Breaking News

Yearly Archives: 2019

एड्सबाधित बहिणींना भाऊबीज भेट

मोहोपाडा : प्रतिनिधी रसायानीतील श्री समर्थ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रायगड भूषण-अरविंद पाटील गेली सात वर्ष भावाच्या प्रेमापासून वंचित असणार्‍या 24 बहिणींना भाऊबीज करत आहेत. यंदाही त्यांनी हा उपक्रम राबविला. एड्स आजाराची जनजागृती करून आजाराने निराश झालेल्या बाधित रुग्णांमध्ये समुपदेशनद्वारे आनंदी जीवन जगण्याची उमेद निर्माण करून त्यांचे आयुष्य सुखकर करण्याचे कार्य …

Read More »

पनवेलमधील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू

पनवेल : वार्ताहर परतीच्या पावसाने झालेल्या पनवेल तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हे पंचनामे सुरू करण्यात आले असून आठवडाभरात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पंचनामे पूर्ण झाल्यावर शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल, अशीही …

Read More »

पर्यटकांना खुणावतेय माथेरान

कर्जत ः बातमीदार पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या माथेरानचा दिवाळी पर्यटन हंगाम सुरू झाल्याने मुलांना दिवाळीची सुटी पडताच मुंबई-पुण्यापासून अगदी जवळचे आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील सुंदर थंड हवेचे डेस्टीनेशन माथेरान सध्या पर्यटकांच्या वर्दळीने बहर घेत आहे. आधीच लांबलेल्या पावसाने दिवाळीच्या पहिल्या दिवशीच विश्रांती घेतल्याने येथील परिसर हा विपुल वृक्षांनी सजलेला असताना हिरवीगार …

Read More »

मृत घोषित केलेल्या व्यक्तीला पत्रकार जीवन पाटील यांनी दिले जीवदान

अलिबाग : प्रतिनिधी अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथील पत्रकार जीवन पाटील यांनी नुकतेच अलिबाग-पेण रस्त्यालगतच्या जेएसडब्ल्यू कंपनी जवळील कासुमाता मंदिरालगतच्या असणार्‍या खड्ड्यामध्ये रात्रभर नग्न अवस्थेत पडून राहिलेल्या इसमाला सुखरूप बाहेर काढून जीवदान दिले. हा इसम रात्रभर चिखलाने भरलेल्या खड्ड्यात पडून राहिला होता. त्याला उठता न आल्याने तो बाहेर येऊ शकत नव्हता. …

Read More »

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिली शपथ

मुंबई : प्रतिनिधी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली.  मंत्रालयात आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि इंदिरा …

Read More »

साहित्यिका गिरिजा कीर यांचे निधन

मुंबई : सुप्रसिद्ध साहित्यिका, कथाकथनकार व समाजसेविका गिरिजा कीर यांचे गुरुवारी (दि. 31) रोजी सायंकाळी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 86 वर्षे होते. गेले काही महिने त्या आजारी होत्या. त्यांची शंभराहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक पुरस्कार व मानसन्मानाच्या त्या मानकरी आहेत. तळागाळातील गरजूंसाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भरीव …

Read More »

कर्जत-खालापूर विकासात नंबर 1 असेल

आमदार महेंद्र थोरवे; शहर शिवसेनेकडून सत्कार खोपोली ः प्रतिनिधी  खालापूर मतदार संघात शिवसेना युतीने विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळविल्या नंतर शिवसेनेत आनंदाचे वातावरण असल्याने खोपोली शहर  शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार महेंद्र थोरवे यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी शिलफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून खोपोली …

Read More »

सायन-पनवेल महामार्गाच्या काँक्रिटीकरणाला वेग

नवी मुंबई : वृत्तसंस्था सायन-पनवेल महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात  खड्ड्यांमुळे नवी मुंबई महापालिकेला सातत्याने नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावरच काही मिनिटांच्या प्रवासासाठी नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे तासन्तास तिष्ठावे लागत आहे. यावर उपाय म्हणून महामार्गावरील डांबरीकरणाच्या जागी काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मध्यंतरी पावसामुळे शिल्लक कामे सुरू करण्यात आली आहेत. नियोजित …

Read More »

बहुउद्देशिय गाळे वापराविना पडून

नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेने वाशी सेक्टर 16-ए मधील नाल्यावर 30 किओस्क (गाळ्यांचे) बांधकाम केले आहे, मात्र मागील बरीच वर्षे हे गाळे वितरित करण्यात न आल्याने त्यांच्या लोखंडी दरवाजांना गंज चढला आहे. भविष्यात या गाळ्यांची आणखीन दुरवस्था होऊ नये म्हणून हे गाळे लवकरात लवकर  वापरात आणावे, अशी मागणी …

Read More »

वाढलेल्या गवतामुळे अपघाताचा धोका

उरण : प्रतिनिधी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर अर्ध्यापेक्षा जास्त गवताचे साम्राज्य वाढल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. हे रस्त्यावर वाढलेले गवत त्वरित सार्वजनिक बांधकाम खात्याकडून  छाटण्यात येऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. उरण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असलेले बहुतांशी रस्ते हे …

Read More »