Breaking News

Ramprahar Team

जादूगार हवा आहे

आधी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर  यांचे प्रेझेंटेशन, मग चर्चांचे गुर्‍हाळ, मग समितीचे चर्‍हाट, पुन्हा चिंतन शिबिराची उठाठेव आणि त्यानंतर परदेशातून परतलेल्या माननीय राहुलजी यांचा निर्णय अशा प्रचंड प्रक्रियेतून गेल्यानंतरच काँग्रेसीजनांच्या हाताला पुनर्जन्मासाठी आवश्यक असलेली संजीवनी बुटी लागेल असे दिसते. मात्र इतके घडून देखील काँग्रेस अजूनही आस्ते कदम याच भूमिकेत असली …

Read More »

फणसाड अभयारण्यात पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजना

मुरूड : प्रतिनिधी कडक उन्हाळ्यातसुद्धा वन्यजीवांना मुबलक पाणी मिळावे, यासाठी फणसाड अभयारण्य प्रशासनाने विविध उपाय योजना करून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या अभयारण्यात पक्षी व वन्य जीव विशेषत: रानगव्यांची संख्या वाढत आहे. मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात 90 प्रकारची फुलपाखरे आणि पक्षांच्या 190 प्रजाती आहेत. या अभयारण्यात रानससा, …

Read More »

शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने घेतली अतिरिक्त मुख्य सचिवांची भेट

शिक्षक, शाळा, विद्यार्थ्यांच्या समस्यांवर सकारात्मक चर्चा अलिबाग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाच्या शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 20) राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची भेट घेतली. या वेळी राज्यातील शिक्षक, शाळा आणि विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावर झालेल्या चर्चेअंती या प्रश्नांवर मार्ग काढण्याचे आश्वासन …

Read More »

कर्जत रेल्वे पोलिसांकडून चोरीची घटना उघड

कर्जत : बातमीदार तालुक्यातील शेलू रेल्वे स्थानकातील प्रवाशाचा  मोबाईल फोन जबरदस्तीने पळवून नेणार्‍या दोघा चोरट्यांना कर्जत रेल्वे पोलिसांनी जेेरबंद केले असून, त्यांच्याकडून चोरलेला मोबाईल हस्तगत केला आहे. रोहित रमेश शिंदे (वय 21) हा तरूण 18 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसात वाजता शेलू स्थानकांतील फलाट क्रमांक एकवरून जात होता. त्यावेळी दोन अनोळखी …

Read More »

अतिवृष्टीबाधित पाणी योजना दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

महाडमधील 72 नळ पाणीपुरवठा योजना, 14 विहिरी आणि तलावांचे नुकसान महाड : प्रतिनिधी तालुक्यात 22 जुलै 2021 रोजी आलेल्या महापुरात  शासकीय मालमत्तेबरोबर गावागावातील नळ पाणीपुरवठा योजनादेखील बाधित झाल्या होत्या. अनेक गावातील पाणी योजना पुराच्या पाण्यात वाहून गेल्या तर विहिरी कोसळण्याच्या घटनादेखील घडल्या. या पाणीपुरवठा योजना, पाण्याचे उद्भव, स्त्रोत आदीच्या दुरुस्तीसाठी …

Read More »

खारभूमी कामाच्या यंत्रसामुग्रीमुळे पेण भाल येथील घराला तडे

नुकसानभरपाई मिळण्यासाठी प्रांताधिकार्‍यांना निवेदन पेण : प्रतिनिधी तालुक्यातील खारेपाट विभागाच्या नारवेल, खारभुमी योजने अंतर्गत भाल-विठ्ठलवाडी येथे राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारणाचे काम सुरू आहे. त्यासाठी येणार्‍या मोठमोठ्या यंत्र सामुग्रीमुळे राजेंद्र रामचंद्र म्हात्रे यांच्या भाल येथील घराला जागोजागी तडे गेले असून घराचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याची प्रशासनाने तातडीने पाहणी करुन नुकसान …

Read More »

माणगावमध्ये एसटी येतेय पूर्वपदावर

70 टक्के बससेवा सुरू माणगाव : प्रतिनिधी आपल्या मागण्यासाठी राज्यातील एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेले होते . माणगाव बस आगारातील सुमारे 82 कर्मचारी संपात सहभागी झाले होते. न्यायालयाच्या निकालानंतर हे कर्मचारी टप्याटप्याने कामावर हजर होऊ लागल्याने माणगाव एसटी आगाराची सत्तर टक्के सेवा सुरु झाली आहे. संपापूर्वी माणगाव एसटी आगाराच्या लोकल …

Read More »

खोपोली नगर परिषद हद्दीत पाणीटंचाई

खोपोली : प्रतिनिधी सध्या खोपोली शहरातील अनेक भागात त्याचप्रमाणे आदिवासी वस्तीत पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. नगर परिषद प्रशासन खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत असला तरी, भविष्यात नगर परिषदेने पाणीपुरवठा करण्याबाबत नियोजन करावे, अशी मागणी पुढे येत आहे. विशेषत: नगरपालिका हद्दीतील काही आदिवासी वाड्या टेकडीवर असल्याने, अनेकदा त्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत …

Read More »

अलिबागमधील भूमिगत विद्युतवाहिन्या प्रकल्प रखडला!

अलिबाग शहर तसेच शेजारील  चेंढरे व वरसोली ग्रामपंचायतीच्या काही भागात भूमिगत विद्युत प्रणाली प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य  देण्यात येणार्‍या या प्रकल्पासाठी 89 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षीत आहे.  या प्रकल्पाला मंजुरी मिळून सहा वर्षे झाली तरी देखील हा प्रकल्प कार्यान्वीत झालेला नाही. सध्या या प्रकल्पाचे काम  सुरू …

Read More »

नवी मुंबईत 50 दिवसांत शून्य कोरोना मृत्यू

नवी मुंबई ः प्रतिनिधी शहरात कोरोनाचे 2,049 मृत्यू झाले आहेत.कोरोनाच्या तिन्ही लाटेत कोरोना मृत्यूंचे प्रमाण हे दिवसाला सरासरी दोन ते चार इतके होते. मात्र तिसरी लाट ओसरल्यानंतर आता मृत्यूंचे हे सत्र थांबले आहे. गेल्या 50 दिवसांत शहरात कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही. कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने वाढली व तितक्याच वेगाने …

Read More »