Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पवारांकडे अदानी येऊन गेल्यानंतर वीज बिलमाफीचा निर्णय मागे

राज ठाकरेंचा गौप्यस्फोट ठाणे : प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वीज बिल दरवाढीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. राज्य सरकारमधील मंत्री आधी वीज बिल माफ करू म्हटले, पण गौतम अदानी हे शरद पवार यांच्या घरी जाऊन भेटून आल्यावर सरकारने कोणतेही वीज बिल …

Read More »

सिडकोतर्फे सामाजिक व धार्मिक वापराच्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकांस मंजुरी

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे शैक्षणिक, वैद्यकीय, संस्थात्मक, धर्मादाय किंवा शासकीय आणि धार्मिक वापराकरिता वाटपित करण्यात आलेल्या भूखंडांना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याच्या निर्णयास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबईच्या सामान्य विकास नियंत्रण नियमावलीतील (जीडीसीआर) अधिनियम क्र. 16.3(1अ)क मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. सिडकोतर्फे …

Read More »

शरजीलच्या पलायनासाठी ठाकरे सरकारची मदत

भाजप नेते आशिष शेलारांचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधीशर्जिल उस्मानी याने केलेल्या हिंदूविरोधी वक्तव्यांनंतर भाजपने त्याच्यावर कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीनेच शर्जिलला पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आशिष शेलार बोलत होते.शर्जिलला महाराष्ट्र …

Read More »

रोटरी प्रिमिअर लीगचा थरार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने 31 जानेवारी रोजी स्व. राजीव गांधी क्रीडा संकुल बेलापूर येथे रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते श्रीफळ …

Read More »

हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी नाही

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर मुंबई ः प्रतिनिधीहिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपकडे नाही. देशातील आताची परिस्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते, असे वक्तव्य नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला जळजळीत प्रत्युत्तर दिले असून, हिंदुत्व ही कोणाचीच मक्तेदारी नाही, …

Read More »

कोरोना लशीचा दुसरा डोस 13 फेब्रुवारीपासून -केंद्र सरकार

मुंबई : प्रतिनिधी भारतात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू करण्यात आल्या. सुरुवातीच्या टप्प्यात आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आता त्यांना दुसरा डोस दिला देणार आहे.  13 फेब्रुवारीपासून लशीचा दुसरा डोस दिला जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल …

Read More »

सिडको देणार विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी भूखंड

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोतर्फे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला (एमआरव्हीसी) विरार-डहाणू रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी पालघर जिल्ह्यातील कोळगाव येथील सर्व्हे क्र. 223 आणि 224 तसेच केळवे येथील सर्व्हे क्र. 520, 466, 467 आणि 1339 हे भूखंड वाटपित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भूखंडांचे एकत्रित क्षेत्रफळ 23,689 चौ.मी. इतके आहे. …

Read More »

राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीला होणार सुरू

मुंबई : राज्यभरातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीला सुरू होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी (दि. 3) पत्रकार परिषदेत दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) सांगितल्याप्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याच्या व्यवस्थेच्या 50 टक्के रोटेशन पद्धतीने विद्यार्थ्यांची संख्या घेऊन महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याचाच अर्थ …

Read More »

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; पत्नी करुणा यांची पोलिसांकडे तक्रार, मुलांना बंगल्यात डांबल्याचा आरोप, आमरण उपोषण करण्याचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणार्‍या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी आता मुंडेंविरोधात मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. त्यात गेल्या तीन महिन्यांपासून मुंडे यांनी आपल्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून …

Read More »

हापूस हंगामासाठी रविवारी बाजार सुरू

नवी मुंबई ः प्रतिनिधी दर रविवारी बाजार समितीला कार्यालयीन सुटी असते. त्यानुसार बाजार समितीच्या आवारातील पाचही बाजार या दिवशी बंद असतात, मात्र आता हापूस आंब्याचा हंगाम सुरू होत आहे. रविवारीही आंब्याच्या गाड्या बाजारात येत असतात. बाजार आवार बंद असल्याने या गाड्या बाजाराबाहेर उभ्या कराव्या लागतात. त्यामुळे बाजार समितीला मिळणारा सेसही …

Read More »