नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारत मैत्री निभावतो, मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणेही आम्ही जाणतो. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्यांना लडाखमध्ये जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करीत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आणि नतमस्तक आहे, …
Read More »देशाच्या संरक्षण मुद्द्यावर राजकारण करू नका!
शरद पवारांनी टोचले राहुल गांधींचे कान सातारा : प्रतिनिधीभारत-चीनदरम्यान झालेल्या संघर्षावरून केंद्र सरकारवर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडले होते, याचाही विचार केला पाहिजे. 1962च्या युद्धानंतर चीनने भारताचा 45 हजार …
Read More »इतर देशांच्या तुलनेत भारतात चांगली स्थिती : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थासध्या देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. डॉ. जोसेफ मार थोमा मेट्रोपॉलिटन यांच्या 90व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. त्या वेळी ते बोलत होते.पंतप्रधान मोदी म्हणाले, वर्षाच्या सुरुवातीस …
Read More »देशातील कोरोना रुग्ण पाच लाखांवर
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शनिवारी सकाळी (दि. 27) संपलेल्या 24 तासांत कोरोना रुग्णसंख्येत उच्चांकी वाढ झाली आहे. देशात पहिल्यांदाच कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 हजारांच्या पुढे गेली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच लाख आठ हजार 953 इतकी झाली आहे.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत …
Read More »‘रयत’च्या अध्यक्षपदी शरद पवारांची फेरनिवड; सचिवपदी प्राचार्य विठ्ठल शिवणकर
सातारा : प्रतिनिधी सर्वांना शिक्षणाची समान संधी मिळावी, या हेतूने प्रेरित होऊन स्थापन झालेल्या आणि राज्यासह कर्नाटक राज्यात शाखा विस्तार असलेल्या सातार्याच्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शरद पवार आणि चेअरमनपदी डॉ. अनिल पाटील यांची शनिवारी (दि. 27) फेरनिवड झाली, तर संस्थेचे सचिव म्हणून वाशी (नवी मुंबई) येथील डॉ. कर्मवीर भाऊराव …
Read More »सोशल डिस्टन्सिंग, मास्क अनिवार्य : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : वृत्तसंस्थाकोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशांतील सरकारे मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत आहे. कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणीदेखील अनेक देशांत करण्यात येत आहे. मात्र जोपर्यंत कोरोनावर लस तयार होत नाही तोपर्यंत सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा लागेल तसेच मास्कचा वापर करीत राहावा लागेल, असे स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »देशात कोरोनाचा नवा उच्चांक
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. गुरुवारी (दि. 25) सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये 16 हजार 922 नवे रुग्ण आढळले आहेत. एका दिवसांतील हा सर्वाधिक आकडा आहे, तर 418 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात एकूण कोरोनाबाधितांची संख्या चार लाख 73 हजार 105 इतकी झाली आहे.देशात कोरोनाचे एक लाख …
Read More »स्थलांतरित मजुरांसाठी केंद्राची विशेष योजना
पंतप्रधानांच्या हस्ते गरीब कल्याण रोजगार योजनेचा शुभारंभ नवी दिल्ली ः वृत्तसंस्थाआजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाऊनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छितात. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना …
Read More »‘घरीच राहून कुटुंबीयांसोबत करा योगा’
नवी दिल्ली : वृत्तसंस्थादरवर्षी योग दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा होतो, मात्र या वेळची परिस्थिती तशी नाही. त्यामुळे कोरोनाच्या आधीच्या काळात आपण ज्याप्रकारे योग दिवस साजरा करत होतो तसा योग दिवस आपल्याला साजरा करता येणार नाही, पण प्रत्येकाने घरात राहून योग दिवस साजरा करायचा आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी …
Read More »देशात कोरोनाचा नवा उच्चांक
साडेतेरा हजारांहून अधिक रुग्ण आढळले; 336 जणांचा मृत्यू नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची एकूण संख्या तीन लाख 80 हजारांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन लाख 80 हजार 532 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 12,573 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर दोन लाख चार …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper