Breaking News

Ramprahar Reporters

खारघर-बेलापूर सागरी मार्ग साकारणार

सिडको करणार निर्मिती नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा नवी मुंबईतील नागरिकांना प्रवासाच्या उत्तम सोयी-सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी सिडको महामंडळ नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. सिडकोतर्फे साकारण्यात येत असलेला खारघर-बेलापूर सागरी मार्ग यातीलच पुढचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अंदाजे 272.64 कोटी रुपये खर्च करून हा 9.5 किमी लांबीचा सागरी मार्ग विकसित करण्यात येत …

Read More »

आपट्यात एसटी बसमध्ये बॉम्ब

रसायनी : प्रतिनिधी पनवेल तालुक्यातील आपटा येथे एका एसटी बसमध्ये बॉम्ब आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. कर्जतहून आलेली बस बुधवारी (दि. 20) रात्री आपट्यात येऊन थांबली असताना कंडक्टरच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने व वाहकाने ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर रसायनी पोलिसांना पाचारण करण्यात आले. मग अलिबाग येथील बॉम्बशोधक पथक येऊन …

Read More »

पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार

पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिकेची इमारत कात टाकणार असून, नव्या स्वरूपातील आकर्षक व सुंदर इमारत लवकरच पाहायला मिळेल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी गुरुवारी (दि. 21) दिली. पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीची सभा गुरुवारी दुपारी अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका भवनात झाली. या सभेस सभागृह नेते परेश …

Read More »

उरणमधील नवघर, कुंडेगावात शिरले उधाणाचे पाणी

जेएनपीटी : प्रतिनिधी समुद्राच्या भरतीचे खारे पाणी उरण तालुक्यातील कुंडेगाव, नवघर, फुंडे, भेंडखळ गावांतील अनेक घरात शिरल्याची घटना बुधवारी (दि. 20) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कुंडेगाव तर समुद्राच्या पाण्यात बुडाल्याने ग्रामस्थांना रात्र घरातील पाणी उपसण्यात आणि थंडीत कुडकुडत जागून काढावी लागली. महसूल अधिकार्‍यांनी समुद्राचे पाणी शिरलेल्या गावांची आणि आर्थिक नुकसान झालेल्या …

Read More »

पाकिस्तानात जाणारे पाणी रोखणार ः ना. नितीन गडकरी

नवी दिल्ली : पुलवामातील आत्मघाती दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची कोंडी करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र केले आहेत. पाकिस्तानात जाणारे भारतातील व्यास, रावी आणि सतलज नद्यांचे पाणी रोखण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, या तीन्ही नद्यांवर उभारलेल्या प्रकल्पांच्या माध्यमातून आता पाकिस्तानला दिले जाणारे …

Read More »

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ

मुंबई : प्रतिनिधी डॉ. शिरोडकर, अनिकेत, महात्मा गांधी यांनी महिलांमध्ये; तर देना बँक, महिंद्रा यांनी पुरुषांमध्ये शिवनेरी मंडळ आयोजित स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. दादर शिंदेवाडी येथील भवानीमाता क्रीडांगणावर बुधवारी (दि. 20) झालेल्या महिलांच्या उद्घाटनीय सामन्यात डॉ. शिरोडकरने चुरशीच्या लढतीत 41-33 अशी मात करीत ‘क’ …

Read More »

बीसीसीआय करणार पाक क्रिकेट संघावर बहिष्काराची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानावरही घेरण्याची तयारी सुरू केली आहे. पाक क्रिकेट संघाला वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्यास बंदी घालावी किंवा भारताने तरी या स्पर्धेतून माघार घ्यावी, अशी मागणी करणारे पत्रच सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासक समितीने (सीओए) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या नावे …

Read More »

विश्वचषकासाठी चौथ्या क्रमांकावर धोनी योग्य पर्याय : सुरेश रैना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था मे महिन्यात इंग्लंडमध्ये सुरू होणारा विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपला असताना भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कोण येणार यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. मध्यंतरीच्या काळात कर्णधार विराट कोहलीला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्याबद्दल चर्चा सुरू होती, मात्र भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाच्या मते महेंद्रसिंह धोनी हा विश्वचषकासाठी …

Read More »

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी जडेजा संघात

मुंबई : प्रतिनिधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणार्‍या ट्वेन्टी-20 आणि वन डे मालिकेतून भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी मिळाली आहे. दोन ट्वेन्टी-20 आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात हार्दिक पांड्याला स्थान देण्यात आले होते, मात्र पाठीच्या दुखण्याने …

Read More »

घणसोलीत रंगली कुस्तीची दंगल

नवी मुंबई : प्रतिनिधी घणसोलीत पहिल्यांदाच शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने सिम्प्लेक्स येथील मैदानावर कुस्त्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून 120 पुरुष व 10 महिलांनी सहभाग घेतला. या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष गजानन काळे, पैलवान तेजस पाटील व अशोक पाटील यांच्या हस्ते झाले. तुडूंब भरलेल्या …

Read More »