Breaking News

महत्वाच्या बातम्या

कर्जत ताडवाडी येथे महिलेचा नवर्‍याने केला खून

कर्जत ़: बातमीदार दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत, म्हणून पतीने पत्नीला ठार मारण्याची घटना कर्जत तालुक्यातील ताडवाडी येथे रविवारी (दि. 5) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. या घटनेनंतर पतीने जंगलात पळ काढला असून, नेरळ पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ताडवाडी येथील लक्ष्मण दरवडा यांच्या बहिणीचे कळंब जवळील फोंडेवाडी येथील योगेश …

Read More »

माथेरानच्या दरीत कोसळून पर्यटक महिलेचा मृत्यू

कर्जत : बातमीदार येथे पर्यटनासाठी आलेल्या दिवा (जि. ठाणे) येथील पर्यटक महिलेचा दरीत पडून मृत्यू झाला. गीता मिश्रा असे या महिला पर्यटकाचे नाव होते. दिवा येथील अभिषेक मिश्रा हे आपली पत्नी गिता, दोन मुली चाहत, अन्यना तसेच मित्र सचिन शुक्ला यांच्यासह शनिवारी (दि.4) माथेरानला पर्यटनासाठी आले होते. दुपारी 2 वाजण्याच्या …

Read More »

सुयोग्य नियोजनाने ‘फनी’वर मात; वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण

पुणे ः प्रतिनिधी ‘फनी’ चक्रीवादळाने ओडिशात धुमाकूळ घातल्यानंतर तिथल्या स्थानिक प्रशासनाने केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. या भागात अनेक मराठी अधिकारी काम करीत असल्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे. यातील गंजाम नावाच्या जिल्ह्यात अवघ्या 36 तासांत जिल्हा प्रशासनाने तीन लाख लोकांचे स्थलांतर केले. त्यांच्या या नियोजनामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकही …

Read More »

मापात पाप; 26 लाखांचा दंड ; वैधमापनशास्त्र विभागाची धडक कारवार्ई

अहमदनगर ः प्रतिनिधी वजनमापात हेराफेरी तसेच पॅकबंद वस्तूंंची विक्री करताना मापात पाप करणार्‍या 613 विक्रेत्यांंवर वैधमापनशास्त्र विभागाने गेल्या वर्षभरात कारवाई करीत त्यांना 26 लाख 58 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाई झालेल्यांत 443 वजनमापाची प्रकरणे असून, 170 कारवाया या पॅकबंद वस्तूंच्या विक्रीसंदर्भातील आहेत़. वजन करून ग्राहकांना माल देताना कमी माल …

Read More »

सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं; एक तारतम्य..

मी सोशल मिडीयावर लिहीतो. खूप लिहितो. बर्‍याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही आणि पुन्हा या …

Read More »

भारताच्या कुट नीतीचा विजय

मौलाना मसूद अझर ह्याला जागतिक आतन्कवादी म्हणून घोषित करून संयुक्त राष्ट्रसंघाने त्याच्या कुख्यातीवर जगाची राजमोहोर ठोकली आहे. एक मे ह्या दिवशी ही भारताला हवीहवीशी वाटणारी घटना घडली. एक मे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ असे अभिमानाने आलापिण्याचा हा दिवस. त्यावेळचा सत्तारूढ आतन्कवादी बहलोलखान हा तावडीत …

Read More »

बांगरवाडीतील विहिरीत अज्ञात व्यक्तीने टाकले विषारी औषध

कर्जत : प्रतिनिधी खांडस ग्रामपंचायत हद्दीतील बांगरवाडीत मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई असताना येथील विहिरीत शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ऐन पाणीटंचाईच्या काळात बांगरवाडी येथील विहिरीत विषारी औषध टाकल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहेत, तसेच औषध टाकणार्‍याचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली …

Read More »

यंदा आंबा शौकिनांची निराशा

मुंबई ः प्रतिनिधी यंदा लहरी हवामानामुळे आणि आंब्यावर आलेल्या रोगामुळे सर्वच ठिकाणांच्या आंब्याचे पीक 50 टक्के घटले आहे. त्यामुळे यंदा बाजारात आंबा कमी आला. त्यात यावर्षीचा हंगामही लवकरच संपणार असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे आंबा खवय्यांनी आताच आंब्याचा आस्वाद घ्यावा, असे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे. हापूस आंब्याचा हंगाम हा व्यापार्‍यांसाठी मोठा आणि …

Read More »

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः प्रतिनिधी कष्टकर्‍यांचे द्रष्टे नेते थोर समाजसुधारक स्व. जनार्दन आत्माराम भगत यांच्या 31व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 7) उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सकाळी 9.30 वाजता पुण्यतिथी कार्यक्रम व त्यानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने होणार्‍या या कार्यक्रमास समारंभ अध्यक्ष …

Read More »

दुष्काळग्रस्तांसाठी सरकार तिजोरी रिकामी करणार : महादेव जानकर

पंढरपूर ः प्रतिनिधी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत पैसा कमी पडू देणार नाही. प्रसंगी शेतकर्‍यांसाठी तिजोरी रिकामी करण्याचीही सरकारची तयारी आहे, असा दावा पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. दुष्काळी पाहणी दौर्‍याच्या निमित्ताने काल जानकर यांनी सांगोला तालुक्यातील विविध छावण्यांमध्ये जाऊन शेतकर्‍यांशी चर्चा केली. जनावरांना देण्यात येणार्‍या चार्‍यात …

Read More »