Breaking News

Ramprahar News Team

भाजपतर्फे ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन 

पनवेल : देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध सेवाकार्य असलेल्या ‘सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले असून देशभर चालणाऱ्या या उपक्रमात रायगड जिल्ह्याचा वाटा महत्वाचा असेल, असे प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव तसेच महिला मोर्च्याच्या माजी राष्ट्रीय अध्यक्षा आणि …

Read More »

‘लम्पी’चा प्रादूर्भाव रोखण्याकरिता सतर्कता बाळगावी

सुधागड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कोकरे यांचे पशुपालकांना आवाहन पाली : प्रतिनिधी गाई, म्हशीमध्ये होणार्‍या लम्पी स्कीन या रोगाचा प्रादूर्भाव रोखण्याकरिता पशुपालकांनी काळजी घ्यावी व सतर्कता बाळगावी, असे आवाहन सुधागड तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी केले आहे. जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे या जिल्ह्यामध्ये लम्पी स्कीन या …

Read More »

खालापुरातील जखमी पोलीस, होमगार्ड यांच्या मदतीसाठी दिलासा फाउंडेशनचा पुढाकार

खालापूर : प्रतिनिधी एक्सप्रेस वेवरील अपघातग्रस्तांना मदत करताना जखमी झालेले खालापूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व होमगार्ड यांच्या मदतीसाठी दिलासा फाउंडेशने पुढाकार घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून फाउंडेशनने गुरुवारी (दि. 8) पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्याकडे पाच हजारांचा धनादेश सुपूर्द केला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 5 सप्टेंबर रोजी रात्री कारला अपघात झाला …

Read More »

वाडगाव येथील कुस्ती स्पर्धेत गावदेवी आंदोशी संघ विजेता

प्रथम क्रमांकाची मानाची गदा पारनेरच्या ॠषीकेश हांडे यांने पटकावली रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे हनुमान तालिम संघ व वाडगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत आंदोशी संघ विजेता ठरला, तर टाकादेवी मांडवा द्वितीय आणि जय हनुमान तालिम संघ-पनवेल तृतीय क्रमांकाचा मानकरी …

Read More »

माणगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; अनेक नद्यांना पूर

माणगाव : प्रतिनिधी गेले दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळत असल्याने माणगाव तालुक्यात अनेक नद्यांना पूर आला असून,  जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडू नये, म्हणून महसूल खात्याकडून दक्षता बाळगण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. माणगाव तालुक्यात 7 व 8 सप्टेंबर रोजी …

Read More »

द्रुतगती मार्गावर कंटेनरची कारला धडक; एक ठार

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ गुरुवारी (दि. 8) दुपारी 3.45  वाजण्याच्या सुमारास कंटेनरने इर्टिगा कारला पाठीमागून ठोकर दिली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला. द्रुतगती मार्गावरून गुरुवारी दुपारी कंटेनर पुणे ते मुंबई असा जात होता. बोरघाटातील अफकॉन कंपनीजवळ ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला …

Read More »

लहरी हवामानाला लागू पडली पेर भाताची मात्रा; कर्जतच्या हरिश्चंद्र ठोंबरे यांचा प्रयोग यशस्वी

कर्जत : प्रतिनिधी यंदा कर्जत तालुक्यात भातपिकाच्या पेरण्या वेळेवर झाल्या होत्या मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने भात रोपे हवी तशी तयार झाली नाहीत. तरीही खचून न जाता तालुक्यातील एका प्रगतशील शेतकर्‍याने पेर पद्धतीने बियाण्याची पेरणी करून भात पिक घेण्याचा निर्णय घेतला आणि तो कमालीचा यशस्वी झाला. यामुळे मुख्य म्हणजे मजुरांची …

Read More »

म्हसळ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस 

म्हसळा : प्रतिनिधी म्हसळा शहरासह संपूर्ण तालुक्यातील विविध भागांत बुधवारी संध्याकाळी ढगफुटीसदृष्य पाऊस पडला. दुपारी आकाशांत ढगांची जमवाजमव झाली, त्यानंतर जोरदार वारा, विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. आभाळ फाटल्याप्रमाणे पाऊस कोसळत होता. या वेळी महावितरणची बत्ती गुल झाल्याने बहुतांश भागात अंधाराचे सावट पसरले होते. अचानक …

Read More »

रोह्यातील डॉ. देशमुख महाविद्यालयाला राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यापीठ स्तरीय सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार

रोहे : प्रतिनिधी कोकण एज्युकेशन सोसायटीच्या रोहे येथील डॉ.चिंतामणराव देशमुख वाणिज्य व सौ. कुसुमताई ताम्हाणे कला महाविद्यालयाला मुबंई विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय सेवा योजना सर्वोत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. शिक्षक दिनानिमित्त मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील फिरोजशहा मेहता भवनात झालेल्या  कार्यक्रमात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते डॉ. …

Read More »

प्रधानमंत्री आदि आदर्श ग्रामविकास योजना… रायगड जिल्ह्यातील 88 गावांची निवड

अलिबाग : प्रतिनिधी अनुसूचित जमातीच्या लोकसंख्या असलेल्या गावांचा एकात्मिक, आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री आदि आदर्श ग्रामविकास ही योजना प्रस्तावित केली आहे. राज्यातील ज्या गावांमध्ये किमान 500 व 50 टक्के इतकी आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे, अशा महाराष्ट्रातील एकूण तीन हजार 605 गावांची निवड केंद्र शासनाने या योजनेकरिता …

Read More »