Breaking News

महत्वाच्या बातम्या

गणेश पाटील यांना गुणवंत कामगार पुरस्कार

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील प्रकल्पग्रस्त म्हणून 1980 साली कल्याण कोळशेवाडी येथे महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या सेवेत कार्यरत असलेले बोकडविरा गावातील गणेश रामचंद्र पाटील यांनी 40 वर्षात वीज मंडळात प्रामाणिकपणे करण्यात आलेल्या सेवेची दखल वीज महामंडळाने घेऊन त्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित केले असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत …

Read More »

नाल्याच्या सफाईचे काम तातडीने व्हावे -सीता पाटील

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त नवीन पनवेलहून खांदा वसाहतीत येणार्‍या मुख्य पावसाळी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली असून, त्यात कचराही मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. पावसाळा जवळ आला असून, दरवर्षीप्रमाणे यंदा या नाल्याची सफाई होताना मात्र दिसत नाहीत. त्यामुळे तातडीने या संदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका सीता पाटील यांनी सिडकोकडे …

Read More »

सुक्या मासळीचे दर भिडले गगनाला

दासगावचा मासळी बाजार सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर महाड : प्रतिनिधी : तालुक्यातील दासगाव येथे भरणार्‍या मासळी बाजाराला गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. यामुळे या परिसरात हा बाजार प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या बाजारातील सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह घावूक व्यापारीदेखील हबकले आहेत. महाड तालुक्यातील दासगावमधील आठवडी …

Read More »

जि. प. कर्मचार्यांसाठी 8 मेपर्यंत वैद्यकीय शिबीर

अलिबाग : जिमाका, प्रतिनिधी  : रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी सोमवार (दि. 6)पासून 8 मेपर्यंत विशेष वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन सोमवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश देवऋषी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओसवाल, यांची उपस्थिती …

Read More »

वर्षीतप पारणोत्सवास निमित्ताने नागोठणेत शोभा यात्रा

नागोठणे : प्रतिनिधी : येथील जैन बंधुभगिनींनी केलेल्या साडेचौदा महिन्यांच्या उपवासाची सांगता मंगळवारी (दि. 7) अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर होत असून, त्यानिमित्ताने सोमवारी (दि. 6) सकाळी नागोठणे शहरात उपवास करणार्‍या तपस्वींची 15 रथांतून शोभा यात्रा काढण्यात आली होती. आचार्य अजित शेखरसुरीश्वरजी महाराज, देवकिर्ती विजयजी महाराज, कृपाशेखर विजयजी महाराज, अभय शेखरसुरीश्वरजी महाराज, चारित्रवर्धनाश्रीजी …

Read More »

टंचाई कामांचे वस्तुस्थितीदर्शक नियोजन करावे

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांचे निर्देश; जिल्ह्यात 207 गावे, पाड्यांना टँकर्सद्वारे पाणी पुरवठा अलिबाग : जिमाका, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील पाणी टंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेने विविध उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली असून कोणत्याही परिस्थितीत गावे आणि वाड्यांना तातडीने टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा झाला पाहिजे तसेच विंधन विहिरींची कामेही त्वरित …

Read More »

स्वराभिषेकाने पनवेलकर मंत्रमुग्ध

शास्त्रीय संगीत संमेलन साजरे पनवेल : रामप्रहर वृत्त  : पनवेल येथील पनवेल कल्चरल असोसिएशनच्या सभागृहामधे एका शास्त्रीय संगीत संमेलनाचे आयेजन करण्यात आले. प्रसिद्ध तबलावादक किशोर पांडे यांच्या संकल्पनेतून आयोजित या संगीत संमेलनामधे ज्येष्ठ आणि युवा कलाकारांच्या शास्त्रीय गायकीचा आनंद पनवेलकरांनी लुटला. आकाशवाणीच्या ज्येष्ठ गायिका अर्चना कुलकर्णी, त्याच्या शिष्या निलांबरी अनगळ, …

Read More »

उरण परिसरातील तापमानात वाढ

उरण : रामप्रहर वृत्त  : उरण आणि जेएनपीटी परिसरात असलेल्या कंटेनर यार्डमध्ये ठेवण्यात येत असलेल्या पत्र्याच्या लाखो कंटेनरच्या डब्यांमुळे तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तापमान नियंत्रणात आणण्यासाठी आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रत्येक कंटेनर यार्डमध्ये जागेच्या 30 टक्वे जागेत झाडे लावण्याची आवश्यकता आहे, मात्र याकडे कंपन्यांच्या विविध विभागाकडून अक्षम्यपणे दुर्लक्ष …

Read More »

वाढत्या उष्म्यामुळे मिनरल वॉटरची मागणी वाढली

रसायनी : प्रतिनिधी  : रणरणत्या उन्हामध्ये अंगाची लाही होत असताना नागरिक स्वतःच्या आरोग्याची खबरदारी घेत आहेत. यामुळे या उन्हाळ्यामध्ये आपली तृष्णा शांत करण्यासाठी मिनरल वॉटर घेण्याकडे आनेकांचा कल आहे. त्यामुळे बाजारात मिनरल वॉटरच्या मागणीत वाढ झाली आहे. पूर्वी प्रत्येक ठिकाणी वाटसरूची तहान भागविण्यासाठी पाणपोया उपलब्ध असायच्या, मात्र आता आरोग्याचा विचार …

Read More »

मच्छीमारांना सतावतेय सागरी प्रदूषणाची भीती!

उरण ः रामप्रहर वृत्त  : रायगड जिल्ह्याचा 240 किमीचा विस्तीर्ण सागरी किनारा मासेमारीसाठी अनुकूल असला, तरी मागील काही वर्षात या किनारपट्टीवर प्रदूषण वाढले आहे. आर्थिक लाभासाठी केल्या जात असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे किनार्‍याच्या परिसरात आढळणार्‍या माशांच्या विविध जातीही नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. परिणामी पारंपरिक व्यवसाय करणार्‍या मच्छीमार बांधवांना मत्स्यदुष्काळाची चिंता सतावू …

Read More »