Breaking News

महत्वाच्या बातम्या

अवैध, अवजड वाहतूक बंद करा

मनसेचा पालीत जनआक्रोश मोर्चा; तहसीलदारांना निवेदन पाली : प्रतिनिधी अष्टविनायक क्षेत्रांपैकी पाली शहरातील अवैध व अवजड वाहतूक सर्वात गंभीर समस्या बनली आहे. येथील अवैध वाहतूक बंद करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुरुवारी (दि. 24) पालीमध्ये  जन आक्रोश मोर्चा काढला होता. पालीतील अवैध व अवजड वाहतूकी विरोधात सुधागड मनसेच्या वतीने …

Read More »

‘अशिक्षित ग्राहक, ज्येष्ठ होतात सायबर गुन्ह्यांचे शिकार’

कर्जत : प्रतिनिधी मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरमुळे हे सायबर गुन्हे होत असतात. फेसबुक, इन्स्टाग्राम वापरामुळे आपण सायबर गुन्ह्यांमध्ये अडकत जातो आणि बदनामी टाळण्यासाठी तरुणवर्ग आत्महत्या करण्यास मागेपुढे पहात नाही. एटीएम कार्डमुळेही फसवणूक होते. अशिक्षित ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिक याचे बळी ठरतात, असे प्रतिपादन कर्जत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक के. डी. कोल्हे …

Read More »

खोपोली शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करा

बाळासाहेबांची शिवसेना सीईओंच्या दालनात खोपोली : प्रतिनिधी अपुर्‍या व अनियमीत पाणीपुरवठ्याने खोपोलीतील नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील या पाणी प्रश्नाबाबत बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे. शहरातील  पाणीपुरवठ्या संदर्भात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रतिनिधींनी गुरुवारी (दि. 24) नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अनुप दुरे यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन चर्चा केली. खोपोली …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात वेबिनार

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व शास्त्र महाविद्यालयात सोमवारी (दि. 23) व्यवस्थापन विभाग, चर्चासत्र व कार्यशाळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनार घेण्यात आले. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स मुंबई या संस्थेचे सहाय्यक संचालक डॉ. नीना नंदा उपस्थित ऑनलाईन होत्या. या वेबिनारसाठी …

Read More »

नागरी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

नवी मुंबई पालिका आयुक्तांकडून विभागवार आढावा नवी मुंबई : बातमीदार महापालिकेमार्फत सुरू असलेली कामे विहित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे व त्याचा सातत्याने पाठपुरावा करून अपेक्षित कालावधीत नागरिकांना सुविधा उपलब्ध होतील याकडे बारकाईने लक्ष द्यावे, असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभागप्रमुखांना आढावा बैठकीवेळी दिले. या वेळी अतिरिक्त …

Read More »

भाजपच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग संयोजकपदी शर्मिला सत्वे यांची नियुक्ती

माणगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाच्या पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भाजपच्या संयोजकपदी माणगाव येथील पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या शर्मिला शिवराम सत्वे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गणेशकाका जगताप, युवानेते विक्रांत पाटील यांच्या हस्ते नुकताच शर्मिला सत्वे यांना  नियुक्तीपत्र देण्यात आले. …

Read More »

शिलालेखातील त्रुटी सुधारण्याची मागणी

अलिबाग : प्रतिनिधी आक्षी येथील आद्य शिलालेखाचे नुकतेच रायगड जिल्हा परिषदेमार्फत  संवर्धन आणि सुशोभीकरण करण्यात आले. त्या वेळी शिलालेख परिसरात लावण्यात आलेल्या माहिती फलकांच्या मजकूरातील अनेक त्रूटी समोर आल्या आहेत. त्या तातडीने दुरुस्त कराव्यात, अशी मागणी इतिहास अभ्यासकांकडून केली जात आहे. आक्षी येथील मराठीतील आद्य शिलालेख कित्येक वर्ष दुर्लक्षीत अवस्थेत …

Read More »

बोरघाटात डांबराच्या टँकरने घेतला पेट; वाहतुकीचा खोळंबा

खालापूर : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील एचओसी ब्रिज मॅजिक पॉईंटजवळ डांबर वाहतूक करणार्‍या टँकरला बुधवारी (दि. 23)सायंकाळी 7च्या सुमारास अचानक आग लागली. खोपोली आणि महामार्गावरील अग्निशमन दलाच्या जवानांनी लागलीच धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुमारे 20 मिनिटे खोळंबली होती. या घटनेचे वृत्त समजताच …

Read More »

कालवा सफाईच्या कामाला मुहूर्त सापडेना!

माणगावातील शेतकर्‍यांना पाण्याची प्रतीक्षा; रब्बी हंगामातील शेतीची कामे अडली माणगाव : प्रतिनिधी काळ प्रकल्पांतर्ग डोलवहाळ बंधार्‍याचे पाणी दरवर्षी 15 डिसेंबरदरम्यान डाव्या कालव्यातून माणगाव तालुक्यातील शेतीला सोडले जाते, मात्र या वेळी नोव्हेंबर महिना संपत आला तरी या कालव्यांच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाने अद्यापही हाती घेतली नाहीत. यंदा अतिवृष्टीमुळे  या कालव्यात मोठ्या …

Read More »

वारे ग्रामपंचायत हद्दीतील विजेच्या खांबावर 24 तास दिव्यांचा प्रकाश

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील वारे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांमध्ये पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र महावितरणकडून सार्वजनिक वीज वितरण करण्यासाठी आवश्यक असलेली वीजवाहिनी टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील विजेच्या खांबावरील दिवे 24 तास दिवस-रात्र सुरू असतात. महावितरणचे कळंब उपकेंद्र कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीत आहे. त्या उपकेंद्राची निर्मिती होत असताना …

Read More »