Breaking News

महत्वाच्या बातम्या

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरणमध्ये मिलन ज्वेलर्सचे उद्घाटन

उरण : वार्ताहर उरण शहरातील साठे हॉटेलसमोर असलेल्या मिलन ज्वेलर्सचे उद्घाटन शनिवारी  (दि. 7) आमदार महेश बालदी यांच्या हस्ते करण्यात आले. मिलन ज्वेलर्सचे मालक शिवसिंह खरवड यांनी आमदार महेश बालदी व मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, शहर …

Read More »

…तर ओबीसी समाजावर अन्याय

ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्त ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर हा ओबीसी समाजावर अन्याय असेल, असे प्रतिपादन ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केले. शासनाने गेल्या 30 महिन्यांच्या काळात काहीही काम केलेले नाही. समर्पित आयोग तयार करून त्या अंतर्गत त्रिसुत्री …

Read More »

नवीन पनवेलमध्ये विजेचा खेळखंडोबा

नगरसेवक समीर ठाकूर यांचे महावितरणला निवेदन; मोर्चा काढण्याचा इशारा पनवेल : वार्ताहर उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच नवीन पनवेलमध्ये वारंवार वीज खंडित होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा कारभार उन्हाळ्याच्या दिवसात नियोजन शून्य झालेला असून आठवड्यात अनेक वेळा वीज खंडित होत आहे. यासोबतच वीज खंडित होण्याची …

Read More »

“स्व. जनार्दन भगत यांचे कार्य अजरामर”

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उद्गार; पुण्यतिथीनिमित्त अभिवादन पनवेल : रामप्रहर वृत्त स्वतःच्या प्रकृतीची काळजी न करता शेवटच्या श्वासापर्यंत समाजस्वास्थ्यासाठी झटणारे स्व. जनार्दन भगत यांचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील कार्य अजरामर आहे. त्यांचा वारसा घेत आपण सर्व वाटचाल करीत असून जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देऊन नवी …

Read More »

महाड वरंध घाटात टँकर अडकल्याने वाहतूक विस्कळीत

महाड : प्रतिनिधी तालुक्यातील वरंध घाटात एका अवघड वळणावर अवजड ट्रक अडकल्याने महाड-भोर-पुणे मार्गावरील वाहतूक शनिवारी (दि. 7) दुपारी विस्कळीत झाली.  घाट वाहतुकीस धोकादायक असतानादेखील अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने अवजड वाहने अडकून या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे. महाड-भोर-पुणे मार्गावरील वरंध घाटात सलग दोन वर्षे ऐन पावसाळ्यात दरडी कोसळत …

Read More »

रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट

गडावरील कामांना होत असलेला पाणी उपसा थांबवण्याच्या सूचना महाड : प्रतिनिधी ऐतिहासिक किल्ले रायगडावर असलेले पाण्याचे स्त्रोत ऐन मे महिन्यात आटत चालल्याने जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होत असलेल्या श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. येथील गंगासागर तलावातील पाणी गडावरील विकासकामांना वापरले जात आहे. हा उपसा थांबवण्याचे निर्देश जिल्हा …

Read More »

कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी द्या, अन्यथा एक इंचही माती काढू देणार नाही -सुनील गोगटे

कर्जत : प्रतिनिधी तालुक्यातील कोंढाणे धरणातील वीस टक्के पाणी सिंचनासाठी मिळावे तसेच काठावर असलेल्या ग्रामपंचायती व कर्जत नगर परिषदेच्या नळ योजनांसाठीही पाणी मिळावे आणि मुख्य म्हणजे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळावा, त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे अन्यथा धरणासाठी एक इंचही माती काढू देणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा कोकण …

Read More »

खालापूर शहरात रस्ता सुरक्षा उपाययोजना करा

दिलासा फाउंडेशनची आयआरबी कंपनीकडे मागणी खोपोली : प्रतिनिधी अवजड आणि अव्याहत वाहतुकीमुळे खालापूर शहरातून जाणारा रस्ता पादचार्‍यांना धोकादायक वाटत असून, या रस्त्यावर वेग मर्यादेचे बंधन घालावे आणि वर्दळीच्या ठिकाणी रम्बलिंग स्ट्रिप्स बसवाव्यात, अशी  मागणी दिलासा फाउंडेशनने आयआरबी कंपनीकडे केली आहे. बावीस वर्षापूर्वी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अस्तित्वात आला. त्यावेळी जुन्या मुंबई-पुणे …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकात अपघात रोखण्यासाठी बॅरिकेट लावण्याची गरज

कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या नेरळ स्थानकाच्या दोन्ही बाजूला रूळ ओलांडून जाणार्‍यांची संख्या मोठी असते. त्यामुळे सातत्याने अपघात घडत असतात. रूळ ओलांडत असताना होणारे अपघात रोखण्यासाठी मध्य रेल्वेने या स्थानाकात बॅरिकेट लावण्याची मागणी पुढे येत आहे. नेरळ रेल्वे स्थानकात प्रवासी नेहमी रूळ ओलांडत असतात. त्यामुळे या रेल्वे स्थानक परिसरात सातत्याने …

Read More »

कर्जत तालुक्यात पाणीटंचाई

कर्जत : बातमीदार पाणीटंचाई निर्माण झालेल्या कर्जत तालुक्यातील तीन वाड्या आणि दोन गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची केलेली मागणी केली आहे मात्र पंचायत समिती प्रशासन ही मागणी पूर्ण करीत नसल्याने आदिवासी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात उन्हाळा सुरू झाला की, पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार कर्जत …

Read More »