Breaking News

Ramprahar Reporters

कोशिश फाऊंडेशनच्या उपक्रमांतर्गत आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण

पनवेल ः रामप्रहर वृत्तजागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर अध्यक्ष असलेल्या कोशिश फाऊंडेशनच्या वतीने चला करूया वृक्षारोपण हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते खांदा कॉलनी येथील आयकर भवनजवळ करण्यात आला होता. या अभियानांतर्गत …

Read More »

मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार?

भाजपची राज्य सरकारवर घणाघाती टीका मुंबई ः प्रतिनिधीराज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. सुरक्षा व्यवस्था कडक असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जात आहे. यावरून, मंत्रालयाचे रूपांतर मदिरालयात केलेय, मग देवालये कशी उघडणार, असा सवाल करीत भाजपने ठाकरे …

Read More »

भारत उद्योग क्षेत्रात मोठी झेप घेतोय -पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाजिथे वर्षानुवर्ष कागदपत्रांमध्ये, कायद्यांमध्ये गुंतवून ठेवणे ही प्रशासनाची ओळख होती, तोच भारत इज ऑफ डुइंग बिझनेसमध्ये मोठी झेप घेत आहेत. जिथे वर्षानुवर्ष कामगारांना, उद्योगांना शेकडो कायद्यांच्या जंजाळात गुंतवून ठेवले गेले, तिथे आज डझनावरी कायदे चार लेबर कोर्टमध्ये सामावले गेले आहेत. जिथे शेतीला फक्त गुजराण करण्याचे माध्यम मानले …

Read More »

ठाकरे सरकारची इयत्ता कंची?

शैक्षणिक बट्ट्याबोळावरून भाजपचा निशाणा मुंबई ः प्रतिनिधीअठरा वर्षांखालील मुलांचे अद्याप लसीकरण झालेले नसताना अकरावीची सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) प्रत्यक्ष पद्धतीने घेण्याचा राज्याचा निर्णय मनमानी, कठोर, अतार्किक, विसंगत आणि कोणत्याही अधिकाराविना असल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने मंगळवारी ओढले. यावरून भाजपने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.विद्यार्थी, पालकांना प्रचंड मानसिक तणाव देऊन, शिक्षणाचा …

Read More »

श्रीवर्धनमध्ये सापडला 22 किलोंचा घोळ मासा

दोन लाख 61 हजारांत विक्री अलिबाग ः प्रतिनिधीश्रीवर्धन तालुक्यातील जीवना बंदर येथे मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांच्या जाळ्यात 22 किलो वजनाचा घोळ मासा सापडला. या माश्याची लिलावात तब्बल दोन लाख 61 हजार रुपयांना विक्री करण्यात आली. त्यामुळे हा मासा पकडणारे मच्छीमार चांगलेच मालामाल झाले आहेत.जीवना बंदरावरील मच्छीमार जयेंद्र पाटील, उद्देश पावशे, हेमंत …

Read More »

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी 100 कोटी

पोलादपूर ः प्रतिनिधीपुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारच्या वतीने देण्याचे आश्वासन केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याची माहिती राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली.महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली आहे. कोकण …

Read More »

मशाल मोर्चाचा सर्वत्र एल्गार

विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्याची एकमुखी मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. 9) उरण तालुक्यातील जासई येथे सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला होता. तेथे मुख्य मशालीने प्रज्वलित करण्यात आलेल्या मशाली सायंकाळी रायगड जिल्ह्यासह …

Read More »

अकरावीची सीईटी रद्द

उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला दणका मुंबई : प्रतिनिधीइयत्ता अकरावीची सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, प्रवेश प्रक्रिया बदलता येणार नाही, अशा शब्दांत न्यायालयाने ठाकरे सरकारला सुनावले आहे. हा निर्णय म्हणजे सरकारला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. इयत्ता दहावीच्या …

Read More »

पनवेलमध्ये निघाली मशाल रॅली

पनवेल ः प्रतिनिधीनवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी उरण तालुक्यातील जासई येथे मशाल मोर्चा काढण्यात आल्यानंतर सायंकाळी पनवेल शहर परिसरात महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दुचाकींवरून मशाल रॅली काढण्यात आली होती. या जनजागृतीपर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.पनवेलमधील छत्रपती शिवाजी …

Read More »

तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही !

१६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद आंदोलन  पनवेल : रामप्रहर वृत्तजो पर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जात नाही, तो पर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही, असा ईशारा आज जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला. १५ ऑगस्ट हि डेडलाईन आहे, या तारखेपर्यंत राज्य …

Read More »