रायगड जिल्ह्याशी थेट संपर्क असलेल्या प्रतापगडाची 58 एकर जमीन सातारा संस्थानच्या नावे असल्याने संपूर्ण प्रतापगड परिसर त्या जिल्ह्याशी संलग्न आहे, मात्र यंदाच्या अतिवृष्टी आणि भूस्खलन काळात प्रतापगडाच्या मदतीला रायगड जिल्ह्याचे प्रशासन धावून गेले. प्रतापगडावरील मशाल मोर्चा असो अथवा प्रतापगडावरील अफझलखानाच्या कबरीची नासधूस केल्याची घटना, या सर्व घटनांमध्ये रायगड जिल्ह्याचा समावेश …
Read More »शिक्षणाचा खेळखंडोबा
सर्वच क्षेत्रातील व्यवहार पूर्ववत होत असताना शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचे गाडे अजूनही रूळावर आलेले नाही ही खरे तर महाराष्ट्रासाठी शरमेची बाब म्हणायला हवी. शिक्षणाचा गाडा रुळावर आणण्यासाठी गरज आहे ती ठाम आणि सर्वसमावेशक धोरणाची आणि त्याहीपेक्षा अधिक निर्णयांची. शिक्षणाबाबत काही निर्णय घेण्यासाठी नेतृत्वच उपलब्ध नसल्यामुळे सगळा खेळखंडोबा झाला आहे. कोरोना …
Read More »राज्यस्तरीय गणेशमूर्ती स्पर्धेत पेणच्या मृगज कुंभार यांची मूर्ती ठरली सरस
पेण : प्रतिनिधी येथील श्री गणेश मित्र मंडळ आणि गणपती कारखानदार यांच्या संयुक्त विद्यमाने पेणमध्ये राज्यस्तरीय गणेशमूर्तींचे प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पेण तालुक्यातील मूर्तिकार मृगज कुंभार या मूर्तिकाराने प्रथम क्रमांक पटकावला. तर नितीन पेडणेकर (पेण) याने द्वितीय आणि आकाश लिहे (ठाणे) यांनी तृतीय क्रमांक पटकविला. …
Read More »डोलकाठीचा गरूडध्वज ढाक डोंगरावरून आणला; कर्जत देऊळवाडीची यात्रा यंदाही रद्द, भैरीनाथाचे दर्शन मिळणार
कर्जत : प्रतिनिधी देऊळवाडी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला बांधण्यासाठी ढाक डोंगरावरील भैरी मंदिरातून गरुडध्वज आणला, मात्र यंदाही कोरोनाच्या संकटामुळे कार्तिक पौर्णिमेची यात्रा रद्द करण्यात आली असून, भाविकांना सर्व शासकीय नियम पाळून दर्शन घेता येणार आहे. सकाळी गरुडध्वजाची पूजा ज्येष्ठ वारकरी नारायण बडेकर यांच्या हस्ते मंदिरात करण्यात …
Read More »शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या राज्याध्यक्षपदी राजेश सुर्वेंची फेरनिवड; नाशिकच्या अधिवेशनात नवीन कार्यकारिणी जाहीर
अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग या शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष राजेश सुर्वे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नाशिक येथे झालेल्या अधिवेशनात नवीन कार्यकारिणी जाहीर झाली. सन 2018मध्ये या संघटनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्या वेळी राजेश सुर्वे यांच्या खांद्यावर संघटनेची धुरा सोपवण्यात आली होती. तीन …
Read More »मुरूड तहसील कार्यालयासमोर बाणकोटकर यांचे उपोषण सुरू
मुरूड : प्रतिनिधी एफआरआयमध्ये असलेल्या सर्व आरोपींची नावे न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात समाविष्ट करावीत, या मागणीसाठी राजपुरी कोळीवाड्यातील हरिदास बाणकोटकर यांनी सोमवार (दि. 15)पासून मुरूड तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. हरिदास बाणकोटकर यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी राजपुरी कोळीवाड्यातील काही ग्रामस्थांनी हल्ला करून अंगणातील वस्तू समुद्रात फेकून दिल्या होत्या, …
Read More »नागोठण्यातील ‘रिलायन्स’विरोधातील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले; पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड
पाली : प्रतिनिधी येथील रिलायन्स कंपनीविरोधात स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांनी कडसुरे येथे सोमवारी (दि. 15)जनआंदोलन छेडण्यात आले. सायंकाळपर्यंत तोडगा न निघाल्याने आंदोलन चिघळले. या वेळी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली. स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्त यांना कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे, या प्रमुख मागणीसाठी शिहू नागोठणे विभागातील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्तांनी सोमवारी …
Read More »माणगाव, पोलादपूर नगरपंचायतींची आरक्षण सोडत जाहीर
माणगाव : प्रतिनिधी येथील नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सदस्यपदाची आरक्षण सोडत सोमवारी (दि. 15) सकाळी माणगाव तहसील कार्यालय काढण्यात आली. 17 सदस्यांच्या माणगाव नगरपंचायतीमधील नऊ जागा महिलांसाठी राखीव आहेत. या आरक्षणामुळे अनेक इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने ते नाराज झाले आहेत. माणगाव नगरपंचायतीची पहिली सार्वत्रिक निवडणूक 10 जानेवारी 2016 रोजी झाली होती. …
Read More »नेरळमधील शिवसैनिकांचा मनसेमध्ये प्रवेश
कर्जत : बातमीदार नेरळ शहरातील अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या समर्थकांसह शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. मनसे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला. या वेळी हेमंत चव्हाण, सचिन देशमुख, यासिन शेख, सचिन गायकर, जयेश भोईर, भूषण मोरे, …
Read More »स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीचे घोडे अडले; विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
माणगाव : प्रतिनिधी दिघी-पुणे राष्ट्रीय मार्गावरील माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्यागिक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. मात्र स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती झाली नसल्याने या भागातील सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. माणगाव तालुक्यात औद्योगिक वसाहत विकसित करण्यासाठी सुमारे 30 वर्षापूर्वी विळे-भागाड परिसरातील जमिनी संपादित करण्यात आल्या होत्या. या विळे-भागाड औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper