Breaking News

संपादकीय

वचनपूर्तीचे समाधान

महाराष्ट्रात जवळपास गेला महिनाभर सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या वादाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 1 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे काहींच्या चेहर्‍यावर निराशेचे ढग दाटून आलेले दिसले खरे, परंतु त्याच सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 27 टक्के ओबीसी आरक्षणासह त्वरीत घेण्याचे आदेश दिल्याने समाजातील एका मोठ्या समुहाला दिलासा मिळाला आहे. गेले …

Read More »

बुडत्याचा पाय खोलात

एकंदर राजकारणाच्या पटलावर नजर टाकली की शिवसेनेचे अध:पतन ठळकपणे दिसून येते. अर्थात, येथे शिवसेना या शब्दाचा अर्थ उद्धव ठाकरे समर्थकांचा गट असा घ्यायचा. पक्ष प्रमुखपदी ठाकरे यांचे नाव अजुनही कायम असले तरी पक्षनेतृत्वाचा अक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच निर्देश करताना दिसतो. शिवसेना नेमकी कुणाची या प्रश्नाचे उत्तर बुधवारी सर्वोच्च न्यायालयातील …

Read More »

नकारात्मकतेला स्थगिती

शिंदे-फडणवीस सरकार कुठलाही विचार न करता महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयांना स्थगिती देत आहे अशी टीका विरोधक करत आहेत. परंतु त्यात तथ्य नाही. मागील सरकारने रुजवलेली नकारात्मकता उखडून फेकायची असेल तर असे काही निर्णय घ्यावे लागणारच. गैरमार्गाने सत्तेवर आलेले महाविकास आघाडीचे सरकार उलथून टाकण्यासाठी अडीच वर्षे जावी लागली. ठाकरे सरकारचा कारभार …

Read More »

गढूळ पाण्यामुळे पालीकरांचे आरोग्य धोक्यात

महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला अंबा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. पावसामुळे अंबानदीचे पाणी गढूळ चिखलयुक्त झाले आहे. तसेच शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे हे प्रदूषित पाणी पिणारे नागरिक व भाविकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा …

Read More »

धोक्याचे दिवस

आषाढी एकादशीच्या सुमारास महाराष्ट्रातील पर्जन्यमान कमालीचे वाढलेले असते. हे ऋतुचक्र पिढ्यान पिढ्या आपल्या अंगवळणी पडले असले तरी गेल्या काही दशकांत पावसाळा आपले उग्र स्वरुप दाखवतोच असे निदर्शनास आले आहे. पर्यावरणाचा घात आणि हवामानातील बदल यांचा संबंध किती विघातक परिणाम घडवून आणू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणून पर्यावरण तज्ज्ञ भारतातील मान्सून …

Read More »

पोलादपुरातील कवींद्र परमानंदांचे समाधीस्थळ उपेक्षित

पोलादपूर शहरातील शिवकालीन स्वामी कवींद्र परमानंद यांच्या समाधीस्थळी दरवर्षी मकरसंक्रांतीचा वार्षिकोत्सव आणि गुढीपाडव्यानिमित्त गुढी उभारण्याचा उपक्रम अखंडीतपणे सुरू आहे. मात्र, येथे गेल्या काही वर्षांपूर्वी सुशोभिकरणाचे काम रखडले. गेल्या चार पाच महिन्यांपासून या परिसराकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. समाधीस्थळी बांधण्यात आलेल्या मठामध्ये परमानंदांच्या जीवनाचा अल्पपरिचय देणारा लेखही भिंतींच्या रंगसफेदीदरम्यान दिसेनासा झाला …

Read More »

‘सर्वोच्च’ धावाधाव

पक्षफुटीच्या कड्याच्या टोकावर अधांतरी लोंबकळणार्‍या शिवसेनेचा आता अस्तित्वासाठीचा लढा सुरू झाल्याचे दिसू लागले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सोमवारच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय तिढा आणि त्यावरील निवाडा दीर्घ काळासाठी लांबणीवर पडेल अशी चिन्हे आहेत. हे सारे अर्थातच मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थक गटाच्या पथ्यावरच पडणारे आहे यात शंका नाही. महाराष्ट्रातील सत्तांतराच्या नाट्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख …

Read More »

आला पावसाळा सूचना पाळा… आपत्ती टाळा!

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून नागरी/शहरी पूर आपत्ती प्रसंगी पूर्वतयारी व प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून, काय आहेत या मार्गदर्शक सूचना जाणून घेऊया लेखातून- प्रत्येक राज्यांमध्ये उच्चतम पूर पातळी ठरविणे. प्रत्येक शहरामध्ये तांत्रिकदृष्ट्या सक्षम समन्वय अधिकार्‍यासह नागरी पूर/पूर व्यवस्थापन यंत्रणा स्थापित करणे. प्रत्येक शहराने …

Read More »

अर्थसाक्षर स्पर्धा : 27

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत. वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल). क्रिप्टो करन्सी तयार करताना कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो? अ. ब्लॉकचेन                                       आ. मेटा इ. …

Read More »

सर्वाधिक नुकसान करतात ते बाजाराविषयीचे गैरसमजच!

भारतीय गुंतवणूकदारांनी शेअरबाजारात गुंतवणूक केली पाहिजे, याविषयी दूमत नाही, मात्र जे आधीच मनात गैरसमज घेऊन बाजारात येतात, त्यांना बाजार धडा शिकवितो. त्यामुळे आपल्याला बाजारात काय करावयाचे आहे, याची स्पष्टता असणे फार महत्वाचे आहे. ही स्पष्टता तांत्रिक विश्लेषणामुळे येवू शकते. ज्या कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे त्यांचा अभ्यास हा दोन प्रकारे करू शकतो …

Read More »