Breaking News

Ramprahar Team

केंद्र सरकारच्या निर्णयाचे पेण, खोपोलीत स्वागत

पेण : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप आघाडी सरकारने सोमवारी काश्मीरमधील 370 कलम हटवून ऐतिहासिक पाऊल उचलले. या निर्णयाचे पेणमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. पेण नगर परिषदेच्या कोतवाल चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांचा जयजयकार करण्यात आला. नगराध्यक्षा प्रितम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, नगरसेवक राजा …

Read More »

कुशल समन्वयाने दिलासा

गेली काही वर्षे दुष्काळाचा सामना करणार्‍या महाराष्ट्रातील मोठ्या प्रदेशाला यंदा ओला दुष्काळ सदृश परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. मुंबई नजीकचा कल्याण, बदलापूर परिसर असो, पालघर, वसई किंवा पनवेलच्या नजीकचा परिसर नद्यांमधील पाण्याची पातळी अतिवृष्टीमुळे अकस्मात वाढल्याने नद्यांलगतच्या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. गेला आठवडाअखेर आणि त्याआधीच्या आठवड्यातले काही दिवसही राज्यात …

Read More »

उद्धर येथे तीन घरे जमीनदोस्त

पाली : प्रतिनिधी मुसळधार पाऊस व वादळी वार्‍यात उद्धर आदिवासी वाडीतील नवशा वाघमारे, संजय नारायण वाघमारे आणि भागूनाथ जाधव यांची तीन घरे जमीनदोस्त झाली आहेत. सुदैवाने या आपत्तीत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली आहे. घरातील जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे भिजून मोठे नुकसान झाले आहे. शासनाकडून त्वरित …

Read More »

कलम 370 रद्द केल्याने नागोठण्यात आतषबाजी

Exif_JPEG_420 नागोठणे : प्रतिनिधी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा अभूतपूर्व निर्णय मोदी सरकारने सोमवारी (दि. 5) घेतला. या निर्णयाचे पडसाद नागोठण्यातसुद्धा उमटले असून, मंगळवारी (दि. 6) सकाळी 11 वाजता येथील शिवाजी चौकात भारतीय जनता पक्ष तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली. रोहे तालुका …

Read More »

रविशेठ पाटील यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी

नागोठणे : प्रतिनिधी विभागातील शिहू, चोळे, बेणसे, गांधे, झोतीरपाडा (ता. पेण) या गावांत रविवारी पडलेल्या मुसळधार पावसाने पूर येऊन अनेकांचे नुकसान झाले होते. भाजपचे नेते, माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी या परिसरात येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून सर्व आढावा घेतला. या वेळी भाजपचे नेते मारुती देवरे, हिरामण कोकाटे, भास्कर म्हात्रे, …

Read More »

बदलापूर-कर्जत-खोपोली रेल्वे पुन्हा रुळावर

48 तासांनंतर उपनगरीय सेवा पूर्ववत, प्रवाशांना दिलासा, प्रशासनाचे मानले आभार कर्जत : बातमीदार शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे बदलापूर-कर्जतदरम्यानची रेल्वे वाहतूक थांबवून ठेवण्यात आली होती. तब्बल 48 तासांनंतर म्हणजे मंगळवारी (दि. 6) सकाळी उपनगरीय लोकलची सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी मध्य रेल्वेने कर्जत-खोपोलीदरम्यान शटल सेवा सुरू …

Read More »

बहुआयामी नेतृत्व

अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला… कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘कोलंबसाचे गर्वगीत’ या कवितेतील उपरोक्त ओळी जीवनात कितीही संकटे आली आणि त्यासाठी पराकोटीचा संघर्ष करावा लागला तरी बेहत्तर, पण मी त्यातून पुढे मार्ग काढणार हे छातीठोकपणे सांगणार्‍या साहसवीराची प्रबळ इच्छाशक्ती अधोरेखित करतात. ध्येयवेडी माणसे अशाच …

Read More »

युवा पिढीचे शिलेदार

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा लोकसेवेचा वसा समर्थपणे चालवित समाजाला आवश्यक सेवा देण्याचे काम सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष तरुण तडफदार, अभ्यासू, लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सातत्याने होत आहे. सामान्य कार्यकर्ता ते भाजप जिल्हाध्यक्ष, आमदार, सिडको अध्यक्ष यासह अनेक सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील पदे ते …

Read More »

धडाडीचा नेता

तरुण, शांत, संयमी आणि निष्कलंक नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने पनवेललाच; नव्हे तर रायगड जिल्ह्याला लाभलेले आहे, असेच म्हणावे लागेल. सामान्यातल्या सामान्य माणासाच्या मदतीला धावून जाणारे असे हे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच शुभेच्छा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना …

Read More »

नागोठण्यात महापूर; 2005च्या आठवणी ताज्या

नागोठणे : प्रतिनिधी पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केल्याने मध्यरात्री येथील अंबा नदीने पुन्हा एकदा आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने नागरिकांची, तसेच व्यापार्‍यांची तारांबळ उडाली. रविवारी (दि. 4) पुरात अडकलेल्या 20 जणांना सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने कोठेही जीवितहानी झाली नाही. भाजपचे नेते माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी …

Read More »