेची बाद फेरी गाठली. तेलंगणा सूर्यापेठ येथे सुरू असलेल्या ह गटात महाराष्ट्राच्या मुलींनी अखेरच्या सामन्यात पंजाबला 38-30 असे नमवित या गटातून गटविजेते म्हणून …

Read More »

पुन्हा लॉकडाऊनची छाया

लॉकडाऊन हा शब्द तमाम सर्वसामान्य भारतीयांच्या कानावर पडला आणि जगण्याचा भाग होऊन बसला त्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्रीपासून देशव्यापी लॉकडाऊन पुकारला जात असल्याची घोषणा केली. सर्वसामान्यांना कोरोना म्हणजे काय, लॉकडाऊन म्हणजे नेमके काय काहीच नीटसे कळत नव्हते. वर्षभरात दोन्ही …

Read More »

ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी नवीन पॅटर्न; पूर्व नोंदणीशिवायही घेता येईल डोस

पनवेल : प्रतिनिधी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सूचनेनुसार खाजगी कोविड लसीकरणांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीच्या अपॉईमेंन्ट-वॉकिंग पॅटर्न (लसीकरणाबाबतचे नियोजन) तयार करण्याबाबत लसीकरण केंद्रांना सूचना देण्याचा निर्णय पालिकेच्या वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात आला. या पॅटर्नमध्ये पूर्व नोंदणी न करता लसीकरण केंद्रावर जाऊन नोंदणी करून कोविड लशीचा डोस घेता येणार …

Read More »

पिण्याच्या पाइपलाइनची दुरुस्ती

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा पनवेल : वार्ताहर पनवेलमधील स्वामी नित्यानंद मार्गावर पिण्याच्या पाइपलाइनची दुरुस्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील यांनी पाठपुरावा केला आहे. स्वामी नित्यानंद मार्गावर पद्मावती अपार्टमेंटसमोर पिण्याची पाइपलाइन लिकेज होऊन रस्त्यावर पाणी येऊ लागले होते. परिसरातील सोसायटीच्या रहिवाशांनी ही बाब नगरसेवक …

Read More »

पेणमध्ये वसुली सरकारविरोधात भाजपचे आंदोलन

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पेण ः प्रतिनिधी वसुली सरकारचा निषेध असो, आघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत पेणमध्ये भाजपतर्फे राज्य सरकारविरोधात पेण न. प.समोरील कोतवाल चौकात निदर्शने करण्यात आली. या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष वैशाली कडू, गटनेते अनिरुद्ध पाटील, शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, कामगार आघाडीचे …

Read More »

महाराष्ट्रात महावसुली सरकार

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांची टीका नवी दिल्ली : वृत्तसंस्था मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्राने महाराष्ट्राचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. यावरून केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या 100 कोटी रुपयांच्या वसूलीच्या आरोपावरून ठाकरे सरकारला घेरले आहे. महाराष्ट्राचा शो चालवतंय कोण? असा …

Read More »