पनवेल : रामप्रहर वृत्तकोरोना काळात समाजाप्रती देवदूताप्रमाणे दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना दै. सकाळच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सकाळ सन्मान 2021 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवारी (दि. 31) प्रसिद्ध कवी, लेखक व नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ …
Read More »मोदी सरकारची ‘आर्थिक लस’
केंद्रीय अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी तरतूद नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (दि. 1) सादर केला. या बजेटमध्ये विविध क्षेत्र आणि प्रत्येक घटकासाठी तरतूद करण्यात आली आहे. ‘ज्या वेळी पहाट अंधारलेली असते त्या वेळी विश्वास हाच आशेचा किरण असतो या …
Read More »शुभम चवरकरला उत्कृष्ट मल्लखांबपटू पुरस्कार
रेवदंडा : प्रतिनिधीसाळावमधील शिव मर्दानी आखाड्याचा मल्लखांबपटू शुभम किशोर चवरकर याला छावा प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट मल्लखांबपटू पुरस्काराने यथोचित सन्मानित करण्यात आले आहे.वस्ताद अमित गडांकुश संस्थापक-अध्यक्ष असलेल्या छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच छावा प्रतिष्ठानच्या वतीने साळाव येथील शुभम चवरकर याची रायगडमधील उत्कृष्ट मल्लखांब खेळाडू 2021 या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड करण्यात …
Read More »तामिळनाडूचे दुसरे विजेतेपद
बडोदा : वृत्तसंस्थादिनेश कार्तिकच्या नेतृत्वातील तामिळनाडू संघाने सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या जेतेपदावर दुसर्यांदा नाव कोरले आहे. डावखुरा फिरकीपटू एम. सिद्धार्धच्या (4/20) प्रभावी गोलंदाजीला फलंदाजांचे योगदान लाभल्याने तामिळनाडूने अंतिम फेरीत बडोद्याचा सात गडी आणि 12 चेंडू राखून पराभव केला.तामिळनाडूने यंदा 13 वर्षांनंतर प्रथमच अजिंक्यपद मिळवले. सिद्धार्थच्या फिरकीपुढे भंबेरी उडाल्याने …
Read More »कसोटी सामना प्रत्यक्ष बघण्याची प्रेक्षकांना संधी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाअहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरच्या दोन्ही कसोटी सामन्यांसाठी प्रेक्षकांना सामने पाहण्याची परवानगी देण्यात आली आहे. चेन्नईत होणारे दोन्ही कसोटी सामने मात्र प्रेक्षकांविना होणार आहेत.एका रिपोर्ट्सनुसार अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये होणार्या मालिकेतील तिसर्या कसोटी सामन्यापासून प्रेक्षकांना मैदानात जाऊन सामने पाहता येण्याची शक्यता आहे, पण किती …
Read More »मोहोपाडा ते महड पायी दिंडी
मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परिसरातील मोहोपाडा येथून संकष्ट चतुर्थीनिमित्त हभप मारुती खाने यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोपाडा ते वरदविनायक महड पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या पायी दिंडीत श्री गणेश पालखी असल्याने ठिकठिकाणी पालखी थांबवून नागरिकांनी दर्शन घेतले. या दिंडीत तरुणांची संख्या लक्षणीय होती. संकष्ट चतुर्थीनिमित्त रसायनी परिसरातील वारकरी सांप्रदायाने डोंगरी …
Read More »‘चतुरंग रागा‘ने पनवेलकर श्रोते झाले मंत्रमुग्ध
पनवेल : रामप्रहर वृत्त प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून चतुरंग राग 2021 या शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले. ’चतुरंग गावो गुनी सब मिलकर’ या घोषवाक्याने नटलेला हा कार्यक्रम रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाला. या कार्यक्रमात मधुवंती, बिहाग, बागेश्री, सोहनी अशा रागांतील, बडा ख्याल, …
Read More »‘सीकेटी’त विद्यार्थ्यांचे स्वागत;कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन
पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना या जागतिक रोगाच्या प्रादुर्भावामुळे गेले 10 महिने बंद असलेले, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चांगू काना ठाकूर (सीकेटी) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. 1) नव्या उत्साहाने, विद्यार्थ्यांना विशेष प्रेरणा देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यालयाच्या प्राचार्य इंदू घरत …
Read More »भाजप दक्षिण भारत सेल खारघर-तळोजा मंडलच्या सदस्यांना नियुक्तिपत्रे
पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप दक्षिण भारत सेल खारघर-तळोजा मंडल समितीच्या सदस्यांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. भाजप खारघर तळोजा मंडळाच्या कार्यालयात हा नियुक्तिपत्रे देण्याचा कार्यक्रम रविवारी (दि. 31) झाला. भाजप खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तसेच उत्तर रायगड जिल्हा संयोजक श्रीनिवास कोडुरू यांच्या उपस्थितीत सदस्यांना नेमणूकपत्रे देण्यात …
Read More »वर्षभरात नवी मुंबईत श्वानदंशाचे प्रमाण घटले
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरात श्वानदंशाचे प्रमाणही घटले आहे. डिसेंबरपर्यंत चार हजार 883 जणांना श्वानदंश झाला असून, हे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे आहे. सहा वर्षांत जवळपास 70 हजार नागरिकांवर श्वानांनी हल्ला केल्याची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणेप्रमाणे नवी मुंबईमधील नागरिकांनाही भटक्या श्वानांच्या उपद्रवास सामोरे जावे लागत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper