Ramprahar News Team

भाताणकरांना नववर्षाची भेट; जलजीवन मिशन अंतर्गत आज पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर नल, हर घर जल’नुसार भाताण गावात 71 लाख 57 हजार रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून या विकासकामांचे भूमिपूजन शनिवारी (दि. 1) सायंकाळी 4.30 वाजता आयोजित करण्यात आले आहे. भाताण गावात होणार्‍या या योजनेचे भूमिपूजन …

Read More »

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचे वर्चस्व; आता बांधणी कोकणातील आगामी निवडणुकांसाठी -राणे

कणकवली : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सिद्धिविनायक सहकार पॅनलने 19 पैकी 11 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतमोजणीनंतर निकाल समोर आले. सहकारी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था व ग्राहक सहकारी …

Read More »

नववर्षाचा उत्साह, मात्र झपाट्याने वाढणार्‍या कोरोनामुळे चिंता

पनवेल : राज्यात सर्वजण नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी करत असताना कोरोनानेही डोके वर काढले आहे. कोरोनाचे निर्बंध असले तरी नव्या वर्षाचे स्वागत उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतेकांनी नववर्षाचे स्वागत घरात राहून करणेच पसंत केले. त्याचबरोबर कोरोना रुग्णांची संख्या वाढून तो आकडा आठ हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे …

Read More »

भारत आठव्यांदा आशिया चषक विजेता; श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव

दुबई : वृत्तसंस्था भारताचा अंडर-19 संघ आशिया कप चॅम्पियन बनला आहे. दुबईत शुक्रवारी झालेल्या अंतिम सामन्यात त्याने डीएलएस पद्धतीनुसार श्रीलंकेचा 9 गडी राखून पराभव केला. यासह ज्युनियर इंडियन टीम इंडियाने विक्रमी आठव्यांदा अंडर-19 आशिया कप जिंकला आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना हरल्यानंतर भारतीय संघाने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आणि अंतिम फेरीत श्रीलंकेचा …

Read More »

राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा; महाराष्ट्राच्या महिलांची विजयी पताका

जबलपूर : वृत्तसंस्था बहुप्रतिक्षित वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद  स्पर्धेतील दोन्ही गटांची अंतिम फेरी अपेक्षेप्रमाणे कट्टर प्रतिस्पर्ध्यामध्ये रंगली, परंतु यंदा महाराष्ट्राच्या महिलांनी 2019मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढत भारतीय विमानतळ प्राधिकरणाला धूळ चारून जबलपूरमध्ये विजयी जल्लोष केला, मात्र रेल्वेविरुद्ध पुरुषांचे सलग दुसर्‍यांदा विजेतेपद हुकले आहे.  महाराणी लक्ष्मीबाई विद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या महिलांच्या अंतिम …

Read More »

गणपतीवाडी ते आंबेगाव रस्त्यावर दुभाजक उभारावेत -बंडू खंडागळे

पेण : प्रतिनिधी तालुक्यातील गणपतीवाडी बायपास ते आंबेगाव रस्त्यावर लहान-मोठे अपघात होत असून याठिकाणी लवकरात लवकर दुभाजक बसवावेत अशी मागणी भाजप जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. पेण-खोपोली बायपास रस्ता हा एक्सप्रेस हायवे प्रमाणे बनल्याने या रस्त्यावरून अनेक वाहने जात असतात. यामध्ये चारचाकी, तीनचाकी प्रवासी रिक्षांचाही समावेश …

Read More »

रोह्यात विनामास्क वावरणार्‍यांवर कारवाई

रोहे : प्रतिनिधी कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहा नगर परिषद व पोलीस विभागाकडून गुरुवारी (दि. 30) बाजारपेठेत विनामास्क वावरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना प्रादुभाव रोखण्यासाठी शासनाने कोरोना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. सॅनिटायझरचा वापर करा, मास्क वापरा, गर्दी करु …

Read More »

पोलिसांकडे चांगल्या भावनेतून पहा -संजय भावसार; खोपोलीत पोलीस कर्मचार्‍यांचा सन्मान

खोपोली ़: प्रतिनिधी अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षण संघटनेच्या  वतीने उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचा नुकताच खोपोलीतील ब्राम्हण सभागृहात सन्मान करण्यात आला. पोलिसांकडे सकारत्मक भावनेतून पाहिल्यास त्याच्या वेदनांची जाणीव होईल, असे मत संघटनेचे राज्याचे अध्यक्ष संजय भावसार यांनी व्यक्त केले. खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात …

Read More »

पेण तालुक्यातील 27 गावे आणि 39 वाड्यांवर पाणीटंचाईचे संकट; शहापाडा धरणात फक्त 15 दिवसांचा साठा

पेण : प्रतिनिधी उत्तर शहापाडा योजनेतील 27 गावे, 39 वाड्यांना पाणीपुरवठा करणार्‍या शहापाड़ा धरणाची पाणीपातळी खालावली असून जेमतेम 15 दिवस पुरेल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे. सध्या धरणात मृत गाळयुक्त पाणी शिल्लक असून तेच पाणी पिण्यासाठी सोडले जाते.  सध्या सर्दी, खोकला या आजारांनी नागरिक त्रस्त असताना गाळमिश्रित पाणी सोडले जात …

Read More »

नेरळमध्ये हुतात्म्यांना अभिवादन

कर्जत : बातमीदार हुतात्मा भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्यासह गोमाजी पाटील यांनी शांत असलेल्या माणसाला जगण्याची आणि प्रसंगी आक्रमक होण्याची शिकवण दिली. त्यामुळेच माझ्याकडून स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसर्‍याचे प्राण वाचविण्याची हिम्मत निर्माण झाली, असे प्रतिपादन शूरवीर मयूर शेळके यांनी गुरुवारी (दि. 30) नेरळ येथे केले. नेरळ येथील कोतवालवाडी …

Read More »