माणगाव ः प्रतिनिधी अखिल भारतीय विमुक्त एवंम धुमंतू जनजाती वेल्फेअर संघाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी माणगाव येथील भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष दीपाली जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली असून तशा आशयाचे नियुक्तीपत्र संघाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष रंजनाताई पाराशिवे यांनी दीपाली जाधव यांना …
Read More »राजू मरे यांचा भाजपत प्रवेश
वाहतूक सेलच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती कडाव ः वार्ताहर भारतीय जनता पक्षाचे वाहतूक सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या कार्यालयात रायगड जिल्ह्यातील कर्जत नेरळ येथील राजू बबन मरे यांनी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपत जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी राजू मरे यांची …
Read More »मास्क निर्मितीतून रोह्यातील महिला बनल्या ‘आत्मनिर्भर’
सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज व फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम रोहे : प्रतिनिधीकोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू झाल्याने अनेकांचा रोजगार थांबून त्यांच्यासह कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. घरातील कर्त्या माणसाला उत्पन्नाचे साधन न राहिल्याने रोजचा खर्च कसा भागवायचा अशी भ्रांत अनेक महिलांना होती. अशा परिस्थितीत रोह्यातील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज संचालित सुदर्शन सीएसआर फाऊंडेशनच्या वतीने फेस …
Read More »रक्तवाढीसाठी घरगुती उपाय
आरोग्य प्रहर अनेक वेळा रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा येणे, अशक्तपणा, त्वचा पिवळी पडणे, हात-पाय सुजणे आदी अॅनिमियाची लक्षणे दिसून येतात. ही समस्या पुरुषांपेक्षा महिलांना जास्त त्रास देते. अॅनिमियाच्या रुग्णांत विटॅमिन बी, लोह तत्त्व, फोलिक अॅसिडचे प्रमाण कमी होते. अनुवांशिक कारणामुळेही हा रोग होऊ शकतो. शरीरात रक्ताची कमी असेल तर आहारावर विशेष …
Read More »कोरोना लस येण्याआधी जगात 20 लाख मृत्यू होऊ शकतात
‘डब्ल्यूएचओ’कडून भीती व्यक्त न्यूयॉर्क : वृत्तसंस्थाकोरोना या महामारीशी अवघे जग सामना करीत असून, कोविड-19वर लस शोधण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत, मात्र कोरोनाचा प्रतिबंध करणारी यशस्वी लस येण्याआधी जगभरात 20 लाख मृत्यू होऊ शकतात, अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) व्यक्त केली आहे. डब्ल्यूओच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख माईक रेयान यांनी ही …
Read More »आगरकोट किल्ल्याची दुरवस्था
पुरातत्त्व खात्याचे दुर्लक्ष रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा आगरकोट किल्ल्यातील सातखणी, तटबंदी, बुरूज व वास्तू दुरवस्थेत असून सर्वत्र झाडाझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षतेने येथील अनेक वास्तू ढासळण्याच्या स्थितीत आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील मागील राज्य सरकारच्या काळात गड-किल्ल्यांच्या सुधारणांसाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांना सुरुवात करण्यात आली होती, मात्र सद्यस्थितीतील सरकारकडून त्यांची योग्य …
Read More »कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर पनवेलमध्ये विनामूल्य अंत्यसंस्कार
पनवेल : रामप्रहर वृत्तभाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार आणि पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीने केलेल्या ठरावानुसार पनवेल महानगरपालिका हद्दीतील मरण पावलेल्या कोविड रुग्णांवर विद्युतदाहिनी अथवा लाकडाच्या सहाय्याने विनामूल्य अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या काळातील लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेची आर्थिक कोंडी झाली होती. उपचारासाठी तर पैसे खर्च …
Read More »भाजपची नवी टीम जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी शनिवारी (दि. 26) पक्षाच्या नव्या राष्ट्रीय पदाधिकार्यांची नावे जाहीर केली. यानिमित्ताने पक्षासाठी झटणार्या नेते, पदाधिकार्यांना राष्ट्रीय स्तरावर व व्यापक प्रमाणात काम करण्याची संधी मिळाली आहे.या कार्यकारिणीत छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासह डॉ. रमन सिंह, …
Read More »स्वच्छ भारत अभियानामध्ये जेएनपीटीचा सहभाग
उरण : वार्ताहर – जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) हे भारताचे प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. भारत सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मिशनला पाठिंबा देण्यासाठी जेएनपीटीमध्ये ’स्वच्छता पखवाडा’ साजरा करण्यात येत आहे. स्वच्छता क्रांतीच्या अभियानामध्ये सहभागी होत जेएनपीटीच्या कर्मचार्यांनी पोर्टला स्वच्छ ठेवण्यासाठी वचनबद्ध राहण्याचे व त्यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याची शपथ घेतली. स्वच्छ …
Read More »रेल्वेच्या भुयारी मार्गावरील हाईटगेज तुटला
सिडको प्रशासनाचे दुर्लक्ष पनवेल : वार्ताहर – खांदा वसाहतीतील बालभारतीजवळील पनवेल-सीएसटी रेल्वे ट्रॅक खालील भुयारी मार्गावरील हाईटगेज शुक्रवारी तुटला. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान सिडको प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असून याबाबत वारंवार तक्रार करूनही कार्यवाही झाली नसल्याची प्रतिक्रिया भाजप नगरसेविका सीता पाटील यांनी दिली. बालभारती जवळून पनवेल …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper