नागोठणे : प्रतिनिधी : चौथा शनिवार, तसेच रविवार आणि त्याला लागूनच सोमवारी लोकसभेच्या मतदानानिमित्त जाहीर करण्यात आलेली सुटी, याचा महामार्गावर परिणाम साधला असून मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलून गेला आहे. कोकणाच्या बाजूकडे जाणारी बहुतांशी चार चाकी वाहने मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, पनवेल, नवी मुंबईचीच असल्याचे या वाहनांच्या क्रमांकांवरून स्पष्ट होत आहे. …
Read More »अलिबागमध्ये स्वच्छता मोहीम
अलिबाग : रामप्रहर : स्वच्छतेमुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच आरोग्य सुदृढ बनण्यास मदत मिळते. स्वच्छतेचा मंत्र सर्वांनीच जोपसला पाहिजे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या अलिबाग सेवा केंद्राच्या सहाय्यक संचालिका अंजू दिदी यांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय आणि रायगडचा युवक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग शहरातील स्मशानभूमी समोरील फुल नगर झोपडपट्टी परिसरात स्वच्छता …
Read More »सुधागडात दारूच्या नशेत एकाची हत्या, आरोपी अटकेत
पाली : दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीतून एकाची हत्या झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) रात्री सुधागड तालुक्यातील कोशिंबळे येथे घडली. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. राजेश शंकर राजिवडे (वय 42, रा. कोशिंबळे, ता. सुधागड) शनिवारी (दि. 27) रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास …
Read More »रोहा बीडीओंकडून मढाली, वांदोली गावांची पाहणी
रोहे ः प्रतिनिधी : पाणीटंचाईचे सावट असलेल्या मढाली, वांदोली व वांदोली आदिवासी वाडी (ता. रोहा) या गावांची गटविकास अधिकारी पंडित राठोड व विस्तार अधिकारी सुनील गायकवाड यांनी पाहणी केली. या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे, मात्र ते लांबून आणावे लागते. टंचाई भासली, तर या गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येईल, …
Read More »श्रीवर्धन तालुक्यात पाणीटंचाई
आठ गावांमधील महिलांची पायपीट सुरू, टँकरची मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष श्रीवर्धन : प्रतिनिधी : तालुक्यातील आठ गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र त्याकडे श्रीवर्धन पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप टंचाईग्र्रस्त ग्रामस्थांकडून केला जात आहे. श्रीवर्धन तालुक्यामधील साक्षीभैरी, कोढे पंचायतन, …
Read More »कोकणही तापले! पोलादपुरातील लोहारमाळमध्ये 44 अंश तापमान
पोलादपूर : प्रतिनिधी राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना कोकणातही उष्मा वाढत असून, पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे रविवारी (दि. 28) 44 अंश एवढ्या तापमानाची नोंद मोबाईलमध्ये दिसून आली. सर्वसाधारणपणे राज्यात विदर्भात उष्णतेचा भडका उडालेला पाहावयास मिळतो, पण रखरखीत उन्हाच्या झळा आता कोकणातही जाणवू लागल्या आहेत. रविवारी दुपारी दोन ते …
Read More »भाजपच्या ताकदीच्या जोरावर गीते विजयी होणार!
अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांचा विश्वास मुरूड : प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीची कोकणात ताकद वाढली असून केंद्र व राज्य शासनाच्या कामावर लोकांचा विश्वास वृद्धिंगत झालेला आहे.विद्यमान सरकारने लोकांच्या विकासाच्या योजनांना प्राधान्य देत मूलभूत सुविधा लोकांना जास्तीत जास्त मिळाव्यात यासाठी कोकणातील विकासाला सुद्धा चालना दिली आहे. कोकणातील लोक …
Read More »दुर्गम केंद्रांवरही पोहचले मतदान कर्मचारी
कर्जत ः बातमीदार मावळ मतदारसंघात होणार्या मतदानासाठी रायगड जिल्ह्यातून मतदान अधिकारी व कर्मचारी आपापल्या केंद्रांवर रुजू होत आहेत, मात्र कर्जत तालुक्यातील दूरवरील आणि दुर्गम भागातील मतदान केंद्रांवरही परिश्रमपूर्वक सर्व साहित्य घेऊन पोहचलेल्या कर्मचार्यांचे कौतुक होत आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे स्वत: डोंगराळ भागात जाणार्या या पथकाशी सातत्याने …
Read More »कर्जत शहरात पोलिसांचा रूट मार्च
कर्जत : प्रतिनिधी 33 मावळ लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान आहे. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. मतदान प्रक्रियेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे यासाठी शनिवारी (27 एप्रिल) सायंकाळी पोलिसांनी कर्जत शहरातील सर्व भागात रूट मार्च केले. 18 …
Read More »वाढलेल्या तापमानामुळे आंबा उत्पादनात घट
अलिबाग : प्रतिनिधी मार्च महिन्यापर्यंत लांबलेली थंडी, मागील 15 दिवसांपासून वाढलेले तापमान या दुहेरी संकटामुळे रायगड जिल्ह्यात यंदा आंब्याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होण्याची भीती रायगडातील आंबा बागायतदार व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण 44 हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी 14 हजार 500 हेक्टर उत्पादनक्षम …
Read More »