Breaking News

महत्वाच्या बातम्या

थकीत बिले अदा करावीत; महावितरण कॉन्ट्रॅक्टर संघटनेची मागणी

पेण : प्रतिनिधी महावितरणची अनेक कामे ठेकेदारी पद्दतीने केली जात आहेत. मात्र कित्येक महिने होऊन गेले तरी महावितरण कंपनीने संबंधित ठेकेदारांची बिले अदा केलेली नाहीत. या थकीत बिलांची रक्कम त्वरित अदा करावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी रायगड जिल्हा इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मंगळवारी (दि. 19) महावितरणच्या पेण येथील मुख्य …

Read More »

एम इंडिकेटरमधून हटविले लब्धी गार्डनचे नाव

मध्य रेल्वेने केला नेरळकरांच्या भावनांचा आदर कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकाच्या नावापुढे जंक्शन ऐवजी लब्धी गार्डन असे एम इंडिकेटरवर दर्शविले जात होते. याबाबत नेरळ ग्रामस्थ व प्रवाशांनी  मध्य रेल्वेच्या ट्विटर हॅण्डल आणि रेल्वेच्या फेसबुक पेजवर तक्रारींचा भडीमार केला. त्याची दखल घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ जंक्शन …

Read More »

रायगडकरांची पाणीटंचाईची समस्या सुटणार

जिल्ह्यातील धरणे, पाझर तलाव भरले अलिबाग : प्रतिनिधी गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. पाटबंधारे विभागाची 28 पैकी 20 धरणे पूर्णपणे भरली आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या (राजिप) अखत्यारितील आठ लुघपाटबंधारे प्रकल्प आणि 39 पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील बहूतांश …

Read More »

चोळई गाव बनलेय दरडग्रस्त, अपघातप्रवण क्षेत्र

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या काही वर्षांपासून सडवली ग्रुपग्रामपंचायतीच्या हद्दीतील चोळई गाव हे दरडप्रवण क्षेत्र आणि अपघातप्रवण क्षेत्र झाले आहे. हे दुहेरी संकट ओढविण्यामागे प्रशासनच कारणीभूत आहे. नैसर्गिक आपत्ती या सबबीखाली या गावावर ओढविणार्‍या आपत्तींचे वर्णन करून आजमितीस सर्व संकटांना पांघरूण घालून बळींच्या वारसांना मदत आणि आपत्तीप्रवण …

Read More »

वचनपूर्तीचे समाधान

महाराष्ट्रात जवळपास गेला महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे काहींच्या चेहर्‍यावर निराशेचे ढग दाटून आलेले दिसले खरे, परंतु त्याच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 टक्के ओबीसी आरक्षणासह त्वरीत घेण्याचे आदेश दिल्याने समाजातील एका मोठ्या समुहाला दिलासा मिळाला आहे. गेले …

Read More »

वीज ग्राहकांच्या समस्या सोडवा

आगरी समाजाच्या शिष्टमंडळाचे अधीक्षक अभियंत्यांना साकडे पेण : प्रतिनिधी वीज ग्राहकांच्या विविध समस्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय आगरी सामाजिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी महावितरणचे पेण येथील अधीक्षक अभियंता इब्राहिम मुलाणी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले.दर महिन्याचे वीज बिल …

Read More »

सावरोली-खारपाडा मार्गावरील प्रवास धोकादायक खोपोली : प्रतिनिधी

सावरोली-खारपाडा राज्यमार्गावर मुसळधार पावसात पडलेल्या खड्ड्यांचा आकार वाढतच असून या रस्त्यावर दुचाकीचे रोज अपघात घडत आहेत.  सावरोली-खारपाडा राज्य मार्गावर तीन ठिकाणी उड्डाणपूल आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उड्डाणपूल असून दरवर्षी पावसाळ्यात पुलाच्या दोन्ही बाजूला खड्डे पडतात. यंदा जुलै महिन्यात कोसळलेल्या पावसात माजगाव, माडप गावाच्या हद्दीतील पुलाच्या दोन्ही बाजूला उतारावर खड्डे पडले …

Read More »

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधीस सात लाखांचा धनादेश सुपूर्द

अलिबाग : प्रतिनिधी प्रबोधनाबरोबरच समाजसेवा करणार्‍या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रायगड जिल्हा पोलीस कल्याण निधीकरिता ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते सात लाखांचा धनादेश  बुधवारी (दि. 20) रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. रेवदंडा येथे झालेल्या या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक अतुल …

Read More »

चिरले-खालापूर रस्त्याचा बृहद आराखडा तीन महिन्यांत सादर होणार

मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील चिरले-खालापूरदरम्यान रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा बृहद आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून आराखड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन महिन्यांत आराखडा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतूची उभारणी करण्यात येत आहे. या सागरी सेतूमुळे …

Read More »

नवी मुंबईतील गवते दामत्याने समर्थकांसह घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईच्या दिघा भागातील मातब्बर माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 19) माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला. त्यांनी बुधवारी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक …

Read More »