Ramprahar News Team

इंग्लंडच्या मैदानांवरील भारताची कामगिरी

मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमध्ये 30 मेपासून क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. क्रिकेटच्या हा महाकुंभात भारताच्या 9 मॅच 6 मैदानांमध्ये खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये एजबॅस्टनचाही समावेश आहे. एजबॅस्टनच्या मैदानातलं भारतीय टीमचं रेकॉर्ड शानदार राहिलं आहे. या मैदानात खेळवण्यात आलेल्या 10 मॅचपैकी 7 मॅचमध्ये भारताचा विजय झाला आहे, तर 3 मॅचमध्ये …

Read More »

जीएस लक्ष्मी आयसीसीच्या पहिल्या मॅच रेफ्री

दुबई : वृत्तसंस्था क्रिकेट विश्वामध्ये भारताचा तिरंगा पुन्हा एकदा दिमाखात फडकला आहे. आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलवरची पुरुषांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. आयसीसीच्या या पॅनलमध्ये भारताच्या जीएस लक्ष्मी यांचा समावेश झाला आहे. जीएस लक्ष्मी या आयसीसीच्या मॅच रेफ्री आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये सहभागी झालेल्या पहिल्या महिला आहेत. 51 वर्षांच्या जीएस लक्ष्मी आतापर्यंत …

Read More »

‘रोहितशी सारखं बोलायला तो माझी पत्नी नाही’

मुंबई : प्रतिनिधी इंग्लंडमध्ये 30 मेपासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. आयपीएल संपल्यामुळे भारतीय टीम आता वर्ल्ड कपच्या तयारीला सुरुवात करेल. आयसीसीच्या स्पर्धांमध्ये शिखर धवनने आतापर्यंत नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये भारताला ओपनर शिखर धवन आणि रोहित शर्मा यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल. आयपीएलच्या मागच्या दोन महिन्यांमध्ये …

Read More »

भारतीय संघाला निर्णायक कामगिरी करावी लागेल -मोहिंदर अमरनाथ

मुंबई : प्रतिनिधी आयपीएल स्पर्धा उरकल्यानंतर आता सर्वांना वर्ल्डकपचे वेध लागले आहे. प्रत्येक टीम वर्ल्डकपसाठी कसून सराव करत आहे. वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करण्याची क्षमता आपल्या खेळाडूंमध्ये आहे. खेळाडू अनुभवी देखील आहेत, परंतु खेळाडूंना योग्य आणि निर्णायक वेळी कामगिरी करून दाखवावी लागेल, असे …

Read More »

मोबाइल टॉवर्सप्रमाणेच वणवे, तरव्यांमुळेही तापमानात वाढ ; पोलादपूरवासीयांना तापमानवाढीचा ताप

पोलादपूर ः प्रतिनिधी रोमिंगमधील मोबाइल ग्राहकांना नेटवर्क क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या हेतूने पोलादपूर तालुक्यात उभारण्यात आलेल्या मोबाइल टॉवर्सप्रमाणेच उन्हाळा सुरू होताच लागणारे वणवे, तरवे आणि वीटभट्टी व्यवसायही तापमानवाढीस कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येते, मात्र तापमानवाढीच्या नैसर्गिक आपत्तीस कारणीभूत ठरणार्‍या या प्रकारांवर निर्बंध घालण्यासाठी कोणतेही कायदेशीर उपाय करण्यात आल्याचे दिसत नसल्याने …

Read More »

जिल्हा रुग्णालयातील त्रुटी दूर करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश ; शासकीय रुग्णालयाला अचानक भेट

अलिबाग ः प्रतिनिधी   रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी (दि. 14) अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला. या वेळी रुग्णांनी तक्रारींचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे वैद्यकीय अधिकारी-कर्मचार्‍यांची चांगलीच धांदल उडाली. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयातील त्रुटी तातडीने दूर करा, असे आदेश पालकमंत्री रवींद्र …

Read More »

केरळमध्ये मान्सून उशिरा ; मराठवाडा, विदर्भात कमी पावसाचा अंदाज

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना तसेच बळीराजाला आता मान्सूनची आस लागली आहे. त्यातच आता केरळमध्ये 4 जून रोजी मान्सून दाखल होईल, असा अंदाज ‘स्कायमेट’ने वर्तवला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भात कमी पाऊस पडेल, अशी शक्यताही ‘स्कायमेट’ने वर्तवली आहे. यंदा देशातील मान्सून अल-निनोच्या प्रभावाखाली राहणार असल्याचे मतही …

Read More »

भारतीय लष्कराचा युनिफॉर्म बदलणार?

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारतीय लष्कराच्या गणवेशात लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. लष्कराचा गणवेश अधिक स्मार्ट आणि सुटसुटीत करण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी लष्कराच्या मुख्यालयाने अधिकार्‍यांकडून सूचना मागवल्या आहेत. लष्करी मुख्यालयाने देशातील जवळपास 11 संचालनालयांना यासाठी पत्र पाठवले आहे. लवकरात लवकर तुमच्या सूचना पाठवा, असे मुख्यालयाने पत्रात म्हटले …

Read More »

पाकच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सीमेवर लष्कर उभारणार एअर डिफेन्स युनिट

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि लष्कराच्या अंतर्गत आढाव्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानी नियंत्रण रेषेवर एअर डिफेन्स युनिट तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पाकिस्तानकडून होत असलेल्या हवाई हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. लष्कराचे हे एअर डिफेन्स युनिट पाककडून होणार्‍या आगळीकीला उत्तर देण्यास सक्षम आहे. पाकिस्तानच्या नियंत्रण …

Read More »

ढगाळ वातावरणामुळे आंबा उत्पादक धास्तावले

खोपोली ः प्रतिनिधी मागील दोन-तीन दिवसांत वातावरणात बदल होऊन आकाशात काळे ढग जमू लागले आहेत. ही मान्सूनपूर्व पावसाची चाहूल असल्याने पाऊस आल्यास नुकसान टाळण्यासाठी आंबा बागायतदार, उत्पादकांनी आहे त्या स्थितीत आंबा काढून बाजारात विक्रीसाठी दाखल केल्याने आंब्याची आवक अचानक वाढली आहे, मात्र बाजारात दाखल होत असलेला आंबा पिकण्यासाठी पूर्ण तयार …

Read More »