Breaking News

Ramprahar Reporters

आमदार प्रताप सरनाईकांचा शिवसैनिकांनीच केला निषेध

महाड ः प्रतिनिधीशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबाबत केलेल्या अपमानास्पद विधानाचा महाड येथील शिवसैनिकांनीच निषेध केला आहे.‘मी तानाजी मालुसरेसारखा धारातिर्थी पडणारा सैनिक नाही,’ असे बेताल विधान शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केले होते. त्याचा महाड आंबेशिवथर येथील शिवसैनिकांनी जाहीर निषेध केला आहे.या वेळी आंबेशिवथर गावचे माजी पोलीस …

Read More »

आंजर्लेच्या समुद्रात बुडून पुण्यातील तीन पर्यटकांचा मृत्यू

रत्नागिरी ः प्रतिनिधीरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले येथील समुद्रात सहा पर्यटक बुडाल्याची घटना शुक्रवारी (दि. 18) घडली. सहापैकी तिघांचा बुडून मृत्यू झाला, तर तीन जणांना वाचवण्यात यश आले आहे. हे सर्व पर्यटक पुण्यातील आहेत.पुण्याच्या औंध येथील निहाल चव्हाण, अक्षय राखेलकर, उबेस खान, रोहित पलांडे, विकास श्रीवास्तव, मनोज गावंडे यांच्यासह …

Read More »

पोरखेळ चालला आहे!

बुलेट ट्रेनच्या जागी मेट्रो कारशेड उभारण्यावरून फडणवीस संतापले नागपूर ः प्रतिनिधीकांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. यावरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणीतरी चुकीचे सल्ले …

Read More »

देश दोन वर्षांत टोल नाकामुक्त होणार : गडकरी

नवी दिल्ली : येत्या दोन वर्षांत आपला देश टोल नाकामुक्त होईल. यासाठी सरकारने ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम (जीपीएस)ला मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या फाऊंडेशन वीक कार्यक्रमात बोलत होते. रशियन सरकारच्या मदतीने आम्ही …

Read More »

लग्नाचे वचन देऊन ठेवलेले संबंध बलात्कार नाही -न्यायालय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्थालग्नाआधी रिलेशनशीपमध्ये अथवा विवाहाचे वचन देऊन अनेक तरुण-तरुण शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. मुलांकडून लग्नाचे वचन पूर्ण झाले नाही तर त्यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला जातो. या संदर्भात एका याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. लग्नाचे वचन देऊन लैंगिक संबंध ठेवणे हा नेहमीच बलात्कार असतो असे नाही, …

Read More »

105 वर्षांच्या आजीबाईंनी केली कोरोनावर मात

पुणे ः प्रतिनिधीसंपूर्ण जगाला जेरीस आणणार्‍या महाभयंकर कोरोनाची अनेकांना लागण झाली, तर काहींचा बळीही गेला. कोरोनाविरुद्धची लढाई अनेकांनी जिंकलीदेखील. अशाच प्रकारे आयटी नगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या हिंजवडीतील 105 वर्षांच्या आजीबाईंनी प्रबळ इच्छाशक्ती व उपचाराच्या जोरावर कोरोनावर मात केली आहे. शांताबाई हुलावळे असे या आजीबाईंचे नाव.पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात महिनाभरापूर्वीपर्यंत अनेक …

Read More »

मध्य रेल्वेवर एसी लोकल सुरू

मुंबई ः प्रतिनिधीगेल्या नऊ महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या लोकलचे दार बंदच आहे, पण आता मध्य रेल्वेवरील प्रवाशांना गारेगार दिलासा मिळाला आहे. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेमार्गावर एसी लोकल सुरू झाली आहे.मुंबईतील लोकल रेल्वेचा प्रवास हा घामाघूम करणारा असतो. जीवघेणी गर्दी आणि घामांच्या धारांमुळे हा प्रवास मुंबईकरांना आतापर्यंत त्रासदायक ठरलाय. हा प्रवास …

Read More »

न्यायालयाचा अवमान करणार्‍या संजय राऊत यांच्यावर कारवाई करा : भाजप

मुंबई ः प्रतिनिधीमेट्रो कारशेडचा विषय विरोधी पक्षाने राजकीय केला असून, त्यात न्यायालयाने पडू नये अशी टीका करतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी न्यायालयाच्या कामकाजावर संताप व्यक्त केला आहे. राऊतांनी केलेल्या या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी थेट त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करण्याची मागणी केली आहे.’संजय …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा निधी वितरित करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यात सन 2018-19मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत पूर्ण झालेल्या कामांचा निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.या निवेदनात आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

रस्ते अडवणे गैर!

शेतकरी आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाची टिपण्णी नवी दिल्ली : वृत्तसंस्थाआपल्या हक्कांसाठी शेतकर्‍यांना आंदोलन करण्याचा हक्क नक्की आहे, मात्र आंदोलनासाठी रस्ते अडवणे गैर असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. स्वतंत्र समिती स्थापन करून चर्चेच्या मार्गानेच यावर तोडगा काढावा, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत.दिल्लीच्या सीमेवर शेतकर्‍यांचे आंदोलन सुरू आहे. मागील 20 दिवसांपासून शेतकरी …

Read More »