Breaking News

Ramprahar News Team

सायकलिंगमध्ये श्रेयसीला रौप्यपदक

पनवेल : रामप्रहर वृत्त सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या मान्यतेने वाशिम जिल्हा सायकलिंग असोसिएशनच्या वतीने दुसरी राज्यस्तरीय रोड सायकलिंग स्पर्धा नुकतीच वाशिममधील विठ्ठलवाडी भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नवीन पनवेल येथील श्रेयसी कांचन कोठेकर हिने रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करीत रौप्यपदक पटकाविले. स्पर्धेत महाराष्ट्रातील जिल्हा संघांचा समावेश होता. स्पर्धा …

Read More »

जलतरणपटू स्वराली म्हात्रेकडून धरमतर-गेट वे अंतर पोहून पार

पेण : प्रतिनिधी येथील जलतरणपटू स्वराली म्हात्रे हिने धरमतर ते गेट वे ऑफ इंडिया हे 36 किमीचे सागरी अंतर 12 तास व 31 मिनिटांत पोहून नुकतेच पार केले. याबद्दल तिचे कौतुक होत आहे. स्वराली म्हात्रे हिने 3 मार्च रोजी पहाटे धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सागरी अंतर पोहण्यास सुरुवात …

Read More »

महिला वर्ल्डकप : भारत अंतिम फेरीत; पावसामुळे इंग्लंडविरुद्धची सेमीफायनल रद्द

सिडनी : वृत्तसंस्था महिला टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे भारतीय संघाने गट फेरीतील गुणांच्या आधारे अंतिम फेरीत प्रवेश केला. गट ‘अ’मध्ये असलेल्या भारतीय संघाने आठ गुणांसह अव्वल स्थान मिळवले होते, तर गट ‘ब‘मध्ये इंग्लंडचा संघ सहा गुणांसह दुसर्‍या स्थानावर …

Read More »

कॅगच्या अहवालाचे आश्चर्य -देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी कॅगच्या अहवालात अनियमितता झालेली नसल्याचा दावा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कॅगच्या अहवालात उल्लेखित बहुतांश प्रकल्प हे 2014पूर्वीचे आहेत. त्यामुळे केवळ ‘सिलेक्टिव्ह लीकेज’ का केले गेले याचे आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी बुधवारी (दि. 4) दिली. याआधीचा स्वप्नपूर्ती गृहप्रकल्पातील महत्त्वाचा भाग …

Read More »

पांडवकड्याचे सौंदर्यीकरण आणि विकास करावा; आमदार प्रशांत ठाकूर यांची आग्रही मागणी

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्त खारघर येथील पांडवकडा या निसर्गरम्य स्थळाचे सौंदर्यीकरण व विकास करण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकित प्रश्न दाखल करून पांडवकड्याच्या विकासासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली, अशी विचारणा केली. ‘पनवेल तालुक्यातील खारघर येथील …

Read More »

40 मिनिटांचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत; कशेडी घाट पर्यायी बोगद्याचे काम युद्धपातळीवर

अलिबाग : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावरील  कशेडी घाटाला पर्याय म्हणून बोगदा तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या बोगद्यामुळे 40 मिनिटांच्या या प्रवासाचे अंतर अवघ्या 10 मिनिटांत कापता येणार आहे. त्याचबरोबर अपघातदेखील टळणार आहेत. कशेडी घाट पोखरून तयार केला जाणारा हा बोगदा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. …

Read More »

ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी ‘लीलावती’त दाखल

मुंबई ः ज्येष्ठ निरूपणकार, स्वच्छतादूत, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना बुधवारी (दि. 4) मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अप्पासाहेब सध्या 74 वर्षांचे आहेत. त्यांची नियमित आरोग्य तपासणी दरवेळी पुण्यातील एका रुग्णालयात होत असते. या वेळी प्रथमच ती मुंबईतील लीलावती रुग्णालयात होणार आहे. त्यामुळे श्रीसदस्यांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. …

Read More »

भाजप पनवेल तालुका कार्यकारिणी जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी तालुका मंडलची कार्यकारिणी जाहीर केली आहे.   या कार्यकारिणीत तालुका सरचिटणीसपदी राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, उपाध्यक्षपदी संजय पाटील, संजय टेंबे, राम पाटील, चाहू पाटील, कमलाबाई देशेकर, मित्तल पाटील, सचिवपदी जयवंत देशमुख, …

Read More »

महाविकास आघाडीत शिवसेनेची कोंडी संजय राऊतांच्या ‘त्या’ ट्विटचा नेमका अर्थ काय?

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीशी जुळवून घेत सरकार स्थापन केले. हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा दावा तिन्ही पक्षांचे नेते करीत आहेत, मात्र अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीतील कुरघोडी समोर येत आहेत. अशातच राज्यातील सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा बुचकळ्यात टाकणारे ट्विट केले आहे. …

Read More »

निर्भया बलात्कार व हत्या प्रकरण; पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्लीत 2012मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने दाखल केलेली दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. यामुळे निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पुन्हा एकदा डेथ वॉरंट जारी करण्यासाठी वकिलांनी कोर्टाकडे धाव घेतली असून, …

Read More »