Breaking News

मुंबई – नवी मुंबई

ऐरोलीत सायकल रॅलीद्वारे घरोघरी तिरंगा उपक्रमाचा प्रचार

नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका ऐरोली विभाग कार्यालयाच्या वतीने निर्धार फाउंडेशन यांच्या सहयोगाने भारतीय स्वातंत्र्याच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर 19 ऐरोली येथील नेवा गार्डनपासून सेक्टर 15 ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत ही सायकल रॅली अतिशय उत्साहात झाली. यामध्ये 200हून अधिक …

Read More »

नवी मुंबईचा विकास आराखडा जाहीर

नागरिकांच्या हरकती, सूचनांसाठी मनपाकडून खुला नवी मुंबई ः बातमीदार नवी मुंबई पालिकेची 1992साली स्थापना झाली, मात्र आजतागयात नवी मुंबईचा विकास आराखडा तयार केला गेला नव्हता. आता 2018 साली महासभेत सर्वानुमते मंजूर होऊन शासनाला पाठवलेला व राजकारणात अडकलेल्या विकास आराखड्याला शासनकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार पालिकेने हरकती व सूचना मागवण्यासाठी …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे भाजप प्रदेशाध्यक्षपदी ; मुंबईची धुरा आशिष शेलारांकडे

मुंबई :  प्रतिनिधी भाजप नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे पक्षाचे नवे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले आहेत. चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री झाल्यामुळे त्यांच्या जागी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर आमदार आशिष शेलार यांच्याकडे भाजपच्या मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विद्यमान भाजप मुंबई अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचीही मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने महापालिका …

Read More »

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून

सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मुंबई : प्रतिनिधी सन 2022चे पावसाळी अधिवेशन बुधवार (दि. 17)पासून विधान भवन मुंबई येथे होणार आहे. 17 ते 25 ऑगस्ट या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार असून विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या गुरुवारी (दि.11)झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. मुंबईत विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक …

Read More »

महाविकास आघाडी पुन्हा धूसफुस

जयंत पाटील, नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून नाराजी उघड मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी आमदार अंबादास दानवे यांची निवड केल्यानंतर महाविकास आघाडीत नाराजीचा सूर उमटला आहे. आम्हाला या निवडीवेळी विश्वासात घेतले नसल्याचे मत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे, तर आमची नैसर्गिक आघाडी नाही, ही तात्पुरती आघाडी …

Read More »

नवी मुंबईत ठिकठिकाणी नारळी पौर्णिमा साजरी

नवी मुंबई : बातमीदार नारळी पौर्णिमेच्या दिवशी सागराला सोन्याचा नारळ अर्पण केल्यानंतर कोळी बांधव मासेमारीला सुरुवात करतात. त्यामुळे किनारी भागातील संस्कृतीच्या महत्त्वाच्या अशा या सणाला नवी मुंबईतील सर्वच खाडीकिनार्‍यांसह, कोळीवाड्यांत गुरुवारी (दि. 11) मोठा उत्साह पाहायला मिळाला. सरसोळे जेट्टी दिवाळे, ऐरोली, दिवा कोळीवाडा, वाशी खाडीकिनारा, घणसोली कोळीवाडा, बेलापूर गावासह समस्त …

Read More »

अतिवृष्टीग्रस्तांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत मदत एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट रक्कम मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन महिन्यांत राज्यामध्ये झालेल्या प्रचंड पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या संदर्भात एनडीआरएफच्या मदतीच्या दुप्पट रक्कम नुकसानग्रस्तांना देण्याचा आणि दोनऐवजी तीन हेक्टर मर्यादेत ही मदत करण्याचा निर्णय बुधवारी (दि. 10) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. …

Read More »

रामशेठ ठाकूर महाविद्यालयात स्वच्छता अभियान उत्साहात

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 10) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सप्ताहाचा दुसरा दिवस स्वच्छता अभियानाने झाला. या कार्यक्रमासाठी ओवे पेठ येथील शाळेच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. यासाठी महाविद्यालयातील डी.एल.एल.ई व राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी श्रमदान …

Read More »

खरी शिवसेना आमच्यासोबतच!

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरेंना टोला मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, पण आता परिस्थिती बदलल्याने खरी शिवसेना आमच्यासोबत असल्याचे सांगत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला तसेच भारतीय जनता पक्ष हा कधीही मित्रपक्षांना धोका देत नसल्याचे …

Read More »

आयआयटीएमएस प्रणाली होणार अद्ययावत

एनएमएमटीच्या प्रवाशांना मिळणार सुविधा नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या दैनंदिन परिचलनामध्ये अत्याधुनिक आयआयटीएमएस  प्रणालीचा वापर करण्यात येत असून या अत्याधुनिक प्रणालीच्या प्रभावी वापराबद्दल नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमास विविध राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. या प्रणालीद्वारे सुरू असलेल्या कार्यवाहीचा प्रत्यक्ष आढावा महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी …

Read More »