Breaking News

मुंबई – नवी मुंबई

आमचे सरकार सर्वसामान्यांचे -मुख्यमंत्री

मुंबई : प्रतिनिधी आमचे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे ही भावना जनतेच्या मनात तयार झाली आहे. विरोधकांना त्याचा त्रास होणे स्वाभाविक आहे, कारण ते आधी सरकारमध्ये होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवर मंगळवारी (दि. 16) पलटवार केला. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते …

Read More »

मुंबई प्रभादेवीत भाजप दहिहंडी सराव शिबिर

मुंबई : प्रतिनिधी मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपच्या वतीने दादर प्रभादेवी परिसरात सातत्याने प्रयत्न केले जातात. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांना सराव करता यावा यासाठी सराव शिबिराचे आयोजन  करण्यात आले होते. गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जातात. दरम्यान, सराव शिबिराला शेकडो कार्यकर्ते आणि हजारो गोविंदा …

Read More »

लता दिदींच्या नावे संगीत महाविद्यालय

आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय अंतर्गत बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सुरू करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे त्यांच्या जयंती दिनी 28 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि. 16) मुंबईत दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक झाली. यावेळी उच्च व …

Read More »

बुधवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन

मुंबई : प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला बुधवार (दि. 16)पासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर नवे सरकार सज्ज झाले असून अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. शिवसेना नेते एकनाथ शिंदे व सहकारी आमदारांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव …

Read More »

कुकशेतमध्ये रंगणार दहीहंडी उत्सव

नवी मुंबई : प्रतिनिधी, बातमीदार नेरूळ नोडमधील कुकशेत गावात दहीहंडी उत्सवाचा थरार रंगणार असून शुक्रवारी (दि. 19) कुकशेत गावातील गांवदेवी मैदानात या उत्सवाचे आयोजन माजी नगरसेवक सुरज पाटील व सुजाता सुरज पाटील यांनी केले आहे. जय गजानन मित्र मंडळ आयोजित खुल्या गटामध्ये दहीहंडी फोडणार्‍यास 25 हजार रूपये रोख पारितोषिक, पारंपारिक …

Read More »

खारघरमध्ये पदयात्रेला प्रतिसाद

खारघर : रामप्रहर वृत्त स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान शासनाकडून हर घर तिरंगा अभियान देशात राबविले जात आहे. या कालावधीत प्रत्येक घरावर तिरंगा, फडकवण्यासाठी नागरिकामध्ये जनजागृती करावी यासाठी रविवारी (दि. 14)खारघरमध्ये एस क्लासेसच्या वतीने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या वेळी एस क्लासेसचे संचालक दीपक शिंदे यांनी सांगितले …

Read More »

मुंबई-पुणे महामार्गावर लवकरच ‘इंटिलिजेंट मॅनेजमेंट ट्राफिक सिस्टीम’

‘एमएसआरडीसी’कडून कार्यादेश जारी; वाहनचालकांवर राहणार करडी नजर मुंबई : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) लवकरच बसविण्यात येणार आहे. एमएसआरडीसीने यासंबंधीचे कार्यादेश संबंधित कंपनीला दिले आहेत. दरम्यान, महामार्गावर नऊ महिन्यांमध्ये यंत्रणा बसविण्यात येणार असून त्यानंतर महिन्याभर या यंत्रणेची चाचणी घेण्यात येणार आहे. एकूणच वर्षभरात …

Read More »

आगामी सर्व निवडणुका भाजपा-शिवसेना युतीने लढविणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे येथे कार्यक्रमात प्रतिपादन ठाणे : प्रतिनिधी ठाण्यातील कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, वैद्यकीय, औद्योगिक आदी विविध क्षेत्रांतील दीडशेहून अधिक संस्थांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला. डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृहात शनिवारी पार पडलेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुलाखत झाली. या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई : प्रतिनिधी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. 14) जाहीर केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय …

Read More »

भाजपची नवी मुंबईत तिरंगा रॅली

नवी मुंबई : बातमीदार भाजप नवी मुंबई अध्यक्ष रामचंद्र घरत व बेलापूर विधानसभा आमदार मंदा म्हात्रे यांनी तुर्भे येथे हरघर तिरंगा अभियानाच्या प्रचारार्थ रॅलीचे आयोजन केले होते. तसेच प्रभाग क्रमांक 25मधील एसएससी बोर्डातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या वेळी करण्यात आला. हरघर तिरंगा मोहीम घराघरात पोहोचली आहे. देशाला 13 ते 15 …

Read More »