Breaking News

Ramprahar Team

बाप्पाच्या स्वागतासाठी श्रीवर्धन बाजारपेठ फुलली

नारळाबरोबरच यंदा केवडाही महागणार! श्रीवर्धन : प्रतिनिधी कोरोनामुळे गतवर्षी सण, उत्सव साजरे करण्यावर शासनाने काही बंधने घातली होती, मात्र यंदा निर्बंधात  शिथिलता दिल्यामुळे गणेशोत्सवासाठी श्रीवर्धन बाजारपेठ चांगलीच सजलेली दिसत आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी लागणार्‍या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलली आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येत आहे तसतशी पूजा आणि सजावटीचे साहित्य खरेदीसाठी नागरिकांची …

Read More »

नवी मुंबई एपीएमसीत सुकामेव्याचे दर स्थिर

गणेशभक्तांसह ग्राहकांमध्ये समाधान नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेल्या महिन्यात तालिबानच्या अफगाणिस्तानवरील कब्जाचे भारताच्या बाजारपेठेत पडसाद पाहायला मिळाले होते. लगेचच मुंबई एपीएमसी बाजारात सुक्यामेव्याच्या बाजारभावात वृद्धी झाली होती, परंतु गणेशोत्सवात तोंडावर आला असताना सुक्यामेव्याचा बाजारभाव स्थिर असल्याने गणेशभक्तांसह ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. सर्वांच्याच पसंतीचे आणि अधिक खाल्ले जाणारे बदाम …

Read More »

पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहने

पनवेल : वार्ताहर पोलीस लवकरात लवकर एखाद्या घटनेच्या ठिकाणी पोहचण्यासाठी शासनामार्फत नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. त्या अंतर्गत आता पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक सोयींनी युक्त अशा महिंद्रा बोलेरो जीप देण्यात आल्यामुळे पोलिसांचे काम अजून सुकर होणार आहे. एखादा अपघात घडल्यास, आग लागल्यास किंवा एखादी दुर्घटना झाल्यास पोलिसांना संबंधित ठिकाणी पोहचण्यासाठी कमीत …

Read More »

महावितरणची कर्जतमध्ये थकबाकीदारांवर कारवाई

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील वीज महावितरण विभागाने थकबाकीदारांच्या विरोधात जोरदार कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे महावितरणच्या वसुलीमध्ये विक्रमी रक्कम जमा झाली असून, कर्जत तालुक्यातील थकबाकीदार ग्राहकांना आपली वीजजोडणी कापली जाण्याची भीती वाटू लागली आहे. कर्जत तालुक्यात 76 हजार वीजग्राहक असून त्यातील असंख्य ग्राहकांकडे करोडो रुपयांची थकबाकी आहे. 9 …

Read More »

नियम पाळून सण साजरे करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पोलिसांचे आवाहन मोहोपाडा : प्रतिनिधी गणेशोत्सव हे सण नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेले कोविड 19च्या नियमांचे पालन करून साजरे करावेत, असे आवाहन रसायनी पोलीस ठाण्याच्या सभागृहात झालेल्या गणेशोत्सव मंडळ, शांतता कमिटी, पोलीस पाटील, दक्षता कमिटी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी व सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी यांच्या बैठकीत बोलताना उपविभागीय अधिकारी …

Read More »

रोहा शहर ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी रवींद्र चाळके

रोहे : प्रतिनिधी ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शहर अध्यक्षपदी रवींद्र चाळके यांची तर सरचिटणीसपदी प्रकाश कोळी व खजिनदारपदी महेंद्र मोरे यांची निवड करण्यात आली ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या रोहा शाखेची  बैठक शुक्रवारी (दि. 3) येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हा कार्यकारिणी सदस्य मधुकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत संघटनेच्या रोहा …

Read More »

मुरूड तालुका भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी समीर शिंदे

मुरूड : प्रतिनिधी मुरूड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत राहणारे भाजपचे तरुण कार्यकर्ते समीर भारत शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या मुरूड तालुका युवा मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सुधागड, पाली येथील जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शिंदे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ग्रामीण भागात पक्षाचे काम करीत असताना …

Read More »

पुरातन विहिरींचे जतन

लोकसहभागातुन पुरातन पायविहिरींचे जतन व संवर्धन करणारी महाराष्ट्र बारव मोहीम राजे प्रतिष्ठानने हाती घेतली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राभर महाराष्ट्र बारव मोहीम ची जोरदार चर्चा सुरू आहे. रोहन काळे व मनोज सिंकर ह्या दोन ध्येयवेड्या तरुणांनी स्वयंम प्रेरणेने लोकसहभागातून ऑक्टोबर 2020 पासून सुरू केलेली ही मोहीम आता जोर धरू लागली आहे.या …

Read More »

पॅरालिम्पिकमध्ये भारताची भरारी

खेळांचा महाकुंभमेळा मानल्या जाणार्‍या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर जपानची राजधानी टोकियोत पॅरालिम्पिक स्पर्धाही रंगली आणि तिचा रविवारी समारोप झाला. या स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी करीत एकूण 19 पदके जिंकली. यामध्ये पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदकांचा समावेश आहे. पॅरालिम्पिकच्या इतिहासातील भारताची ही आजवरची सर्वोत्तम भरारी आहे. शारीरिकदृष्ट्या अपंगत्व असणार्‍या जगभरातील खेळाडूंसाठी …

Read More »

एफएमसीजीच्या कंपन्यांना मागणी का वाढते आहे?

शेअर बाजार तापला की गुंतवणूकदार सुरक्षित क्षेत्र शोधायला सुरुवात करतात. जीवनावश्यक वस्तू विकणार्‍या फास्ट मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्सना म्हणूनच गेल्या काही दिवसांत मागणी वाढली आहे. अशा काही कंपन्यांना कायम मागणी राहणार असल्याने त्या कंपन्यांकडे आपले लक्ष असले पाहिजे. मागील दोन वर्षे आपण सर्वांनीच लॉकडाऊनचा अनुभव घेतलेला आहेच. …

Read More »