Breaking News

Ramprahar News Team

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करा – ना. रवींद्र चव्हाण

मुंबई : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झारापदरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करावे. अपूर्ण कामे पूर्ण करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्गावरील कामासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी (दि. 5) सार्वजनिक बांधकाम …

Read More »

गुजरातमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय

अहमदाबाद : वृत्तसंस्था संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि. 8) जाहीर झाला. भाजपने ऐतिहासिक कामगिरी केली असून 184 पैकी 156 जागा जिंकल्या आहेत. गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपचे सरकार आले आहे. काँग्रेसचा मात्र दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला केवळ 17 जागांवर विजय मिळवता आला आहे. दुसरीकडे आक्रमक …

Read More »

रायगडच्या किनार्‍यावर मासळी सुकवण्याची लगबग

अलिबाग : प्रतिनिधी सद्या  सुक्या मासळीला मागणी वाढली आहे.  सुक्या मासळीचे भाव वाढले आहेत. सुक्या मासळीच्या विक्रीतून यंदा करोडो रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे. मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या रायगड जिल्ह्यातील किनार्‍यांवर सध्या मासळी सुकवण्याची लगबग पहायला मिळत आहे. अलिबाग, मुरूड, उरण आणि श्रीवर्धनच्या समुद्र किनार्‍यावरील कोळीवाड्यात मासळी सुकवण्यास टाकल्याचे चित्र सर्वत्र …

Read More »

तरुणांनो संशोधनाकडे वळा-प्रज्ञेश म्हात्रे

पनवेल : प्रतिनिधी ज्यांना कोणाला शास्त्रज्ञ व्हायचे असेल त्यांनी गणिताकडे लक्ष द्यावे. कारण या क्षेत्रात गणिताला खूप महत्त्व आहे. यासोबतच तुमची उत्सुकता मरून देऊ नका. तुमचे  आई-वडील किंवा शिक्षकांकडून उत्तरे मिळत नसतील तर तुमच्या हातात स्मार्टफोन आहेत त्यातून गुगल किंवा फेसबुकद्वारे ती शोधण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमची उत्सुकता वाढेल. तुम्हाला …

Read More »

उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ

बेहिशेबी मालमत्तेची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू मुंबई : प्रतिनिधी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याच्या कथित आरोपांच्या तक्रारीची आर्थिक गुन्हे विभागाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी (दि. 8) उच्च न्यायालयात दिली. विशेष म्हणजे या आरोपांची केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरील निर्णय …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूमध्ये रयत विज्ञान प्रदर्शन

पनवेल : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमे आयोजित करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने गुरुवारी (दि. 8) कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेजमध्ये सशक्त भारत, सदृढ भारत, सक्षम भारत या शिर्षकाखाली रयत विज्ञान भव्य …

Read More »

रायगड जिल्ह्यात 50 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. महाड तालुक्यात सर्वाधिक 22 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याखालोखाल पोलादपूर तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. रायगड जिल्ह्यात 240 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीत उमदवरी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर होती. …

Read More »

बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करा

रोहा ज्वेलर्स असोसिएशनचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन रोहे : प्रतिनिधी शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करा, अशी मागणी रोहा-कोलाड ज्वेलर्स असोसिएशनने  मंगळवारी (दि. 6) रोहा अष्टमी नगर परिषदच्या  मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. रोह्यात नुकतेच ज्वेलर्सचे दुकान फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने सराफा व्यावसायिकांत भितीचे वातावरण आहे. दरम्यान, …

Read More »

मुरूडमध्ये चार सरपंच पदासाठी 13 तर ग्रामपंचायत सदस्य पदाच्या 32 जागांसाठी 71 उमेदवार

मुरूड : प्रतिनिधी तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यातील थेट सरपंच पदाकरिता 24 तर सदस्यपदासाठी 117 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. बुधवारी (दि. 7) अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी सरपंचपदाचे 11 तर सदस्य पदाचे 46 उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. मुरूड तहसीलदार कार्यालयासमोरील दरबार हॉलमध्ये बुधवारी सकाळी …

Read More »

शक्तिवर्धकाच्या शोधात…

ज्या महाविकास आघाडीसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला, ती महाविकास आघाडी आज ‘आहे आणि नाही’ अशा अवस्थेत तग धरून आहे. मुळात ही आघाडी केवळ सत्तेपुरती होती हे उघड आहे. सत्ता गेल्यानंतर ही आघाडी निरर्थक ठरल्यात जमा आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी नवी राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी …

Read More »