Ramprahar News Team

रस्ता खोदल्याने गावांचा संपर्क तुटला; काळणवाडीतील ग्रामस्थ आक्रमक

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायनी परीसरातील चांभार्लीहून काळणवाडीकडे जाणारा रस्ता खोदल्याने दोन हजार घरांचा संपर्क तुटला असून शासनाच्या या प्रकाराविरोधात शेकडो ग्रामस्थांनी रस्त्यावर ठाण मांडून आपली नाराजी व्यक्त केली. कालणवाडी, रिसवाडी व आसपासच्या सोसायट्यांकडे जाणारा रस्ताचे खोदकाम होणार असा असे हरेष उतेकर यांनी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडे कळविताच ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश खारकर …

Read More »

साई डिझाईन स्टुडिओचे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरात साई डीझाईन स्टुडीओ हे कपड्याचे दुकान नव्याने सुरु झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याहस्ते गुरुवारी (दि. 13) करण्यात आले. पनवेल शहरामध्ये मनोज पटेल आणि संजय पटेल यांनी नव्याने साई डीझाईन स्टुडीओ हे कपड्याचे दुकान सुरु केले आहे. या दुकानामध्ये विविध …

Read More »

तळोजातील कंपन्यांनी आवश्यक कार्यवाही करावी; आमदार प्रशांत ठाकूर यांची सूचना

तळोजा : रामप्रहर वृत्त असंरक्षित कामगारांसाठी शासनाने केलेल्या नियमांना हरताळ फासून तळोजामधील काही कंपन्या स्वत:चा मनमानी कारभार चालवित आहेत. कामगारांचे वेतन, त्यांचा भविष्य निर्वाह निधी, तसेच वैद्यकीय सुविधांबाबत हलगर्जीपणा करणार्‍या कंपन्यांविरोधात अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी कंपन्यांना आवश्यक कार्यवाही करावी, अशी सूचना तळोजा येथील इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या कार्यालयात …

Read More »

बचतगट व उद्योजक मेळाव्याला प्रतिसाद

पनवेल : वार्ताहर पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने लोकशाही पंधरवडा 2020 निमित्ताने बचतगट, व्यावसायिक आणि उद्योजक यांच्या चर्चासत्र व परिचय मेळाव्याचे आयोजन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात येथे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपमहापौर जगदीश गायकवाड, उपआयुक्त जमीर लेंगरेकर, प्रसिध्द उद्योजक व-आय फोर इन्व्हेस्टमेंट प्ल्यनर्स प्रा. …

Read More »

उमरठमध्ये गरजणार स्वातंत्र्याची सिंहगर्जना

उरण : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज्याचे सुभेदार यांच्या 350व्या पुण्यतिथी निमित्त उरण तालुक्यातील कळंबूसरे येथील आदर्श ग्रामोद्धार मंडळ निर्मित स्वातंत्र्याची सिंहगर्जना या ऐतिहासिक नाट्य कलाकृतीचा प्रयोग उमरठ (ता. पोलादपूर) येथे सादर होणार आहे. पर्यायाने तान्हाजीच्या मातृभूमीत स्वराज्याच्या सिंह गर्जनेचे स्वर दुमदुमणार आहेत. स्वराज्याचे सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या 350 पुण्यतिथी सप्ताहानिमित्त …

Read More »

कॉलेज मुलींना दिली प्रेमविवाह न करण्याची शपथ

अमरावती : प्रतिनिधी प्रेम व्यक्त करण्यासाठीचा खास दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. मात्र याच दिवसाचे औचित्य साधून एका महाविद्यालयाने त्या महाविद्यालयातील मुलींना एक शपथ दिली आहे. ‘ना प्रेम करणार ना प्रेमविवाह’ तसेच हुंडा न देता लग्न करण्याचा निश्चयही या वेळी मुलींनी केला. हल्ली तरुण वयातच मुलांमध्ये आणि मुलींमध्ये प्रेम प्रकरणांंचे प्रमाण …

Read More »

सिडकोच्या उद्यानात शौचालय सुरू ; नगरसेविका नेत्रा पाटील यांचा पाठपुरावा

खारघर : रामप्रहर वृत्त खारघर येथील सेक्टर 19 प्लॉट क्र. 43 येथे सिडकोने उद्यान विकसित केले आहे. या उद्यानात शौचालयदेखील होते, परंतु सिडकोच्या व कंत्राटदारामधील तांत्रिक अडचणीमुळे हे शौचालय बंद होते. ही बाब नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी पाठपुरावा केला व त्याची दखल घेत बंद शौचालय सुरू करण्यात …

Read More »

वीर वाजेकर महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

उरण : वार्ताहर रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे येथील वीर वाजेकर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने ’आपत्ती व्यवस्थापन’ विषयावर कार्यशाळा झाली. प्रमुख पाहुणे नागरी संरक्षण दलाचे सहाय्यक उपनियंत्रक एम. के. म्हात्रे होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरख सांगळे होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक प्रा. डॉ. आमोद …

Read More »

वीज दरवाढीविरोधात कामगार संघटना आक्रमक

उरण : रामप्रहर वृत्त जेएनपीटी वसाहतीमध्ये राहणार्‍या कामगारांना पुरविण्यात येणार्‍या विजेच्या दरात अन्यायकारक भरमसाठ वाढ केली. त्यासंदर्भात जेएनपीटी वर्कर्स युनियनने मुख्य सचिव यांची गुरुवारी त्यांच्या दालनात भेट घेऊन प्रशासनाची ही कृती बेकायदेशीर आहे हे पटवून देऊन परिपत्रक त्वरित रद्द करण्याची मागणी केली व सर्व मान्यताप्राप्त कामगार संघटनांशी चर्चा केल्यानंतर यासंबंधी …

Read More »

वनराई बंधारे ठरताहेत शेतकरी, पशुपक्ष्यांसाठी वरदान

मोहोपाडा : प्रतिनिधी गाव पातळीवर बंधारा बांधून पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविणे आज काळाची गरज आहे. यामुळे वनराई बंधारे शेतकरी आणि पशुपक्ष्यांसाठी वरदान ठरत आहेत.                    पावसाळा संपताच पाण्याचे विविध स्त्रोत तळ गाठत असतात, मात्र काही ठिकाणी हेच पाणी आपण अडवू शकतो आणि हेच पाणी आपल्यासाठी मोठे वरदान ठरत …

Read More »