Breaking News

मुंबई – नवी मुंबई

पावसामुळे भाज्यांचे दर ‘एपीएमसी’त गडगडले

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये गेल्या आठवड्यापासून भाजीपाल्याची आवक वाढली आहे. परिणामी भाज्यांचे दर कमी होऊ लागले आहेत. एपीएमसीमध्ये सध्या पाचशे ते साडेपाचशे गाड्यांची आवक होत आहे. यामुळे जवळपास 30 ते 40 टक्क्यांनी भाजीपाला दर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी तब्बल प्रतिकिलो शंभरी गाठलेला टोमॅटो आता 20 ते …

Read More »

काँग्रेसने नेमलेल्या अन्सारींची कारकिर्द संशयास्पद

पाकिस्तानला गुप्त माहिती पुरविल्याचा आरोप; भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांची चौकशीची मागणी नवी मुंबई : बातमीदार काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात देशाच्या उपराष्ट्रपतीपदावर बसविलेले हमीद अन्सारी यांच्याविषयी पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्‍या नुसरत मिर्झा या महिला पत्रकाराने केलेला गौप्यस्फोट गंभीर असून त्याचा देशाच्या सुरक्षिततेशी संबंध असल्याने अन्सारी यांच्या कार्यकाळाची आणि पाकिस्तानी हेराने दिलेल्या माहितीची …

Read More »

एनडीएच्या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू उदया मुंबईत

मुंबई : प्रतिनिधी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू गुरुवारी (दि. 14) मुंबईत येत आहेत. भाजप नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट व अपक्ष आमदार आणि खासदारांना मूर्मू यांच्यासह होणार्‍या बैठक व चर्चेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. द्रौपदी मुर्मू या गुरुवारी दुपारी 2च्या सुमारास मुंबईत येत असून केंद्रीय …

Read More »

अतिवृष्टीग्रस्त नागरिक, शेतकर्‍यांना मदत करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी राज्यात अतिवृष्टी होऊन अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे, तर शेतकर्‍यांचेही मोठे नुकसान झाले आहे. सध्याचे नैसर्गिक संकट लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करीत आहेत. या वेळी संकटात सापडलेल्या नागरिकांना तसेच शेतकर्‍यांना मदत करण्याची ग्वाही त्यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

राज्यात कोसळधार !

जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे पाणीच पाणी; जनजीवन विस्कळीत मुंबई : प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारी (दि. 13)देखील पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले. राज्यात पावसाच्या जोरधारा कायम असून अनेक नदी-नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी पाणी …

Read More »

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अ‍ॅड-मॅड शो स्पर्धा

खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या वतीने अ‍ॅड-मॅड शो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा बुधवारी (दि.13) सकाळी 10 ते 1 च्यादरम्यान आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमधे महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या विशिष्ट …

Read More »

सानपाड्यात आरोग्यपर जनजागृती शिबिराचे आयोजन करा -पांडुरंग आमले

नवी मुंबई : बातमीदार सानपाडा नोड येथील प्रभाग 30मधील रहीवाशांच्या माहितीसाठी आरोग्यपर जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याची लेखी मागणी भाजपचे युवा नेते पांडुरंग आमले यांनी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनातून केली आहे. प्रभाग 30 मध्ये सानपाडा कारशेड, सानपाडा नोडमधील सेक्टर 12,2,7, 8,9, 10 (काही भाग), सेक्टर 11 ,15, 16, 16 …

Read More »

नवी मुंबईत पावसाचे थैमान

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईत मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मंगळवारी रात्रीपासून पावसाचा जोर आणखी वाढला आहे. गेल्या 24 तासांत नवी मुंबईत सरासरी 84.68 मिमी पाऊस झाला. यामुळे एपीएमसी मसाला मार्केट आणि महापे एमएसआरडीसी ते इंदिरा नगर येथील सखल भागात पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आपत्ती व्यवस्थापनच्या …

Read More »

मराठी माणसाने उद्योजक बनण्याची तयारी ठेवावी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नवी मुंबईत आवाहन नवी मुंबई : बातमीदार मराठी माणसाने उद्योजक बनण्याची मानसिकता तयार केली पाहिजे, असे आवाहन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. ते नवी मुंबईत मराठी उद्योजकता दिवसाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ना. नारायण राणे म्हणाले, राजनाथ सिंग यांच्या फोननंतर उध्दव ठाकरे रागावले …

Read More »

कोकणासह राज्यात मुसळधार पाऊस

पुढील दोन दिवस काही भागांत अतिवृष्टीचा इशारा मुंबई : प्रतिनिधी कोकणासह संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस पडत असून अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच बंगालच्या उपसागरात ओडिशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र आणि पश्चिम किनार्‍यावर द्रोणीय क्षेत्र तयार झाल्याने पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज …

Read More »