Breaking News

Ramprahar Team

प्रवासी

एका कार्यक्रमासाठी झारखंडमध्ये जाण्याचा योग आला. देशातील मागासलेल्या बिहार राज्याचे विभाजन करून झारखंडची निर्मिती करण्यात आली. राजधानी रांचीमध्ये नवीन विधान भवन, मंत्रालय आणि शहराची उभारणी सुरू आहे. शहराच्या भोवती रिंग रोड आहे. आपल्या सारखाच पाऊस असूनही रस्ते चांगल्या अवस्थेत आहेत. रांची शहारामध्ये  शेअर रिक्षा जास्त चालतात. त्यांची हद्द ठरलेली  असते. …

Read More »

गरूड ध्वज आणण्यासाठी ग्रामस्थ ढाक डोंगरावर

कर्जत ः प्रतिनिधी किरवली येथील कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवासाठी परंपरेनुसार डोलकाठीच्या टोकाला ढाक डोंगरावरील चढण्या-उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या भैरी मंदिरातून तेथील पुजारी मनोहर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ग्रामदेवी बहिरी तळई संस्थान, किरवलीचे सचिव दिलीप बडेकर, उपसरपंच बिपीन बडेकर, जीवन बडेकर, जनार्दन बडेकर, ज्ञानेश्वर जाधव, राजू बडेकर, प्रदीप मोरे, गणेश ठोंबरे, नरेंद्र …

Read More »

गटारात जनावरे पडण्याच्या घटना सुरूच

कर्जत पालिका प्रशासनाकडे झाकणे बसविण्याची मागणी कर्जत ः प्रतिनिधी कर्जत नगर परिषद हद्दीत मागील काळात रस्त्याच्या दुतर्फा सिमेंट काँक्रिटची मोठी गटारे बांधण्यात आली. यापैकी काही गटारांवर झाकणे बसविण्यात आली नसल्याने या उघड्या गटारांत जनावरे तसेच लहान मुले पडण्याच्या घटना घडत आहेत. शहरातील मुद्रे येथील गुलमोहर रेस्ट हाऊस परिसरात अशीच गटारे …

Read More »

खालापुरात एटीएम मशिन फोडण्याचा प्रयत्न अयशस्वी

खालापूर ः प्रतिनिधी सावरोली-खारपाङा मार्गावर धामणीनजीक एटीएम मशिन फोङण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला असून चोरट्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागले.खालापूर हद्दीत धामणी गावानजीक विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ स्टेट बँक ऑफ इंङियाचे एटीएम केंद्र आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे तसेच संध्याकाळी हा भाग निर्मनुष्य असल्याचे हेरून चोरट्यांनी शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास धारदार …

Read More »

कर्जतमध्ये दुकान फोडले

सव्वा लाखाचा ऐवज चोरला कर्जत ः प्रतिनिधी मागील वर्षभरापासून कर्जत शहरात मोठ्या प्रमाणात चोर्‍या, घरफोड्या होत असून शनिवारी पुन्हा एकदा कर्जत पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भरवस्तीतील आशापुरा मोबाइल आणि घड्याळ विक्रीचे दुकान चोरट्यांनी फोडून  मोबाइल, मनगटी घड्याळे आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 30 हजार पाचशे रुपयांचा ऐवज …

Read More »

‘ये है मुंबई मेरी जान’

राज्यपालांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन; मान्यवरांची उपस्थिती कर्जत ः प्रतिनिधी मुंबईबरोबरचे आपले नाते जिव्हाळ्याने जपलेल्या स्वर्गीय सरदार कुलवंतसिंग कोहली यांनी कथन केलेल्या आणि प्रा. नितीन आरेकर यांनी शब्दांकित केलेल्या तसेच राजहंस प्रकाशनाच्या ’ये है मुंबई मेरी जान’ पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईच्या ताज महल हॉटेलमधील …

Read More »

पर्यटकांची पावले आगरकोट किल्ल्याकडे

रेवदंडा ः प्रतिनिधी रेवदंडा आगरकोट किल्ला, ऐतिहासिक काळातील पोर्तुगीजांचा अभेद्य बालेकिल्ला, आगरकोट सभोवातलची समुद्री तटबंदी आणि डोमिनिकन चर्च, फ्रान्सिस्कन चर्च, चौकोनी बुरूज आणि सातखणी बुरूज पाहण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. आगरकोट किल्ल्याच्या वावव्येकडील बुरूजाजवळील लहान दरवाजाच्या आग्नेय 45.72 मीटरवर तटबंदीच्या पश्चिमेकडील भिंतींत पडलेल्या भगदाडासमोर 1534च्या सुमारास बांधलेल्या फ्रान्सिस्कन इमातीच्या मध्यभागी …

Read More »

सुधागडात ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात

सुधागड ः प्रतिनिधी मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र समजला जाणारा ईद-ए-मिलादुन्नबी संपूर्ण देशासह सुधागड-पालीत रविवारी (दि. 10) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील पालीत हिंदू-मुस्लिम बांधवांत सद्भावना आणि मैत्रीपूर्ण संबंध असून एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन गुण्यागोविंदाने सण साजरा करण्याची परंपरा कायम राखत ईद-ए-मिलादुन्नबी साजरा करण्यात आला. ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त पाली-सुधागड येथील खालचा …

Read More »

बोहरी समाजाकडून ईदनिमित्त जुलूस

कर्जत ः बातमीदार मोहंमद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त आणि ईद-ए-मिलादनिमित्त नेरळ गावात बोहरी समाजाच्या वतीने जुलूस मिरवणूक काढण्यात आली. रामजन्मभूमी बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर  रद्द करण्यात आलेली जुलूस मिरवणूक अत्यंत शांतपणे काढण्यात आली. नेरळमधील बोहरी समाजाने शनिवारी (दि. 9)ईद-ए-मिलाद साजरी केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या रामजन्मभूमी बाबरी मशीदप्रकरणी होणार्‍या निर्णयामुळे रद्द करण्यात …

Read More »

अयोध्या निकालानंतर कर्जतमध्ये आनंदोत्सव

कपालेश्वर मंदिरात गीतरामायण कर्जत ः बातमीदार शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येतील विवादित जागा राममंदिरासाठी देण्याचा निकाल दिला आहे. कोर्टाच्या या अयोध्या निकालानंतर श्रीरामचंद्रांना वंदन म्हणून कर्जतमधील कपालेश्वर मंदिरात आरती आणि गीतरामायणाचा कार्यक्रम झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्व हिंदू परिषद तसेच भाजपचे कार्यकर्ते यांनी कपालेश्वर मंदिर येथे झालेल्या कार्यक्रमास गर्दी केली …

Read More »